शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

५० लाख लीटर पाण्याचा पुनर्वापर

By admin | Updated: June 8, 2016 03:49 IST

महाराष्ट्रावर आलेल्या पाणीटंचाईच्या संकटात जनतेला जलबचतीची आणि त्याच्या पुनर्वापराची सवय लागावी

मुंबई : महाराष्ट्रावर आलेल्या पाणीटंचाईच्या संकटात जनतेला जलबचतीची आणि त्याच्या पुनर्वापराची सवय लागावी आणि एकूणच जलसाक्षरता निर्माण होण्याच्या उद्देशाने ‘लोकमत’ने हाती घेतलेल्या जलमित्र अभियानातील सहा आठवड्यांमध्ये राज्यभरात ५० लाख लीटर पाण्याची बचत करून त्याचा पुनर्वापर करण्यात आला. या अभियानात २ लाख ७६ हजार ८०० नागरिक आणि ‘लोकमत’च्या वाचकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन जलबचतीसंदर्भातील गांभीर्याची त्यांनी साक्ष पटवून दिली.राज्यभरात जलमित्र अभियानाचा प्रारंभ मेच्या पहिल्या आठवड्यात झाला. त्यानंतरच्या सुमारे दीड महिन्यात राज्यातील ६५२ हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, मॉल्समध्ये जाऊन तेथील व्यवस्थापन आणि कर्मचाऱ्यांना जलबचतीचा संदेश देण्यात आला. शिवाय हॉटेल्समधील वापरलेले पाणी साठविण्यासाठी बॅरेल्स देण्यात आले. या बॅरेलमध्ये दररोज साठविण्यात येणाऱ्या पाण्याचा हिशोब ठेवण्यात आला. हॉटेल्स, मॉल्सबरोबरच हॉस्पिटल्समध्येही जलसाक्षरतेसंदर्भात जनजागरण करण्यात आले. पोस्टर्स, स्टॅण्डीच्या माध्यमातून पाणी बचतीसाठीची जागृती प्रभावीपणे झाली. अभियानाच्या तिसऱ्या आणि चौथ्या आठवड्यात शहरांमधील हौसिंग सोसायट्यांमध्ये जलपुनर्भरणाचा संदेश देण्यात आला. यासाठी जलमित्र टीम प्रत्येक सोसायटीमध्ये जाऊन जनजागरण करीत होती. रहिवाशांनी या मोहिमेला उत्तम प्रतिसाद दिला. राज्यातील ९२४ सोसायट्यांमध्ये दोन आठवडे दररोज पुनर्भरणाचे महत्त्व पटवून दिले जात होते. ‘लोकमत’च्या जलमित्र अभियानात महाविद्यालयीन विद्यार्थी सहभागी झाले.>लक्षवेधीन्यू यॉर्कमधील सुप्रसिद्ध टाइम्स स्क्वेअर येथे न्यू यॉर्क मराठी मंडळ व छत्रपती प्रतिष्ठानच्या वतीने जलमित्र अभियानाचे पोस्टर्स झळकविले.जनजागरण अभियानात मराठी व हिंदी सिनेकलावंत, क्रीडापटू, प्रमुख राज्यक ीय नेत्यांकडून पाणीबचतीचे संदेश.सर्वच जिल्ह्यांमध्ये युवक संघटनांनी पाणीबचतीसाठी विविध उपक्रम राबवून या अभियानात सहभाग नोंदविला.महिला व कुटुंबातील सदस्यांनी पाणी बचत करून त्याचा पुनर्वापर केला.