शहरं
Join us  
Trending Stories
1
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
2
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
3
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
4
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
5
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
6
५७ केंद्रीय विद्यालयांना केंद्राने दिली मंजुरी; महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांचा यादीत समावेश
7
अनुकंपाच्या तब्बल ५,१८७ उमेदवारांना मिळणार नियुक्तिपत्रे; एकाच दिवशी १० हजार जण नोकरीत हाेणार रुजू
8
ट्रम्प यांच्या योजनेला हमास मान्यता देईना; इस्रायलने गाझावर केलेल्या हल्ल्यात १६ जण ठार
9
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
10
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
11
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
12
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
13
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
14
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
15
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
16
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
17
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
18
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
19
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
20
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल

हवामान बदलाचे शेतीवर दुष्परिणाम

By admin | Updated: March 27, 2015 23:42 IST

हवामानातील बदलांमुळे भविष्यात शेतीवर परिणाम होईल. शेतातील पीकपद्धती आणि पावसाच्या प्रमाणात बदल होणार आहे. बाष्प उत्सर्जनाचे प्रमाण वाढेल.

पुणे : हवामानातील बदलांमुळे भविष्यात शेतीवर परिणाम होईल. शेतातील पीकपद्धती आणि पावसाच्या प्रमाणात बदल होणार आहे. बाष्प उत्सर्जनाचे प्रमाण वाढेल. शेतीचा पोत कमी होऊन, उत्पादनक्षमता कमी होईल. हे धोके टाळण्यासाठी त्या दृष्टीने सकारात्मक पावले टाकण्याची गरज आहे, अशी अपेक्षा पर्यावरण तज्ज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांनी शुक्रवारी व्यक्त केली. ‘हवामानबदल : सामाजिक-आर्थिक परिप्रेक्षातून’ या विषयावर आयोजित प्रा. पी. आर. पिशारोटी व्याख्यानात ते बोलत होते. ‘इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ ट्रॉपिकल मेट्रॉलॉजी’ चे (आयआयटीएम) संचालक डॉ. एम. राजीवन, इंडियन मेट्रॉलॉजिकल सोसायटी पुणे चॅप्टरचे अध्यक्ष ए. के. सहाय यावेळी उपस्थित होते. डॉ. गाडगीळ म्हणाले, ‘लोकसंख्या हे भारतातील हवामान बदलांचे मूळ कारण आहे. त्यामुळे मूलभूत स्रोतांवरचा ताण वाढत आहे. त्यातून सार्वजनिक आरोग्याच्या समस्या गंभीर स्वरूप धारण करत आहेत. हवामानातील बदलांमुळे भविष्यात शेतीवर परिणाम होईल. शेतातील पीकपद्धती आणि पावसाच्या प्रमाणात बदल होणार आहे. बाष्प उत्सर्जनाचे प्रमाण वाढेल. शेतीचा पोत कमी होऊन, शेतजमीन क्षारपड होऊन तिची उत्पादन क्षमता कमी होईल. हे धोके टाळण्यासाठी सकारात्मक पावले टाकण्याची गरज आहे. सेंद्रिय शेती हा त्यावरचा एक प्रभावी मार्ग आहे. यासारख्या पर्यावरणपूरक शेतीला सरकारने प्रोत्साहन दिले पाहिजे.’ पैशाच्या वाढत्या हव्यासामुळे गोव्यासारख्या प्रदेशात यांत्रिक नौका खोल समुद्रात बेसुमार मासेमारी करीत आहेत. त्यामुळे समुद्रात तेलाचे प्रदूषण होत आहे, असे त्यांनी सांगितले. ४हवामान बदलांचा परिणाम वन आणि वन्य प्राण्यांवरदेखील होणार आहे. त्यासाठी समाजाने पुढाकार घेऊन केलेले सामूहिक प्रयत्न आणि वन हक्क कायद्याची काटेकोर अंमलबजावणी यातून देशातील वनक्षेत्राचे संवर्धन केले पाहिजे. ४देशातील वनांच्या संवधर्नासाठी सामूहिक प्रयत्नांची नितांत आवश्यकता आहे. पाचगाव (जि. चंद्रपूर) ने याचा वस्तुपाठ घालून दिला आहे, असेही ते म्हणाले.