शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

५० लाख लीटर पाण्याचा पुनर्वापर

By admin | Updated: June 8, 2016 03:49 IST

महाराष्ट्रावर आलेल्या पाणीटंचाईच्या संकटात जनतेला जलबचतीची आणि त्याच्या पुनर्वापराची सवय लागावी

मुंबई : महाराष्ट्रावर आलेल्या पाणीटंचाईच्या संकटात जनतेला जलबचतीची आणि त्याच्या पुनर्वापराची सवय लागावी आणि एकूणच जलसाक्षरता निर्माण होण्याच्या उद्देशाने ‘लोकमत’ने हाती घेतलेल्या जलमित्र अभियानातील सहा आठवड्यांमध्ये राज्यभरात ५० लाख लीटर पाण्याची बचत करून त्याचा पुनर्वापर करण्यात आला. या अभियानात २ लाख ७६ हजार ८०० नागरिक आणि ‘लोकमत’च्या वाचकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन जलबचतीसंदर्भातील गांभीर्याची त्यांनी साक्ष पटवून दिली.राज्यभरात जलमित्र अभियानाचा प्रारंभ मेच्या पहिल्या आठवड्यात झाला. त्यानंतरच्या सुमारे दीड महिन्यात राज्यातील ६५२ हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, मॉल्समध्ये जाऊन तेथील व्यवस्थापन आणि कर्मचाऱ्यांना जलबचतीचा संदेश देण्यात आला. शिवाय हॉटेल्समधील वापरलेले पाणी साठविण्यासाठी बॅरेल्स देण्यात आले. या बॅरेलमध्ये दररोज साठविण्यात येणाऱ्या पाण्याचा हिशोब ठेवण्यात आला. हॉटेल्स, मॉल्सबरोबरच हॉस्पिटल्समध्येही जलसाक्षरतेसंदर्भात जनजागरण करण्यात आले. पोस्टर्स, स्टॅण्डीच्या माध्यमातून पाणी बचतीसाठीची जागृती प्रभावीपणे झाली. अभियानाच्या तिसऱ्या आणि चौथ्या आठवड्यात शहरांमधील हौसिंग सोसायट्यांमध्ये जलपुनर्भरणाचा संदेश देण्यात आला. यासाठी जलमित्र टीम प्रत्येक सोसायटीमध्ये जाऊन जनजागरण करीत होती. रहिवाशांनी या मोहिमेला उत्तम प्रतिसाद दिला. राज्यातील ९२४ सोसायट्यांमध्ये दोन आठवडे दररोज पुनर्भरणाचे महत्त्व पटवून दिले जात होते. ‘लोकमत’च्या जलमित्र अभियानात महाविद्यालयीन विद्यार्थी सहभागी झाले.>लक्षवेधीन्यू यॉर्कमधील सुप्रसिद्ध टाइम्स स्क्वेअर येथे न्यू यॉर्क मराठी मंडळ व छत्रपती प्रतिष्ठानच्या वतीने जलमित्र अभियानाचे पोस्टर्स झळकविले.जनजागरण अभियानात मराठी व हिंदी सिनेकलावंत, क्रीडापटू, प्रमुख राज्यक ीय नेत्यांकडून पाणीबचतीचे संदेश.सर्वच जिल्ह्यांमध्ये युवक संघटनांनी पाणीबचतीसाठी विविध उपक्रम राबवून या अभियानात सहभाग नोंदविला.महिला व कुटुंबातील सदस्यांनी पाणी बचत करून त्याचा पुनर्वापर केला.