शहरं
Join us  
Trending Stories
1
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
2
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
3
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
4
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
5
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
6
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
7
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
8
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
9
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
10
"समस्या दाढीची नाही, तर..."; पतीला सोडून दीरासोबत पळाली होती वहिनी, कहानीत नवा ट्विस्ट
11
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
12
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
13
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
14
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
15
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
16
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
17
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
18
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
19
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
20
भारताकडून पाकिस्तानचा गोल्ड मेडिलिस्ट अर्शद नदीमचे इंस्टाग्राम अकाऊंट ब्लॉक!

म.रे.वर पुन्हा खोळंबा ! घाटकोपर स्थानकात तांत्रिक बिघाड

By admin | Updated: May 13, 2017 10:42 IST

मध्य रेल्वेच्या सततच्या कटकटीला कंटाळलेल्या प्रवाशांना आजही सकाळीच मनस्ताप सहन करावा लागत आहे. कारण घाटकोपर रेल्वे स्थानकात तांत्रिक बिघाड झाल्यानं मध्य रेल्वेची वाहतूक पुन्हा खोळंबली आहे.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 13 - मध्य रेल्वेच्या सततच्या कटकटीला कंटाळलेल्या प्रवाशांना आजही सकाळीच मनस्ताप सहन करावा लागत आहे. कारण घाटकोपर रेल्वे स्थानकात तांत्रिक बिघाड झाल्यानं मध्य रेल्वेची वाहतूक पुन्हा खोळंबली आहे. या तांत्रिक बिघाडामुळे घाटकोपर रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक 1 आणि 2 वरील बंद असून येथील वाहतूक प्लॅटफॉर्म क्रमांक 3 आणि 4 वर वळण्यात आली आहे.
 
शुक्रवारी (12 मे)रात्रीप्रमाणेच विद्युत पुरवठ्यामध्ये समस्या निर्माण झाल्याची माहिती समोर येत आहे. मात्र, ऐन कार्यालय गाठण्याच्या वेळेत मध्य रेल्वेवर खोळंबा झाल्यानं प्रवासी प्रचंड संतापले आहेत.
 
ऐन गर्दीच्यावेळी सकाळी किंवा संध्याकाळी उपनगरीय लोकल सेवा कोलमडत असल्याने प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागतोय. अशा घटना कमी होण्याऐवजी दिवसागणिक वाढतच चालल्या आहेत. शुक्रवारी (12 मे) संध्याकाळीदेखील हार्बर पाठोपाठ मध्य रेल्वेची वाहतूकही विस्कळीत झाली होती. 
 
मानखूर्द-चेंबूर रेल्वे स्थानकांदरम्यान तांत्रिक बिघाड झाल्याने हार्बर रेल्वे विस्कळीत झाली होती. पाठोपाठ मध्य रेल्वे मार्गावर घाटकोपरहून ठाण्याकडे जाणारी वाहतूक ठप्प होती. हार्बर मार्गावर गाडया 15 ते 20 मिनिटे उशिराने धावत होत्या. प्रवाशांच्या कामावरुन घरी परतण्याच्यावेळी हा बिघाड झाल्याने प्रवाशांना त्रास सहन करावा लागला. मानखूर्द-चेंबूर दरम्यान बिघाड झाल्याने लोकल खोळंबल्या होत्या. 
 
कधी रेल्वे रुळाला तडा, कधी ओव्हहेड वायर तुटणे तर, कधी सिंग्नल यंत्रणेतील बिघाड यामुळे प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो. बहुतांशवेळा हा बिघाड सकाळच्यावेळी होतो. त्यामुळे घरातून वेळेत बाहेर पडूनही प्रवाशांना वेळेत कार्यालय गाठता येत नाही.