शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
2
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
3
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
4
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
5
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
6
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
7
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
8
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
9
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
10
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
11
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
12
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
13
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
14
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
15
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
16
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही
17
‘देवनार’च्या निविदेचे ४,५०० कोटी गेले कुठे? मंत्री आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंना सवाल
18
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली
19
अदानींचा मोठा निर्णय; एका आठवड्यापूर्वी केलेला ड्रॅगनपास करार केला रद्द, चिनी कंपनीला दणका
20
अफगाणिस्तानने नोंदवला पहलगाम हल्ल्याचा निषेध; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा

फुकट्यांकडून १00 कोटींची वसुली

By admin | Updated: April 8, 2015 01:52 IST

विनातिकीट प्रवासामुळे रेल्वेला नुकसानीला सामोरे जावे लागत असून, त्याविरोधात रेल्वेकडून कारवाईचा बडगा उचलण्यात येत आहे

मुंबई : विनातिकीट प्रवासामुळे रेल्वेला नुकसानीला सामोरे जावे लागत असून, त्याविरोधात रेल्वेकडून कारवाईचा बडगा उचलण्यात येत आहे. या कारवाईत प्रवाशांवर दंड आकारण्यात येत असल्यामुळे रेल्वेला मोठे उत्पन्नही मिळत आहे. मध्य रेल्वेने २0१४-१५मध्ये विनातिकीट प्रवाशांवर केलेल्या कारवाईत १०० कोटींची कमाई केल्याचे सांगण्यात आले.टीसी आणि रेल्वे पोलिसांच्या साहाय्याने मध्य रेल्वेकडून विनातिकीट प्रवाशांवर मोठ्या प्रमाणात कारवाई केली जात आहे. ही कारवाई केल्यामुळे मध्य रेल्वेने चांगलाच दंडही वसूल केला आहे. २0१४-१५मध्ये केलेल्या कारवाईत २१ लाख ३१ हजार विनातिकीट प्रवाशांना पकडण्यात आले असून, २0१३-१४मध्ये हीच संख्या १९ लाख ३७ हजार एवढी होती. २0१४-१५मध्ये केलेल्या कारवाईतून तब्बल १00 कोटी ९५ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला असल्याचे मुख्य जनसंपर्क अधिकारी नरेंद्र पाटील यांनी सांगितले. तर त्याआधीच्या आर्थिक वर्षात केलेल्या कारवाईतून ८७ कोटी २५ लाखांचा दंड वसूल करण्यात आला होता. जवळपास १५.७0 टक्के दंड वसुलीत वाढ झाली आहे. मध्य रेल्वेकडून करण्यात आलेली कारवाई सर्वांत मोठी आहे. मध्य रेल्वेच्या मुंबई, पुणे, सोलापूर, नागपूर आणि भुसावळ या विभागांमध्ये मिळून कारवाई झाल्याचे सांगण्यात आले. या विभागांतर्गत मध्य प्रदेश, कर्नाटक, इगतपुरी, बल्लारशहा अशी काही महाराष्ट्राबाहेरील ठिकाणेही येतात.