शहरं
Join us  
Trending Stories
1
"कोणतीही अघोरी शक्ती आली तरी मराठी माणसांची..."; 'या' महापालिकांमध्ये मनसे-शिवसेना एकत्र लढणार?
2
सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
3
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
4
काँग्रेस-NCPशी आघाडी करून मविआत सामील का झालो?; उद्धव ठाकरेंनी सांगितले मोठे ‘राज’कारण
5
VIDEO: ऑलिम्पिक पदकविजेती मनु भाकरने व्हायोलिनवर वाजवलं भारताचं राष्ट्रगीत, होतंय कौतुक
6
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
7
एकमेव भारतीय क्रिकेटपटू ज्याने १५ ऑगस्ट रोजी ठोकलंय शतक, कोण आहे तो?
8
"साहेब मी जिवंत आहे..."; मतदार यादीत ज्याला मृत घोषित केले, तो थेट निवडणूक कार्यालयात पोहचला
9
"... मग त्यासाठी जितेंद्र आव्हाड शरद पवार यांचा निषेध करणार का?"; भाजपाचा खरमरीत सवाल
10
"राष्ट्रगीत सुरू असताना असं उभं राहतात का?", स्वातंत्र्यदिन साजरा करताना शिल्पा शेट्टीच्या बहिणीकडून मोठी चूक, नेटकऱ्यांनी चांगलंच सुनावलं
11
डबेवाला बांधवांना २५.५० लाखांत ५०० चौरस फुटांचे घर; CM देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
12
नवी जबाबदारी मिळताच नवाब मलिक अ‍ॅक्शन मोडवर; बैठका घेत मुंबई महापालिका निवडणूक कामाला लागले
13
पश्चिम बंगालमध्ये ट्रक आणि बसमध्ये भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, ३० जण जखमी
14
सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया, अर्जुन अन् छोटंसं कुत्र्याचं पिल्लू... पाहा UNSEEN PHOTOS
15
Independence Day 2025: "वंद्य वंदे मातरम्...", ७९व्या स्वातंत्र्यदिनाच्या सलील कुलकर्णींनी दिल्या सुरेल शुभेच्छा
16
बाबो! क्रिती सनॉनने मुंबईत खरेदी केलं पेंटहाऊस, किंमत ऐकून पायाखालची जमीनच सरकेल
17
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
18
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
19
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
20
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य

हवामान बदलाचे शेतीवर दुष्परिणाम

By admin | Updated: March 27, 2015 23:42 IST

हवामानातील बदलांमुळे भविष्यात शेतीवर परिणाम होईल. शेतातील पीकपद्धती आणि पावसाच्या प्रमाणात बदल होणार आहे. बाष्प उत्सर्जनाचे प्रमाण वाढेल.

पुणे : हवामानातील बदलांमुळे भविष्यात शेतीवर परिणाम होईल. शेतातील पीकपद्धती आणि पावसाच्या प्रमाणात बदल होणार आहे. बाष्प उत्सर्जनाचे प्रमाण वाढेल. शेतीचा पोत कमी होऊन, उत्पादनक्षमता कमी होईल. हे धोके टाळण्यासाठी त्या दृष्टीने सकारात्मक पावले टाकण्याची गरज आहे, अशी अपेक्षा पर्यावरण तज्ज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांनी शुक्रवारी व्यक्त केली. ‘हवामानबदल : सामाजिक-आर्थिक परिप्रेक्षातून’ या विषयावर आयोजित प्रा. पी. आर. पिशारोटी व्याख्यानात ते बोलत होते. ‘इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ ट्रॉपिकल मेट्रॉलॉजी’ चे (आयआयटीएम) संचालक डॉ. एम. राजीवन, इंडियन मेट्रॉलॉजिकल सोसायटी पुणे चॅप्टरचे अध्यक्ष ए. के. सहाय यावेळी उपस्थित होते. डॉ. गाडगीळ म्हणाले, ‘लोकसंख्या हे भारतातील हवामान बदलांचे मूळ कारण आहे. त्यामुळे मूलभूत स्रोतांवरचा ताण वाढत आहे. त्यातून सार्वजनिक आरोग्याच्या समस्या गंभीर स्वरूप धारण करत आहेत. हवामानातील बदलांमुळे भविष्यात शेतीवर परिणाम होईल. शेतातील पीकपद्धती आणि पावसाच्या प्रमाणात बदल होणार आहे. बाष्प उत्सर्जनाचे प्रमाण वाढेल. शेतीचा पोत कमी होऊन, शेतजमीन क्षारपड होऊन तिची उत्पादन क्षमता कमी होईल. हे धोके टाळण्यासाठी सकारात्मक पावले टाकण्याची गरज आहे. सेंद्रिय शेती हा त्यावरचा एक प्रभावी मार्ग आहे. यासारख्या पर्यावरणपूरक शेतीला सरकारने प्रोत्साहन दिले पाहिजे.’ पैशाच्या वाढत्या हव्यासामुळे गोव्यासारख्या प्रदेशात यांत्रिक नौका खोल समुद्रात बेसुमार मासेमारी करीत आहेत. त्यामुळे समुद्रात तेलाचे प्रदूषण होत आहे, असे त्यांनी सांगितले. ४हवामान बदलांचा परिणाम वन आणि वन्य प्राण्यांवरदेखील होणार आहे. त्यासाठी समाजाने पुढाकार घेऊन केलेले सामूहिक प्रयत्न आणि वन हक्क कायद्याची काटेकोर अंमलबजावणी यातून देशातील वनक्षेत्राचे संवर्धन केले पाहिजे. ४देशातील वनांच्या संवधर्नासाठी सामूहिक प्रयत्नांची नितांत आवश्यकता आहे. पाचगाव (जि. चंद्रपूर) ने याचा वस्तुपाठ घालून दिला आहे, असेही ते म्हणाले.