शहरं
Join us  
Trending Stories
1
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
4
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
5
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
6
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
7
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
8
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
9
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
10
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
11
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
12
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
13
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
14
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
15
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
16
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
17
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
18
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
19
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
20
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या

जप्त केलेला माल साठेबाजांना परत

By admin | Updated: January 22, 2016 03:43 IST

राज्य सरकारने साठेबाज व्यापाऱ्यांवर छापे टाकून जप्त केलेल्या डाळ व तेलापैकी ७० टक्के माल त्यांना परत केल्याची धक्कादायक बाब माहिती अधिकारातून उघडकीस आली आहे

मुंबई : राज्य सरकारने साठेबाज व्यापाऱ्यांवर छापे टाकून जप्त केलेल्या डाळ व तेलापैकी ७० टक्के माल त्यांना परत केल्याची धक्कादायक बाब माहिती अधिकारातून उघडकीस आली आहे. त्यामुळे धाडसत्र हा केवळ दिखावा असल्याचे उघड झाले आहे. जप्त केलेल्या साहित्यापैकी ८५ हजार ५४७.७८१ मेट्रीक टन माल परत करण्यामागील कारण काय, असा सवाल माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केला आहे.दिवाळीदरम्यान तूरडाळीचे भाव गगनाला भिडल्यानंतर राज्य सरकारने तीन महिन्यांत ५ हजार ५९२ ठिकाणी छापे टाकले. त्यातून ५३९.५० कोटींचा डाळ आणि तेलसाठा जप्त केला होता. गलगली यांनी शासनाकडे साठेबाजाकडून जप्त साठा, किंमत, परत केलेला माल, शिल्लक माल आणि गुन्ह्यांची माहिती मागितली होती. शासनाने ती देण्यास टाळाटाळ केल्यानंतर त्यांंनी प्रथम अपील दाखल केले. अपीलानंतर अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागाचे उप सचिव एस. एस. सुपे यांनी गलगली यांना दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील ७ प्रादेशिक विभागात ५ हजार ५९२ ठिकाणी धाडी घालून गोदामे तपासण्यात आली होती. त्यातून डाळ, तेल आणि तेल बियाणे असा १,२३,०२८.३८९ मेट्रीक टन माल जप्त करण्यात आला. त्यापैकी ८५,५४७.७८१ मेट्रीक टन माल परत करण्यात आला असून ३७,४८०.६०८ मेट्रीक टन शासनाच्या ताब्यात आहे.