शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

मदतीला धावणारे समस्यांच्या विळख्यात

By admin | Updated: April 8, 2017 01:28 IST

विजेच्या तारेत पक्षी अडकला, इतकेच काय पण घरात साप जरी दिसला तर सर्वांत आधी हाक दिली जाते, ती अग्निशामक दलाला

धनकवडी : शहरात कुठे आग लागली, इमारत कोसळली, लिफ्टमध्ये कुणी अडकले, विजेच्या तारेत पक्षी अडकला, इतकेच काय पण घरात साप जरी दिसला तर सर्वांत आधी हाक दिली जाते, ती अग्निशामक दलाला. पर्यायाने अग्निशामक दलातील कर्मचाऱ्यांना. एक कॉल आला की नागरिकांच्या मदतीला तत्परतेने धावणाऱ्या या कर्मचाऱ्यांना मात्र अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असल्याचे वास्तव आहे. ८ एप्रिल हा अग्निशामक दिन. अग्निशामक दलाचा स्थापन दिन आणि सुरक्षा सप्ताहानिमित्त घेतलेल्या आढाव्यात हे चित्र दिसून आले आहे. अग्निशामक दलाच्या एका केंद्रावर महिन्यातून सरासरी ३० कॉल येतात. कॉल आला की दलातील कर्मचारी आहे त्या साधनांसह मदतीसाठी धावतात. मात्र, अग्निशामक केंद्राच्या आवारात कर्मचाऱ्यांना राहण्याची सोय नाही, आवश्यक असणारे बूट, ड्रेसची अवस्था म्हणावी तितकी चांगली नाही. आपत्ती व्यवस्थापनामध्ये नवनवीन साधने असताना, अग्निशमन दलातील कर्मचाऱ्यांना अद्यापही पारंपरिक साधनांवरच अवलंबून राहावे लागत आहे.कात्रज अग्निशामक केंद्रामध्ये एका अधिकाऱ्यासह २५ जवान, एक वाहन आणि प्राथमिक स्तरावर काम करण्याइतपत साधनसामुग्री उपलब्ध आहे. जादा साहित्याची आवश्यकता भासल्यास मुख्यालयातून मदत मागवावी लागते. येथील कर्मचाऱ्यांना राहण्यासाठी संकुल नाही. कर्मचाऱ्यांच्या आरोग्याचा प्रश्न परिसरातील वातावरणामुळे गंभीर झाला आहे. याच परिसरात असणारे कचरा संकलन केंद्र व तीन बायोगॅस प्रकल्प यामुळे होणारे प्रदूषण, दुर्गंधी, डास यामुळे जवान त्रासले आहेत. अनेक वेळा पत्रव्यवहार केला तरी याची कुणी दखल घेतली नसल्याचे कर्मचाऱ्यांचे दु:ख आहे. >शहराच्या नकाशाची आवश्यकताअग्निशमन दलातील कर्मचाऱ्यांची अडचण होते ती झोपडपट्टी परिसरात. झोपडपट्टी परिसरात आग लागली किंवा एखादी दुर्घटना घडली तर तिथपर्यंत तत्काळ पोहोचणे कर्मचाऱ्यांना शक्य होत नाही. दुर्घटनेच्या ठिकाणी तत्परतेने पोहोचण्यास आणखी एक समस्या असते, ती वाहतूककोंडीची. कोंडीतून रस्ता काढणे मोठे जिकिरीचे असते. अग्निशामक विभागाकडे शहराचा नकाशा नसल्याने दुर्घटना घडली, त्या ठिकाणी तत्परतेने पोहोचणे शक्य होत नाही.आगीत सापडलेल्या किंवा बुडत असलेल्या व्यक्तीला वाचविण्यासाठी जवान स्वत:च्या जिवाची पर्वा करीत नाही. अशा बहाद्दर जवानांच्या समस्या सोडविण्यात, चांगले काम केल्यानंतर प्रशासनाकडून कौतुकाची थाप दिली जात नसल्याबद्दल कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.