शहरं
Join us  
Trending Stories
1
'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
2
सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?
3
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
4
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
5
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
6
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी चालवली रिक्षा
7
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
8
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
9
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
10
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
11
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
12
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
13
KKR vs RR : मसल पॉवर रसेलनं दाखवली ताकद; फिफ्टीसह मारली गंभीरच्या खास क्बमध्ये एन्ट्री
14
House Arrest Controversy: FIR दाखल केल्यानंतर उल्लू अ‍ॅपकडून माफीनामा, म्हणाले- "आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की..."
15
वरातीहून परतत असलेली कार झाडावर आदळली, हवाई दलाच्या कर्मचाऱ्यासह चार जणांचा मृत्यू, एक जण जखमी
16
IPL 2025: आयपीएलमध्ये सर्वात जलद अर्धशतक ठोकणारे ५ कॅरेबियन खेळाडू, पाहा फोटो
17
सलग १५ तास साधला प्रसारमाध्यमांशी संवाद, पत्रकार परिषदेत या देशाच्या राष्ट्रपतींनी बनवला रेकॉर्ड
18
कल्याणमध्ये ३५ वर्षीय महिलेची इमारतीच्या १७व्या मजल्यावरून उडी; थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
19
संजय राऊतांनी घेतली भेट; फोटो शेअर करत शरद पवारांनी दिली माहिती, नेमके कारण तरी काय?
20
Ram Naik Resigns: राम नाईक यांचा मत्स्योद्योग विकास धोरण समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा

बंडखोर लागले ‘भाव’ खायला

By admin | Updated: October 1, 2014 00:22 IST

विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेनंतर अचानक भाजपा व शिवसेना युती आणि काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी तुटली.

पुणो : विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेनंतर अचानक भाजपा व शिवसेना युती आणि काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी तुटली. त्यामुळे विधानसभेसाठी अनेक इच्छुकांनी बंडखोरी करून अपक्ष उमेदवारी अर्ज भरले आहेत. अटीतटीची निवडणूक असल्याने अपक्ष उमेदवारांचे माघारीसाठी ‘भाव’ वधारले आहेत. पक्षाच्या मोठय़ा नेत्यांचा फोन आला पाहिजे, निवडणुकीच्या तयारीचा खर्च निघाला पाहिजे; अन्यथा ठोस आश्वासनाशिवाय माघारी न घेण्याची अपेक्षा उमेदवारांना आहे. 
यंदा पहिल्यांदाच शहरातील आठही मतदारसंघांत पंचरंगी निवडणूक होत आहे. प्रत्येक मतदारसंघात अनेक बंडखोरांनी अपक्ष म्हणून अर्ज भरला आहे. त्यामुळे पक्षाचा अधिकृत उमेदवार दोन दिवसांपासून संबंधितांची समजूत काढण्यावर भर देत आहेत. त्यानंतर प्रमुख पक्षाचे शहराध्यक्ष व पदाधिकारी यांच्याकडूनही बंडखोरी शमविण्यासाठी बैठका सुरू आहेत. उद्या अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे मंगळवारी रात्रीपासूनच अपक्ष  बंडखोरांना शांत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, माघारीचा दिवस जवळ आल्याने अपक्ष उमेदवारांचा भाव वाढत चालला आहे. काँग्रेसमधील शिवाजीनगर, पर्वती, कोथरूड व हडपसर मतदार संघासह सर्वच मतदारसंघांत बंडखोरांना शांत करण्याचे प्रमुख पक्षांचे शहराध्यक्ष यांचे काम 
सुरू आहे. उद्या दुपारी 3 र्पयत 
बंडखोरी मिटविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न होतील. (प्रतिनिधी)
 
च्राज्यात पंचरंगी लढतीमुळे कोणाची सत्ता येणार, हे अनिश्चित असल्यामुळे प्रत्येक इच्छुकाला आमदार होण्याची आशा आहे. परंतु, पक्षातून एकाच इच्छुकाला उमेदवारी मिळाली आहे. त्यामुळे बंडखोरी करून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणा:यांना विधान परिषदेच्या आश्वासनांचे वेध लागले आहेत.