शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs PAK W "म्हारी छोरियां छोरो से कम है के.." हरमनप्रीत ब्रिगेडनंही पाकची जिरवली!
2
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
3
मुंबईतील राजकीय नेत्याच्या मुलाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, शौचालयात गाठले आणि...
4
IND vs AUS : बढती मिळताच अय्यरनं टीम इंडियाला जिंकून दिली ट्रॉफी; घरच्या मैदानात कांगारुंची शिकार
5
गाझातील सत्ता सोडण्यास नकार दिल्यास हमासची धुळधाण उडवू, डोनाल्ट ट्रम्प यांची ताकिद 
6
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
7
Muneeba Ali Controversial Run Out : हुज्जत घालून पाक क्रिकेटच्या इज्जतीचा फालुदा; असं काय घडलं?
8
हिमालयात दार्जिलिंगपासून माऊंट एव्हरेस्टपर्यंत विध्वंस, ६० हून अधिक मृत्यू, कारण काय?
9
IND vs AUS : ३०० पारच्या लढाईत अभिषेक-तिलकनं तलवार केली म्यान; वादळी शतकासह प्रभसिमरन सिंगची हवा
10
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
11
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
12
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
13
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
14
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
15
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
16
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
17
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
18
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
19
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
20
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार

साठे महामंडळाची पुनर्रचना

By admin | Updated: May 30, 2016 01:50 IST

६४ मागण्यांची अंमलबजावणी संदर्भात १५ दिवसांत मंत्रालयीन सर्व विभागांसोबत बैठक बोलावून रिपोर्ट बनविणार

कामशेत : लहुजी साळवे मातंग समाज अभ्यास आयोगाच्या सरकारने स्वीकारलेल्या ६४ मागण्यांची अंमलबजावणी संदर्भात १५ दिवसांत मंत्रालयीन सर्व विभागांसोबत बैठक बोलावून ब्ल्यू प्रिंट बनवून अ‍ॅक्शन टेकन रिपोर्ट बनविणार आहोत. आण्णा भाऊ साठे महामंडळाची पुनर्रचना करून सुरळीत व पारदर्शी कारभाराची प्रक्रिया लवकरच सुरू करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.कान्हे येथील साईबाबा सेवाधाम संस्थेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या १२५व्या जयंतीनिमित्त मातंग ग्रुप डेव्हलपमेंटने (एमजीडी) आयोजित केलेल्या मातंग समाज चिंतन दोन दिवसीय शिबिरात मुख्यमंत्री बोलत होते. समाजाच्या वरिष्ठ अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतलेल्या शिबिराचे उद्घाटन माजी आमदार सुधाकर भालेराव यांनी केले. शिबिराच्या दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्री फडणवीस यांनी मार्गदर्शन केले. समाजातील प्रश्न व प्रलंबित मागण्यांबाबत सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी ऊहापोह केला. व्यासपीठावर पालकमंत्री गिरीश बापट,आमदार संजय भेगडे आदी उपस्थित होते. अमित गोरखे यांनी एमजीडी या विचार मंचाच्या स्थापनेचा उद्देश व कार्यप्रणाली विशद केली. शिक्षणाच्या अंगीकारातून युवकांच्या कौशल्य विकासातून मातंग समाजाचा विकास होईल, असे सांगताना मुख्यमंत्र्यांनी अनुसूचित जातीतील प्रत्येकाला घर देण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याची ग्वाही दिली. कोणत्याही समाजाचा विकास हा त्या समाजातील बुद्धिजीवी, कृतिशील शिक्षक, प्राध्यापक, विचारवंत यांच्या चिंतनातून होत असतो, असे ते म्हणाले. शिबिरासाठी सर्व जिल्ह्यांतून विविध संघटनांचे पदाधिकारी, डॉक्टर, इंजिनियर, वकील व समाजातील इतर घटक आवर्जून उपस्थित होते.(वार्ताहर)>मागण्या योग्य : योजनांद्वारे करणार पूर्णमुख्यमंत्र्यांच्या हस्ते समाजातील एमपीएससी व यूपीएससीमार्फत नवनियुक्तअधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. मुख्यमंत्री म्हणाले, डॉ. आंबेडकरांनी खऱ्या अर्थाने समतेच्या राज्याची स्थापना केली. क्रांतिवीर लहुजी साळवे हे संपूर्ण भारत देशाचे भूषण आहेत. शिक्षण क्षेत्र व इतर बाबतींत पीछेहाट दूर करण्यासाठी मातंग समाजाच्या सर्व मागण्या योग्य असून शासकीय योजनांच्या माध्यमातून त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहे.