शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

हवामान बदलाचे शेतीवर दुष्परिणाम

By admin | Updated: March 27, 2015 23:42 IST

हवामानातील बदलांमुळे भविष्यात शेतीवर परिणाम होईल. शेतातील पीकपद्धती आणि पावसाच्या प्रमाणात बदल होणार आहे. बाष्प उत्सर्जनाचे प्रमाण वाढेल.

पुणे : हवामानातील बदलांमुळे भविष्यात शेतीवर परिणाम होईल. शेतातील पीकपद्धती आणि पावसाच्या प्रमाणात बदल होणार आहे. बाष्प उत्सर्जनाचे प्रमाण वाढेल. शेतीचा पोत कमी होऊन, उत्पादनक्षमता कमी होईल. हे धोके टाळण्यासाठी त्या दृष्टीने सकारात्मक पावले टाकण्याची गरज आहे, अशी अपेक्षा पर्यावरण तज्ज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांनी शुक्रवारी व्यक्त केली. ‘हवामानबदल : सामाजिक-आर्थिक परिप्रेक्षातून’ या विषयावर आयोजित प्रा. पी. आर. पिशारोटी व्याख्यानात ते बोलत होते. ‘इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ ट्रॉपिकल मेट्रॉलॉजी’ चे (आयआयटीएम) संचालक डॉ. एम. राजीवन, इंडियन मेट्रॉलॉजिकल सोसायटी पुणे चॅप्टरचे अध्यक्ष ए. के. सहाय यावेळी उपस्थित होते. डॉ. गाडगीळ म्हणाले, ‘लोकसंख्या हे भारतातील हवामान बदलांचे मूळ कारण आहे. त्यामुळे मूलभूत स्रोतांवरचा ताण वाढत आहे. त्यातून सार्वजनिक आरोग्याच्या समस्या गंभीर स्वरूप धारण करत आहेत. हवामानातील बदलांमुळे भविष्यात शेतीवर परिणाम होईल. शेतातील पीकपद्धती आणि पावसाच्या प्रमाणात बदल होणार आहे. बाष्प उत्सर्जनाचे प्रमाण वाढेल. शेतीचा पोत कमी होऊन, शेतजमीन क्षारपड होऊन तिची उत्पादन क्षमता कमी होईल. हे धोके टाळण्यासाठी सकारात्मक पावले टाकण्याची गरज आहे. सेंद्रिय शेती हा त्यावरचा एक प्रभावी मार्ग आहे. यासारख्या पर्यावरणपूरक शेतीला सरकारने प्रोत्साहन दिले पाहिजे.’ पैशाच्या वाढत्या हव्यासामुळे गोव्यासारख्या प्रदेशात यांत्रिक नौका खोल समुद्रात बेसुमार मासेमारी करीत आहेत. त्यामुळे समुद्रात तेलाचे प्रदूषण होत आहे, असे त्यांनी सांगितले. ४हवामान बदलांचा परिणाम वन आणि वन्य प्राण्यांवरदेखील होणार आहे. त्यासाठी समाजाने पुढाकार घेऊन केलेले सामूहिक प्रयत्न आणि वन हक्क कायद्याची काटेकोर अंमलबजावणी यातून देशातील वनक्षेत्राचे संवर्धन केले पाहिजे. ४देशातील वनांच्या संवधर्नासाठी सामूहिक प्रयत्नांची नितांत आवश्यकता आहे. पाचगाव (जि. चंद्रपूर) ने याचा वस्तुपाठ घालून दिला आहे, असेही ते म्हणाले.