शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
3
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
4
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
5
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
6
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
7
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
8
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
9
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
10
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
11
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
12
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
13
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
14
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
15
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
16
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
17
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
18
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
19
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
20
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प

‘व्हीआयपी सुरक्षा’ धोरणाचा पुनर्विचार करा, राज्य सरकारला निर्देश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2017 04:50 IST

खासगी लोकांना पोलीस संरक्षण देण्यासंदर्भातील धोरणाचा पुनर्विचार करा, असे निर्देश उच्च न्यायालयाने राज्य सरकारला बुधवारी दिले, तसेच संरक्षण देण्याबाबतची प्रक्रिया सुरळीत करण्यासाठी काय पावले उलचण्यात येणार आहेत? अशी विचारणा करत, या संदर्भात तीन आठवड्यांत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देशही न्यायालयाने सरकारला दिले.

मुंबई : खासगी लोकांना पोलीस संरक्षण देण्यासंदर्भातील धोरणाचा पुनर्विचार करा, असे निर्देश उच्च न्यायालयाने राज्य सरकारला बुधवारी दिले, तसेच संरक्षण देण्याबाबतची प्रक्रिया सुरळीत करण्यासाठी काय पावले उलचण्यात येणार आहेत? अशी विचारणा करत, या संदर्भात तीन आठवड्यांत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देशही न्यायालयाने सरकारला दिले.पोलीस संरक्षण घेत असलेले त्यासाठीचे पैसे न भरणाºया राजकीय नेत्यांकडून व कलाकारांकडून सर्व थकीत रक्कम वसूल करावी, अशी विनंती करणारी जनहित याचिका, अ‍ॅड. सनी पुनामिया यांनी उच्च न्यायालयात दाखल केली आहे.खासगी लोकांना संरक्षण देण्यासाठी १००० पोलिसांची नियुक्ती केली आहे. त्यातील ६०० पोलीस व्हीआयपींना संरक्षण देत आहेत, असे याचिकेत म्हटले आहे. कायदा व सुव्यवस्था राखणे, हे पोलिसांचे प्रथम कर्तव्य आहे. त्यामुळे त्यांना खासगी सुरक्षारक्षकांप्रमाणे वागवू नका, असे पुन्हा एकदा न्यायालयाने सुनावले.गेल्या महिन्यात जशी पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली तशीच आणीबाणीची स्थिती भविष्यात निर्माण झाली, तर सर्व पोलिसांना मदतीसाठी तैनात करावे लागेल. मग या १००० पोलिसांनाही मदतकार्यासाठी बोलविणार का? असा प्रश्न न्यायालयाने उपस्थित केला.पोलीस संरक्षण देऊ नका, असे आम्ही म्हणत नाही, पण ते केवळ पात्र लोकांनाच द्या. जर एखाद्या गरीब माणसाच्या जिवाला खरच धोका असेल, तर त्यालाही पोलीस संरक्षण द्या. मात्र, या संरक्षणाबाबत वेळोवेळी पुनर्विचार करणे आवश्यक आहे, असेही न्यायालयाने म्हटले.>स्वसंरक्षणासाठी पैसे भरू द्या‘तुम्ही (राज्य सरकार) याबाबतच्या धोरणाचा पुनर्विचार करा, अन्यथा जिवाला धोका नसतानाही कोणीही आयुष्यभर पोलीस संरक्षणाचा लाभ घेईल. जे लोक पोलीस संरक्षणासाठी पैसे मोजू शकतात, त्यांना त्यासाठी पैसे भरू द्या,’ असेही न्यायालयाने स्पष्ट केले.