शहरं
Join us  
Trending Stories
1
कोणत्याही परिस्थितीत पीडितेला न्याय अन् आराेपींना शिक्षा मिळेल; देवेंद्र फडणवीस यांची फलटणमध्ये ग्वाही
2
आजचे राशीभविष्य, २७ ऑक्टोबर २०२५: धनलाभ योग, ठरवलेली कामे होतील; यशाचा-प्रसन्न दिवस
3
Video - अग्निकल्लोळ! रेस्टॉरंटमध्ये भीषण आग; एकामागून एक ४ सिलिंडरचा स्फोट, महिलेचा मृत्यू
4
राज्यात पुन्हा अवकाळी पावसाचा फेरा, हातातोंडाशी आलेल्या पिकांवर मारा; जोर वाढण्याची शक्यता, चार-पाच दिवस सावट
5
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
6
रशियावरच्या निर्बंधाने भारतीय तेल कंपन्या अडचणीत; फटका बसू नये म्हणून ONGC जाणार न्यायालयात
7
पश्चिम उपनगरातील वाहतूककोंडी सुटण्यास आणखी ३ वर्षे; गोरगाव ते ओशिवरा केबल-स्टेड पूल उभारणार
8
गृहनिर्माण सोसायट्यांना पुनर्विकासास पूर्ण मुभा; कोर्टाच्या निर्णयामुळे संभ्रम दूर, जुने परिपत्रक मागे घेण्याचे आदेश
9
११३९ कोटी कधी मिळणार? १६ लाख शेतकरी अजून बँकांच्या केवायसीत अडकलेले
10
पाऊस पुन्हा मुक्कामी, मुसळधारेमुळे महामुंबईत धावपळ; ३० ऑक्टोबरपर्यंत मुंबईसह कोकणात मुसळधार
11
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
12
देशभरातील आठ हजार शाळा ‘रिकाम्या’; २० हजार शिक्षक घेताहेत फुकटचा पगार
13
एमबीबीएस प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा उडाला गोंधळ; निकालापूर्वीच बीएएमएस, बीएचएमएस प्रवेश फेरी सुरू
14
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
15
Buldhana Crime: पुण्यावरून गावी निघाला अन् बापाने चिमुकल्या जुळ्या मुलींचा गळा चिरून केला खून
16
सलग दुसऱ्या दिवशीही प्रसूतिगृहाचा काेंडवाडा; सहा महिला वेटिंगवर, दाटीवाटीने लावले बेड
17
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
18
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
19
Nanded Crime: "मंगल माझ्याशी लग्न कर"; प्रेयसीकडे लावला तगादा, तिने नकार देताच संपवलं
20
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा

फेरीवाल्यांकडून हप्ते वसुली

By admin | Updated: May 14, 2017 01:55 IST

मुंबई कृषी उत्पन्न बाजारसमितीचे भाजी मार्केट अवैध व्यावसायाचा अड्डा बनत चालले आहे.

नामदेव मोरे । लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजारसमितीचे भाजी मार्केट अवैध व्यावसायाचा अड्डा बनत चालले आहे. प्रत्येक विंगमध्ये खाद्यपदार्थांपासून पान, बिडीव्रिकीचे बेकायदेशीर स्टॉल लावण्यात आले आहेत. प्रत्येकाकडून महिन्याला किमान ५ हजार रुपये भाडे एक हॉटेलचालक वसूल करत आहे. वर्षानुवर्षे सुरू असलेल्या या वसुलीकडे बाजारसमिती प्रशासन दुर्लक्ष करत असल्याने येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांचेच या व्यवसायाला अभय असल्याचे स्पष्ट होऊ लागले आहे. राज्य शासनाने भाजी, फळे, डाळी, सुकामेवा, साखरेसह महत्त्वाच्या वस्तू नियमनमुक्त केल्या आहेत. यामुळे राज्यातील इतर संस्थांप्रमाणे मुंबई कृषी उत्पन्न बाजारसमितीचे उत्पन्न झपाट्याने कमी होऊ लागले आहे. बाजारसमिती बंद होण्याची शक्यता वाटू लागल्याने अनेकांनी स्वेच्छा निवृत्ती घेण्यास सुरुवात केली आहे. मुंबईचे धान्य कोठार अशी ओळख असलेली संस्था बंद पडू नये, यासाठी बाजारसमितीमधील अधिकारी कर्मचाऱ्यांनी प्रामाणीकपणे मेहनत करण्याची आवश्यकता आहे; परंतु संस्था टिकविण्याऐवजी अवैध मार्गाने स्वत:ला जास्तीत जास्त पैसे कसे मिळतील, यासाठीची स्पर्धा सुरू झाली आहे. यामुळे संस्थेचे उत्पन्न बुडवून वैयक्तिक उत्पन्न सुरू करण्याची प्रथा पडली असून त्यामधून अवैध व्यवसायाला हातभार लावला जात आहे.यामध्ये भाजी मार्केट आघाडीवर आहे. मार्केटच्या प्रत्येक विंगमध्ये महत्त्वाच्या ठिकाणी अनधिकृत फेरीवाले बसविण्यात आले आहेत. कामगारांना व ग्राहकांसह इतर घटकांना ये-जा करण्यासाठी ठेवलेल्या मोकळ्या जागेमध्ये इडली डोसा, वडापाव, पान, बिडी, सिगारेट, रगडा पॅटीस, शेव पुरी, ओली-सुखी भेल, चना भेल व इतर वस्तू विकणाऱ्यांना जागा भाड्याने देण्यात आली आहे. भाजी मार्केटच्या विंगमधील फेरीवाल्यांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. विशेष म्हणजे, येथे खाद्यपदार्थ विकणारे सर्वच्या सर्व परप्रांतीय आहेत. यामधील काही विक्रेत्यांशी चर्चा केली असता धक्कादायक माहिती समोर आली आहे. व्यवसाय करण्यासाठी एका हॉटेलवाल्याला महिन्याला ५ हजार रुपये भाडे द्यावे लागते. ज्या ठिकाणी जास्त व्यवसाय होतो, तेथे हा दर जास्त आहे. बाजारसमितीच्या जागेवर मार्केटमधीलच एक हॉटेलचालक खाद्यपदार्थ व इतर विक्रेत्यांना स्वत: जागा भाडेतत्त्वावर कशी देऊ शकतो, याविषयी आश्चर्य व्यक्त केले जात आहे. वर्षानुवर्षे हे प्रकार सुरू असून त्याकडे बाजारसमितीचे अधिकारी व कर्मचारी पूर्णपणे दुर्र्लक्ष करत आहेत. प्रशासनाचेच अभय असल्यामुळे सुरक्षा अधिकारी व कर्मचाऱ्यांनाही फक्त बघ्याची भूमिका घ्यावी लागत आहे. येथे व्यवसाय करणाऱ्यांची कोणतीही माहिती प्रशासनाकडे नाही. भविष्यात या खाद्यपदार्थांमुळे विषबाधा झाली किंवा दुसरा गंभीर गुन्हा घडला तर जबाबदार कोण? असा प्रश्न मार्केटमधील घटक उपस्थित करू लागले आहेत. >जागा एपीएमसीची, कमाई हॉटेलवाल्यांची मार्केटमधील सार्वजनिक वापराच्या जागेची मालकी एपीएमसी प्रशासनाची आहे. या जागेवर बिनधास्तपणे हॉटेलचालकांनी व इतरांनी खाद्यपदार्थ विक्रेत्यांना जागा भाडेतत्त्वावर दिली असून, त्या माध्यमातून हजारो रुपयांची कमाई केली जात आहे. या प्रकाराकडे प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. वास्तविक या प्रकाराची सखोल चौकशी करून अभय देणाऱ्या सर्वांवर कारवाई करण्याची गरज आहे. >कोणाकडेच नोंदणी नाहीसर्व खाद्यपदार्थ विक्रेते परप्रांतीय आहेत. त्यांना येथे व्यवसाय करण्यासाठी कोणी परवानगी दिली, त्याची कोणाकडेच लेखी नोंद नाही. विक्रेत्यांचे नाव, मूळ गाव, येथील वास्तव्याचा पुरावा, त्यांची पार्श्वभूमी याविषयी काहीही माहिती एपीएमसी प्रशासन, सुरक्षा विभाग व इतर कोणाकडेच नाही. ज्या हॉटेलवाल्याचे नाव सांगितले जाते, त्यांचेही ओळखपत्र नाही. >विषबाधा होण्याची शक्यता भाजी मार्केटमधील प्रत्येक विंगमध्ये खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या स्टॉल्सवरील कर्मचाऱ्यांचे हात अस्वच्छ असतात. परिसरही अस्वच्छ असतो. खाद्यपदार्थ चांगल्या दर्जाचे असल्याबद्दल काहीही खात्री नाही. या खाद्यपदार्थांमुळे विषबाधा होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. भविष्यात एखादी दुर्घटना झाल्यास त्यांचे गंभीर परिणाम बाजारसमितीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना भोगावे लागणार आहेत.