शहरं
Join us  
Trending Stories
1
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
2
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
3
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
4
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...
5
समुद्रात तैनात केला जाणार मेड इन इंडिया 'रक्षक', गौतम अदानी यांच्या कंपनीने केली मोठी डील
6
IPL 2025: मोठी बातमी! SRHचा स्टार क्रिकेटर कोरोना पॉझिटिव्ह; काव्या मारनची डोकेदुखी वाढली!
7
ज्योती मल्होत्राचा पहलगाम दहशतवादी हल्ल्याशी काय संबंध? पोलिसांनी केला मोठा खुलासा...
8
Spying for Pakistan: ज्योती मल्होत्रानंतर यु ट्यूबर प्रियांका सेनापती रडारवर! केंद्रीय गुप्तचर ब्युरोने केली चौकशी
9
एकच आंबा तीन किलोंचा! शेतकऱ्याने दिलेलं गिफ्ट बघून शरद पवार भारावले; फोटो शेअर करत म्हणाले...
10
IPL 2025 खेळण्यासाठी PSL सोडून आला, पण किटबॅग पाकिस्तानात राहिली, मेंडिसने पुढे काय केलं?
11
इंडोनेशिया, थायलंड, दुबई... पाकिस्तानी लष्करी अधिकाऱ्यांसोबत कोणकोणते देश फिरली Youtuber ज्योती?
12
Viral Video : कांदा कापताना डोळ्यांतून येणार नाही पाणी! सोशल मीडियावरचा व्हायरल देसी जुगाड बघाच
13
'या' अभिनेत्याला डेट करतीये राधिका मदन? रिलेशनशिपवर म्हणाला, "मी खूप चिपकू बॉयफ्रेंड..."
14
रशियाचा युक्रेनवर सर्वात मोठा ड्रोन हल्ला! एकाच वेळी २७३ ड्रोन्स सोडले अन्...
15
RR vs PBKS : शशांक सिंहचा परफेक्ट फिनिशिंग टच! पंजाब किंग्जनं उभारली विक्रमी धावसंख्या
16
सोलापूर आग दुर्घटना; मृतांचा आकडा पोहचला आठवर; बेडरूममध्ये सापडले पाच जणांचे मृतदेह 
17
Nehal Wadhera नं फिफ्टीसह सावरला डाव; मग प्रीती झिंटानं संघाच्या हिरोला अशी दिली दाद
18
'हा' मराठमोळा स्टार टीव्ही इंडस्ट्रीत सर्वांत महागडा! दिलीप जोशी, रुपाली गांगुलीही मागे पडले!
19
जगात 'मेड इन इंडिया'चा बोलबाला; स्मार्टफोन निर्यातीत भारताची मोठी झेप, 24 अब्ज डॉलर्स...
20
"चिंदबरम यांनी जो कायदा आणला, त्याला मी विरोध केला, मात्र..."; शरद पवारांनी सांगितली आठवण

५० लाख लीटर पाण्याचा पुनर्वापर

By admin | Updated: June 8, 2016 03:49 IST

महाराष्ट्रावर आलेल्या पाणीटंचाईच्या संकटात जनतेला जलबचतीची आणि त्याच्या पुनर्वापराची सवय लागावी

मुंबई : महाराष्ट्रावर आलेल्या पाणीटंचाईच्या संकटात जनतेला जलबचतीची आणि त्याच्या पुनर्वापराची सवय लागावी आणि एकूणच जलसाक्षरता निर्माण होण्याच्या उद्देशाने ‘लोकमत’ने हाती घेतलेल्या जलमित्र अभियानातील सहा आठवड्यांमध्ये राज्यभरात ५० लाख लीटर पाण्याची बचत करून त्याचा पुनर्वापर करण्यात आला. या अभियानात २ लाख ७६ हजार ८०० नागरिक आणि ‘लोकमत’च्या वाचकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन जलबचतीसंदर्भातील गांभीर्याची त्यांनी साक्ष पटवून दिली.राज्यभरात जलमित्र अभियानाचा प्रारंभ मेच्या पहिल्या आठवड्यात झाला. त्यानंतरच्या सुमारे दीड महिन्यात राज्यातील ६५२ हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, मॉल्समध्ये जाऊन तेथील व्यवस्थापन आणि कर्मचाऱ्यांना जलबचतीचा संदेश देण्यात आला. शिवाय हॉटेल्समधील वापरलेले पाणी साठविण्यासाठी बॅरेल्स देण्यात आले. या बॅरेलमध्ये दररोज साठविण्यात येणाऱ्या पाण्याचा हिशोब ठेवण्यात आला. हॉटेल्स, मॉल्सबरोबरच हॉस्पिटल्समध्येही जलसाक्षरतेसंदर्भात जनजागरण करण्यात आले. पोस्टर्स, स्टॅण्डीच्या माध्यमातून पाणी बचतीसाठीची जागृती प्रभावीपणे झाली. अभियानाच्या तिसऱ्या आणि चौथ्या आठवड्यात शहरांमधील हौसिंग सोसायट्यांमध्ये जलपुनर्भरणाचा संदेश देण्यात आला. यासाठी जलमित्र टीम प्रत्येक सोसायटीमध्ये जाऊन जनजागरण करीत होती. रहिवाशांनी या मोहिमेला उत्तम प्रतिसाद दिला. राज्यातील ९२४ सोसायट्यांमध्ये दोन आठवडे दररोज पुनर्भरणाचे महत्त्व पटवून दिले जात होते. ‘लोकमत’च्या जलमित्र अभियानात महाविद्यालयीन विद्यार्थी सहभागी झाले.>लक्षवेधीन्यू यॉर्कमधील सुप्रसिद्ध टाइम्स स्क्वेअर येथे न्यू यॉर्क मराठी मंडळ व छत्रपती प्रतिष्ठानच्या वतीने जलमित्र अभियानाचे पोस्टर्स झळकविले.जनजागरण अभियानात मराठी व हिंदी सिनेकलावंत, क्रीडापटू, प्रमुख राज्यक ीय नेत्यांकडून पाणीबचतीचे संदेश.सर्वच जिल्ह्यांमध्ये युवक संघटनांनी पाणीबचतीसाठी विविध उपक्रम राबवून या अभियानात सहभाग नोंदविला.महिला व कुटुंबातील सदस्यांनी पाणी बचत करून त्याचा पुनर्वापर केला.