शहरं
Join us  
Trending Stories
1
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
2
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
3
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
4
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
5
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
6
आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; थरकाप उडवणारा VIDEO
7
सासऱ्यावर गोळी झाडली, स्वतःला वाचवण्यासाठी पळत सुटला अन् पुराच्या पाण्यात पडला जावई! पुढे जे झालं...
8
असुरक्षित! पहाटे पुणे स्टेशनला उतरलेल्या तरुणाने पैसे न दिल्याने पोटात चाकूने वार
9
उल्हासनगरातील हॅन्ड्रेड बारमध्ये महिला वेटर्सचे अश्लील चाळे, महिला वेटर्ससह ९ जणांवर गुन्हा 
10
घरात ‘टॉप टू बॉटम’ डॉक्टर ; पण आयएएस झाले आणि लोकसेवेत आले...
11
योगेश आळेकरी यांना मिळाली नवीकोरी दुचाकी; पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार पण...
12
Sonu Sood : दिलदार सुपरहिरो! "रोटी का कर्ज चुकाना है"; पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी सोनू सूदचा पुढाकार
13
मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार...
14
'तुम्ही जीआरमध्ये फेरफार करून बघा, मग तुम्हाला मराठे कळतील'; मनोज जरांगेंचा इशारा
15
VIRAL : चोरांनी कार चालकावर झाडली गोळी, पण पुढे जे झालं त्यानं स्वतःच घाबरले! Video बघून सगळेच झाले हैराण
16
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
17
जगातला 'असा' एकमेव देश, जिथे घरात पाळल्या जातात मगरी; विकून होते कोटी रुपयांची कमाई!
18
Who Is Yash Rathod : विदर्भाची रन मशीन! पोट्याचं द्विशतक अवघ्या ६ धावांनी हुकलं
19
Aishanya Dwivedi : Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं; आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"
20
यामाहाची FZ किती रुपयांनी स्वस्त झाली? जुना काळ आठवला..., फसिनो, आर१५ वर किती जीएसटी कमी झाला...

एअरटेल, वोडफोन, आयडियाकडून 3,050 कोटी दंड वसूल करा - ट्राय

By admin | Updated: October 22, 2016 10:14 IST

टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी (TRAI)ने भारती एअरटेल, वोडफोन आणि आयडिया कंपन्याना 3,050 कोटी रुपये दंड ठोठावण्याची शिफारस दूरसंचार विभागाला केली आहे.

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. 22 - टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी (TRAI)ने भारती एअरटेल, वोडफोन आणि आयडिया कंपन्याना 3,050 कोटी रुपये दंड ठोठावण्याची शिफारस दूरसंचार विभागाला केली आहे. एअरटेल, वोडाफोन आणि आयडिया नेटवर्कशी रिलायंस जिओ ग्राहकांकडून केले जाणारे फोन जोडले जात नाहीत त्यात अडथळे येतात त्यामुळे हा दंड वसूल करण्याची मागणी करण्यात आली आहे. भारती एअरटेल आणि वोडाफोनच्या प्रत्येकी 21 वर्तुळासाठी प्रत्येकी 50 कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात येईल, याचनुसार आयडिया कंपनीच्या 19 सर्कलसाठी दंड ठोठवला जाणार आहे. 
 
5 सप्टेंबर रोजी रिलायंस जिओने आपली सेवा सुरू केल्यानंतर, ग्राहकांचा कंपनीला भरभरुन मिळाला. मात्र काही दिवसांनंतर अन्य नेटवर्कशी फोन जोडला जात नसल्याच्या ग्राहकांच्या तक्रारी येऊ लागल्या. या पार्श्वभूमीवर, 'अन्य मोबाईल कंपन्या जिओ ग्राहकांना फोन जोडणी उपलब्ध करुन देत नाहीत, त्यामुळे ग्राहकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे',अशी तक्रार जिओ कंपनीने 'ट्राय'कडे तक्रार केली. यानंतर 'ट्राय'ने दूरसंचार विभागाला या तीन मोठ्या कंपन्यांवर दंड लावण्याची शिफारस केली आहे. 
 
आणखी बातम्या 
'संबंधित कंपन्या नियम आणि अटींचे पालन करत नसल्याचे दिसत आहे. जिओ नेटवर्क ग्राहकांना अन्य नेटवर्कसोबत जोडू न देण्यामागे संबंधित कंपनीशी स्पर्धा होऊ न देणे आणि ग्राहकांच्या हिताविरोधी भूमिका आहे', असे सांगत ट्रायने फटकारले आहे. दरम्यान, ग्राहकांची असुविधेमध्ये आणखी भर पडू नये याची काळजी घेत कंपन्यांचा परवाना रद्द करण्याची शिफारस न केल्याचेही ट्रायने सांगितले आहे.  एअरटेल, वोडाफोन आणि आयडिया नेटवर्कने जिओ ग्राहकांना इंटरकनेक्शन सुविधा न पुरवल्याने 75 टक्के कॉल अन्य नेटवर्कशी जोडलेच गेले नाही, असे रिलायंस जिओचे म्हणणे आहे. 
 
नियमांनुसार, एक हजार कॉलमध्ये 5 पेक्षा अधिक कॉल जोडण्यात अपयशी होऊ नयेत. मात्र, रिलायन्स जिओ प्रकरणात जवळपास 960 कॉल अन्य मोबाईल नेटवर्कशी जोडलेच जाऊ शकले नाहीत, अशी माहिती समोर येत आहे. दरम्यान, दंडाविषयी बोलण्यासाठी जेव्हा कंपन्यांना संपर्क करण्यात आला तेव्हा त्यांनी या संदर्भात बोलणे टाळले.