शहरं
Join us  
Trending Stories
1
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
2
'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
3
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
4
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
5
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
6
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?
7
झेलेन्स्की यांना बोलावले, पुतिन यांच्याशीही पुन्हा चर्चा करणार; अलास्का बैठकीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची नवी तयारी
8
घर खरेदीचा प्लॅन करत असलेल्यांच्या स्वप्नांना SBI चा मोठा झटका...; RBI नं दिलासा देऊनही होम लोनचा टक्का वाढवला!
9
Dewald Brevis Fastest Fifty Record : 'बेबी एबी'चं वादळी अर्धशतक; ११ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
10
'शोले'तल्या भूमिकेसाठी या मराठमोळ्या अभिनेत्याला पैशांऐवजी देण्यात आलेला फ्रिज, वाचा हा किस्सा
11
Trump Putin: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतीन यांना दिलं पत्नी मेलानिया यांचं पत्र; 'त्या' पत्रात काय लिहिलंय?
12
५ हजारांपासून ४० हजार कोटींपर्यंतचा प्रवास: 'बिग बुल' राकेश झुनझुनवालांना उगाचचं नव्हते म्हणत दलाल स्ट्रीटचे जादूगार
13
आता स्टील आणि सेमीकंडक्टरवरही टॅरिफ लावणार ट्रम्प? अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचं उत्तर ऐकून वाढेल संपूर्ण जगाचं टेन्शन!
14
'विरोधकांची विकास विरोधी हंडी जनतेने फोडली'; उपमुख्यमंत्री शिंदेंचा महाविकास आघाडीवर हल्ला
15
Barvi Dam: ठाणेकरांची चिंता मिटली! बारवी धरण १०० टक्के भरले; सात दरवाजे उघडले
16
‘बंगाल फाइल्स’चा ट्रेलर लॉन्च होताच कोलकात्यात वाद, बोलवावे लागले पोलीस, विवेक अग्निहोत्री म्हणाले...  
17
Shravan Somvar 2025: इच्छित मनोकामनापूर्तीसाठी शेवटच्या श्रावणी सोमवारी चुकवू नका 'हा' उपाय!
18
'वाळवा तालुका स्वाभिमानी, सहजासहजी वाकत नाही, लढाई शेवटपर्यंत...', जयंत पाटलांचा अजितदादांसमोर टोला
19
NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?
20
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; कॅश पासून फ्री चेकबुकपर्यंतचे नियम बदलले, जाणून घ्या

रेल्वेमध्ये ‘रेडी टू इट’ पदार्थ

By admin | Updated: July 18, 2016 04:59 IST

मेल-एक्स्प्रेसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दर्जेदार खाद्यपदार्थ मिळावेत, यासाठी आयआरसीटीसीकडून (इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम)‘रेडी टू इट’खाद्यपदार्थ देणारी सेवा सुरू केली

मुंबई : मेल-एक्स्प्रेसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दर्जेदार खाद्यपदार्थ मिळावेत, यासाठी आयआरसीटीसीकडून (इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम)‘रेडी टू इट’खाद्यपदार्थ देणारी सेवा सुरू केली आहे. रेल्वे प्रवासादरम्यान खाद्यपदार्थांचे पाकीट प्रवाशांना मिळेल आणि ते प्रवाशांसमोरच उकळत्या पाण्यात पाच मिनिटे ठेवून त्यांच्यासमोरच उघडले जाईल. प्रथम गरीब रथ एक्स्प्रेसमध्ये ही सेवा सुरू करण्यात आली असून, अन्य ट्रेनमध्ये सेवा लवकरच सुरू केली जाईल, अशी माहिती आयआरसीटीसीकडून देण्यात आली. आयआरसीटीसीकडून या पूर्वीच खाद्यपदार्थांची सेवा देणारी ‘फूड आॅन ट्रॅक’नावाने ई-कॅटरिंग सेवा सुरू केली आहे. ट्रेनमध्ये आवडते खाद्यपदार्थ मिळवण्यासाठी आयआरसीटीसीच्या वेबसाइटद्वारे, तसेच १८00१0३४१३९ किंवा १३९ वर एसएमएस पाठवून सेवेचा लाभ प्रवाशांना घेता येत आहे. २0१६ मध्ये जून महिन्यापर्यंत २२ हजार ४११ जणांनी जेवणाची आॅर्डर दिली आणि एकूण ४५ हजार ९५५ साठी जेवण देण्यात आले. प्रत्येक दिवशी सरासरी २४९ जेवणाच्या आॅर्डर येत आहेत. रेल्वेच्या देशभरातील सगळ्या झोनमधून एकूण १ लाख १३ हजार ८८४ आॅर्डर आल्या आहेत. असे असतानाच आयआरसीटीसीकडून ‘रेडी टू इट’नावाने आणखी एक खाद्यपदार्थ पुरवणारी सेवा सुरू करण्यात आली आहे. जूनअखेरीस आयआरसीटीसीने म्हैसूर येथील डिफेन्स फूट रिसर्च लॅबोरेटरीसह करार केला असून, त्यानुसार आरोग्यदायक पदार्थ तयार करण्याचे तंत्रज्ञान रेल्वेतील खाद्यपदार्थांसाठी वापरता येईल, अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. रेडी टू इटद्वारे प्रवाशांना बंद पाकिटातून खाद्यपदार्थ दिले जातील. खाद्यपदार्थांतील घटकांची पोषणमूल्ये अबाधित ठेवून नवीन तंत्रज्ञानानुसार ते पदार्थ गोठवण्यात आलेले असल्याने, बंद पाकिटांसह पदार्थ उकळत्या पाण्यात पाच मिनिटे ठेवावी लागतील आणि त्यानंतरच ते पाकिटातून बाहेर काढून प्रवाशांना खावे लागतील. यामुळे पदार्थाचा दर्जा चांगला राहील आणि आरोग्याला हानीही पोहोचू शकणार नाही, असा दावा आयआरसीटसीकडून करण्यात आला आहे. त्यानुसार, शाकाहारी बिर्याणी, राजमा-भात आणि डाळ-भात प्रवाशांना मिळेल.>प्रवाशांनी मागणी केलेले बंद पाकिटातील जेवण हे १५0 ग्रॅम ते ३00 ग्रॅमपर्यंत मिळेल. त्याची किंमत ही ४0 रुपये एवढी असेल. हे पाकीट प्रवाशांसमोरच उकळत्या पाण्यात ठेवले जाईल आणि त्यांच्यासमोरच ते उघडले जाणार आहे. त्यामुळे रेल्वेला पॅन्ट्री डबा जोडण्याचीही गरज लागणार नाही.