शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange: '...तोपर्यंत मुंबई सोडणार नाही', नोटीसनंतर मनोज जरांगेंचा मुख्यमंत्री फडणवीसांना इशारा
2
आंदोलनात बेकायदेशीर कृत्ये, लवकरात लवकर मैदान रिकामं करा; मनोज जरांगेंना पाठवलेल्या पोलिसांच्या नोटीसमध्ये काय?
3
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: आंदोलन सुरूच राहणार, सर्व मागण्या पूर्ण झाल्याशिवाय मुंबई सोडणार नाही: मनोज जरांगे
4
Punjab Flood: अर्धा पंजाब पाण्यात! १३०० गावांना पुराचा वेढा, हजारो लोक बेघर; २९ जणांचा मृत्यू
5
Maharashtra Rain: राज्यात पाऊस पुन्हा धुमाकूळ घालणार, आठ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
6
गणेशोत्सव साजरा करत नाही आलिया? ट्रोल झाल्यानंतर दिलं सडेतोड उत्तर; फोटो शेअर करत म्हणाली...
7
अनंत चतुर्दशी २०२५: गणेशोत्सवाची सांगता; पाहा, मान्यता, २०२६ मध्ये कधी येणार गणपती बाप्पा?
8
Mitchell Starc T20I Retirement : आगामी टी-२० वर्ल्ड कप आधी स्टार गोलंदाजाने घेतला निवृत्तीचा निर्णय; जाणून घ्या त्यामागचं कारण
9
४ राजयोगात परिवर्तिनी एकादशी: ९ राशींचे कल्याण-भरभराट, सुबत्ता-शुभ-लाभ; धनलक्ष्मी प्रसन्न!
10
'ही' आंतरराष्ट्रीय बँक भारतातून गाशा गुंडाळण्याच्या तयारीत? ग्राहकांच्या पैशांचं काय होणार?
11
Mumbai: मुंबईत मोठी वाहतूक कोंडी; कार्यालय गाठता गाठता नोकरदारांच्या नाकीनऊ!
12
तुम्हाला कन्नड येते का? मुख्यमंत्र्यांच्या प्रश्नावर राष्ट्रपतींचे चोख प्रत्युत्तर; म्हणाल्या,'प्रत्येकाने आपली भाषा...'
13
Maratha Reservation: मराठा आरक्षणाबाबत सरकारचा मसुदा तयार, लवकरच निर्णय!
14
१५ राज्ये, अनेक बँका अन् ओटीपीशिवाय खात्यातून काढले २९ कोटी; ६ आरोपींचे हादरवणारे कृत्य
15
लेख: मतभेद पुसून न टाकता ऐक्य साधता येईल काय?
16
हेमा मालिनी यांनी विकले मुंबईतील दोन आलिशान फ्लॅट्स, १२.५ कोटींची कमाई अन् आता...
17
Raigad Accident: रायगडमध्ये रिक्षाला अपघात, ब्रेक फेल झाल्याने दिशादर्शकाला धडक, तीन ठार
18
Sudan Landslide: अख्खं गावचं गिळलं, १००० लोकांचा मृत्यू, फक्त एक मुलगा वाचला! सुदानमध्ये भुस्खलनाचा प्रकोप
19
आजचे राशीभविष्य, ०२ सप्टेंबर २०२५: प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल, स्वकियांशीच खटके उडतील
20
आजचा अग्रलेख: अमेरिका विरुद्ध सर्व? ट्रम्प यांच्या दादागिरीला उत्तर देण्यासाठी अनेक देश एकत्र

मदतीला धावणारे समस्यांच्या विळख्यात

By admin | Updated: April 8, 2017 01:28 IST

विजेच्या तारेत पक्षी अडकला, इतकेच काय पण घरात साप जरी दिसला तर सर्वांत आधी हाक दिली जाते, ती अग्निशामक दलाला

धनकवडी : शहरात कुठे आग लागली, इमारत कोसळली, लिफ्टमध्ये कुणी अडकले, विजेच्या तारेत पक्षी अडकला, इतकेच काय पण घरात साप जरी दिसला तर सर्वांत आधी हाक दिली जाते, ती अग्निशामक दलाला. पर्यायाने अग्निशामक दलातील कर्मचाऱ्यांना. एक कॉल आला की नागरिकांच्या मदतीला तत्परतेने धावणाऱ्या या कर्मचाऱ्यांना मात्र अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असल्याचे वास्तव आहे. ८ एप्रिल हा अग्निशामक दिन. अग्निशामक दलाचा स्थापन दिन आणि सुरक्षा सप्ताहानिमित्त घेतलेल्या आढाव्यात हे चित्र दिसून आले आहे. अग्निशामक दलाच्या एका केंद्रावर महिन्यातून सरासरी ३० कॉल येतात. कॉल आला की दलातील कर्मचारी आहे त्या साधनांसह मदतीसाठी धावतात. मात्र, अग्निशामक केंद्राच्या आवारात कर्मचाऱ्यांना राहण्याची सोय नाही, आवश्यक असणारे बूट, ड्रेसची अवस्था म्हणावी तितकी चांगली नाही. आपत्ती व्यवस्थापनामध्ये नवनवीन साधने असताना, अग्निशमन दलातील कर्मचाऱ्यांना अद्यापही पारंपरिक साधनांवरच अवलंबून राहावे लागत आहे.कात्रज अग्निशामक केंद्रामध्ये एका अधिकाऱ्यासह २५ जवान, एक वाहन आणि प्राथमिक स्तरावर काम करण्याइतपत साधनसामुग्री उपलब्ध आहे. जादा साहित्याची आवश्यकता भासल्यास मुख्यालयातून मदत मागवावी लागते. येथील कर्मचाऱ्यांना राहण्यासाठी संकुल नाही. कर्मचाऱ्यांच्या आरोग्याचा प्रश्न परिसरातील वातावरणामुळे गंभीर झाला आहे. याच परिसरात असणारे कचरा संकलन केंद्र व तीन बायोगॅस प्रकल्प यामुळे होणारे प्रदूषण, दुर्गंधी, डास यामुळे जवान त्रासले आहेत. अनेक वेळा पत्रव्यवहार केला तरी याची कुणी दखल घेतली नसल्याचे कर्मचाऱ्यांचे दु:ख आहे. >शहराच्या नकाशाची आवश्यकताअग्निशमन दलातील कर्मचाऱ्यांची अडचण होते ती झोपडपट्टी परिसरात. झोपडपट्टी परिसरात आग लागली किंवा एखादी दुर्घटना घडली तर तिथपर्यंत तत्काळ पोहोचणे कर्मचाऱ्यांना शक्य होत नाही. दुर्घटनेच्या ठिकाणी तत्परतेने पोहोचण्यास आणखी एक समस्या असते, ती वाहतूककोंडीची. कोंडीतून रस्ता काढणे मोठे जिकिरीचे असते. अग्निशामक विभागाकडे शहराचा नकाशा नसल्याने दुर्घटना घडली, त्या ठिकाणी तत्परतेने पोहोचणे शक्य होत नाही.आगीत सापडलेल्या किंवा बुडत असलेल्या व्यक्तीला वाचविण्यासाठी जवान स्वत:च्या जिवाची पर्वा करीत नाही. अशा बहाद्दर जवानांच्या समस्या सोडविण्यात, चांगले काम केल्यानंतर प्रशासनाकडून कौतुकाची थाप दिली जात नसल्याबद्दल कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.