शहरं
Join us  
Trending Stories
1
यावेळी मोठा धमाका करायचा... PM मोदींनी पहलगाम हल्ल्याची बातमी मिळताच मनात आखलेला 'प्लॅन'
2
भारताच्या हल्ल्यात ११ नाही तर अनेक पाकिस्तानी सैनिक ठार; पाक लष्कराने केले मान्य
3
उल्हासनगरात संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त! पत्नी व मुलीची हत्या करून पवन पाहुजा यांनी घेतला गळफास
4
Video - दहशतवाद्याच्या हातात बंदूक, चेहऱ्यावर भीती...; त्राल चकमकीचं ड्रोन फुटेज आलं समोर
5
WTC Finalच्या विजेत्याला मिळणार मोठ्ठी रक्कम, टीम इंडियाही मालामाल, पाकिस्तानला किती बक्षीस?
6
आमिर खान-राजकुमार हिरानी पुन्हा एकत्र, महाराष्ट्राच्या 'या' सुपुत्रावर घेऊन येणार बायोपिक!
7
पाकिस्तानातून गाढवांची खरेदी का करतो भारताचा शेजारी देश? काय आहे चिनी कनेक्शन?
8
इंग्लंड दौऱ्याआधी टीम इंडियाचा कोच गौतम गंभीरने पत्नीसह घेतले सिद्धिविनायकाचे दर्शन
9
सोशल मीडियावर लाईव्ह होती प्रसिद्ध इन्फ्लुएंसर, भेटवस्तू देण्याच्या बहाण्याने आलेल्या इसमाने झाडल्या गोळ्या!
10
Swami Samartha: स्वामी कृपा व्हावी वाटत असेल तर त्यांना नावडणारी 'ही' गोष्ट ताबडतोब सोडा!
11
कहाणी १९६५ च्या युद्धाची! आदमपूर एअरबेसवर कब्जा करण्यासाठी उतरले ५५ पाकिस्तानी कमांडो, १२ ठार तर बाकी...
12
मुकेश अंबानी यांनी घेतली डोनाल्ड ट्रम्प यांची भेट; आखाती देशात किती पसरलाय व्यवसाय?
13
IAS-IPS बनण्याची सूवर्णसंधी; UPSC ने जारी केले परीक्षांचे वेळापत्रक, जाणून घ्या संपूर्ण माहिती...
14
Sensex मध्ये १३०० तर Nifty मध्ये ४०० अंकांपेक्षा अधिक तेजी, काय आहे तेजीमागचं कारण?
15
राजस्थानात पाकिस्तान सीमेपासून १५ किमी दूर कोसळलेला ड्रोन सापडला; बीएसएफकडून चौकशी सुरु
16
समुद्राचे खारट पाणी गोड करता येणार; तटरक्षक दल, डीआरडीओच्या संशोधकांना मोठे यश
17
'पाकिस्तानची अवस्था घाबरलेल्या कुत्र्यासारखी', अमेरिकेतील माजी अधिकाऱ्याने पार इज्ज काढली
18
अवघ्या २३ वर्षांच्या मुलीने लावली पाकिस्तान-बांगलादेशच्या नात्यात आग! राजदूतांना काढावा लागला पळ
19
संकष्ट चतुर्थी २०२५: एकदंत संकष्ट चतुर्थी असणार खास, 'या' राशींची पूर्ण होणार धन-संपत्तीची आस!

नोटा बंदीमुळे आठवडा बाजारात ग्राहकांची मंदी

By admin | Updated: November 13, 2016 16:46 IST

यंदाच्या रविवारच्या आठवडा बाजाराला हजार, पाचशेच्या नोटा बंदीची झळ ग्राहकांच्या मंदीमुळे बसल्याचे दिसून आले.

राजू काळे/ऑनलाइन लोकमतभाईंदर, दि. 13 - मीरा-भार्इंदरमधील नागरिकांसाठी सोईस्कर ठरलेल्या यंदाच्या रविवारच्या आठवडा बाजाराला हजार, पाचशेच्या नोटा बंदीची झळ ग्राहकांच्या मंदीमुळे बसल्याचे दिसून आले. भार्इंदर पश्चिमेकडील स्टेशन रोडवर दर रविवारी आठवडा बाजार भरतो. या बाजारात शहरासह आसपासच्या ठिकाणचे विक्रेते येत असतात. हा बाजार स्थानिकांना सोईस्कर ठरत असल्याने श्रीमंतापासुन गरीबांपर्यंतची लोकं या बाजारात आवश्यक वस्तु खरेदीसाठी येत असतात. प्रत्येक सणवारीलाही हा बाजार ग्राहकांच्या गर्दीने फुलून जातो. महत्वाचा ठरलेला हा आठवडा बाजार ऐन वाहतुकीच्या रस्त्यावर भरत असल्याने तेथे होणारी वाहतूक कोंडी लोकांच्या अंगवळणी पडल्याने ग्राहकांची या बाजारात विनातक्रार खरेदी सुरूच असते. सततच्या वाहतुक कोंडीमुळे हा बाजार येथील दिडशे फुट मार्गावरील सुभाषचंद्र बोस मैदानाजवळ स्थलांतरीत करण्याचा निर्णय पालिकेने घेतला होता. सुरक्षिततेच्या कारणसास्तव त्याला पोलिसांकडुन नकारघंटा मिळाल्याने हा बाजार जैसे थे आहे. शिवाय या बाजारामुळे बाजार कर वसुल करणा-या कंत्राटदारांचे चांगभले होत असल्याने बाजाराच्या स्थलांतराला अप्रत्यक्षपणे विरोध केला जात आहे. हवी तशी कर वसुली होत असली तरी या बाजारात चांगले ग्राहक तसेच उत्पन्न मिळत असल्याने विक्रेते या बाजारात वस्तू विकण्यासाठी प्रत्येक आठवड्याला आवर्जून येत असतात. दर आठवड्याला बाजारात होणा-या गर्दीवरून विक्रेत्याची उलाढाल प्रत्येकी किमान दीड हजार ते कमाल २५ हजार रु. इतकी होत असते. नेहमी ग्राहकांच्या गर्दीने फुललेला हा बाजार १३ नोव्हेंबरच्या रविवारी तुरळक गर्दीचा दिसला. गेल्या ९ नोव्हेंबरपासून बंदी घालण्यात आलेल्या हजार, पाचशेच्या नोटा मिळविण्यासाठी व्यस्त असलेल्या ग्राहकांनी यंदाच्या बाजाराकडे पाठ फिरविल्याची चर्चा विक्रेत्यांमध्ये सुरु होती. परंतु, ज्यांनी नोटा बदलुन घेतल्या, त्यांतील काहींनी बाजारात जाणे पसंत केले. त्यातही बदलुन मिळालेल्या नवीन नोटा दोन हजारांच्या असल्याने सुट्टे पैशांअभावी विक्रेत्यांनी त्या स्विकारल्या नसल्याचे सांगितले. एका बाजुला लोकांची बँकांच्या बाहेर गर्दी तर आठवडा बाजार ग्राहक मंदीचा असल्याचे दिसुन आले. अपेक्षित ग्राहकांअभावी अनेक विक्रेते ग्राहकांच्या प्रतिक्षेत बसुन होते. याबाबत विक्रेते अफजल खान म्हणाले, यापुर्वीच्या आठवडा बाजारात दुपारी एक पर्यंत किमान १५ हजार रुपयांचा व्यवसाय होत होता, तो यंदा केवळ नोटांच्या गोंधळामुळे ग्राहक रोडावल्याने १० टक्के सुद्धा झाला नाही. तसेच विक्रेते शिवलाल यादव म्हणाले, अनेक ग्राहक जुन्या हजार, पाचशेच्या नोटा देत होते. तर काही दोन हजारांच्या नोटा देत होते. जुन्या नोटा स्वीकारल्या नसल्या तरी नवीन नोटा सुट्या पैशांअभावी परत कराव्या लागल्या. यामुळे व्यवसायावर विपरित परिणाम झाला.