शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
2
अस्तनीतले निखारे! पहलगाम मुद्द्यावर काही भारतीयांचा पाकिस्तानला पाठिंबा! आतापर्यंत ३७ जणांना अटक
3
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
4
IPL 2025: कगिसो रबाडा ड्रग टेस्टमध्ये दोषी, झाले निलंबन! स्पर्धा सोडून परतला मायदेशी
5
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
6
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप
7
"आम्ही पाकिस्तानी लोकांना मारणार नाही, कारण..."; काय म्हणाले फारुख अब्दुल्ला? सिंधूच्या पाण्यासंदर्भातही मोठं विधान
8
IHMCL Recruitment: आयएचएमसीएलमध्ये नोकरी, एक लाखांहून अधिक पगार; जाणून घ्या पात्रता आणि निवड
9
"घरं तोडायला येतील त्यांना सांगा, राज ठाकरेंशी बोलून घ्या"; एल्फिन्स्टन पूल बाधितांना मनसेने दिला धीर
10
"मी सत्तेसाठी कधीच हपापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत
11
Alka Kubal: अलका कुबल यांनी 'माहेरची साडी'साठी घेतलं होतं फक्त इतकं मानधन, पहिल्या कमाईचा आकडाही आला समोर
12
"दादांना विचारतो त्यांनी कुठल्या ज्योतिष्याकडे पाहिलं"; CM व्हावं वाटतं म्हणणाऱ्या अजित पवारांना गोगावलेंचा टोला
13
"शिंदे कसले वाघ, मंत्र्यांचा निधी वळवला जातो, अडचण येताच गावी पळून जातात": अंबादास दानवे
14
Temple: शिवालयाच्या पायरीवर असलेल्या 'या' राक्षसाला नमस्कार करून मंदिरात जाण्याचा प्रघात का?
15
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा आखाती देशांतील मराठी अनिवासी भारतीयांकडूनही तीव्र निषेध
16
बलुचिस्तानात मोठा खेला...! भारताला पोकळ धमक्या देणारा पाक उघडा पडला; सरकारी इमारतींवर बंडखोरांचा ताबा, लावली आग
17
१३२ सेवा, २४ राज्ये, २८४ जिल्ह्यांना जोडणाऱ्या ‘वंदे भारत’मुळे रेल्वेची किती कमाई होते?
18
Pune Accident: कीर्तन ऐकून घरी परतताना भरधाव मर्सिडीजनं उडवलं; दुचाकीस्वार जागीच ठार
19
Hingoli: डिव्हायडर तोडून टिप्पर थेट ऑटोवर उलटला; टिप्परखाली दबून दोन प्रवाशांचा मृत्यू
20
“प्रत्येकाने सद्भावना मंत्र जोपासावा, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी काँग्रेसचा सत्याग्रह”

आधीच्या निर्णयांचा फेरविचार

By admin | Updated: November 21, 2014 02:48 IST

आघाडी सरकारने शेवटच्या चार महिन्यांत घेतलेल्या निर्णयांचा फेरविचार करण्यासाठी आढावा घेण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्य सचिव स्वाधिन क्षत्रिय यांना दिले आहेत.

यदु जोशी, मुंबईपृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वातील आघाडी सरकारने शेवटच्या चार महिन्यांत घेतलेल्या निर्णयांचा फेरविचार करण्यासाठी आढावा घेण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्य सचिव स्वाधिन क्षत्रिय यांना दिले आहेत. आपला पक्ष सत्तेत आल्यास आघाडी सरकारच्या शेवटच्या चार महिन्यांतील निर्णयांची चौकशी करून चुकीचे निर्णय रद्द केले जातील, अशी घोषणा फडणवीस यांनी प्रचारादरम्यान केली होती. त्या घोषणेची अंमलबजावणी करीत एक महिन्याच्या आत त्या निर्णयांचा आढावा घेण्यास त्यांनी सांगितले आहे. जून ते सप्टेंबर २०१४ या काळात घेतलेल्या निर्णयांचा त्यात समावेश असेल. आघाडी सरकारने सरतेशेवटी घेतलेले काही निर्णय वादग्रस्त असल्याचा आरोप भाजपाच्यावतीने करण्यात आला होता. भूविकास बँकेचे पुनरुज्जीवन नाहीचराज्य भूविकास बँकेचे पुनरुज्जीवन न करण्याचा निर्णय राज सरकारच्या विचाराधिन आहे. ही बँक आणि तिच्या शाखा अवसायनात काढण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार असून बँकेकडून राज्य शासनाला जवळपास १७०० कोटी रुपये घ्यायचे आहेत. बँकेची ठिकठिकाणी असलेली संपत्ती (जमिनी व इमारती आदी) शासन ताब्यात घेईल. या जमिनी ई-लिलावाद्वारे विकण्याचा प्रस्ताव आहे. शेतकऱ्यांवर असलेले कर्ज फेडण्यासाठी एकरकमी कर्जफेड योजना ३१ मार्च २०१६ (ओटीएस) पर्यंत राबविली जाईल. या कर्जवसुलीतून बँकेच्या कर्मचाऱ्यांना स्वेच्छानिवृत्ती देण्याचा प्रस्ताव आहे.