शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: लखनौच्या अडचणीत वाढ, दुखापतीमुळं मयांक यादव आयपीएलमधून बाहेर!
2
अफगाणिस्तानने नोंदवला पहलगाम हल्ल्याचा निषेध; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा
3
Shiv Sena: पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील संशयितांची माहिती देणाऱ्याला १० लाख रुपयांचे बक्षीस
4
भारताचा तुर्कीला दणका, विमानतळांवर सेवा देणाऱ्या सेलेबी कंपनीची सुरक्षा मंजुरी केली रद्द!
5
बिहार दौऱ्यात राहुल गांधी यांच्याविरोधात दोन गुन्हे दाखल, पोलिसांनी शंभराहून अधिक जणांना केलं आरोपी
6
India Pakistan Ceasefire: "भारत-पाकिस्तान यांच्यात १८ मेपर्यंत शस्त्रसंधी"; पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री डार यांचे विधान
7
आधी ट्रम्प यांच्यावर भडकली, नंतर पोस्ट डिलीट; कंगना म्हणाली, "जेपी नड्डांनी डिलीट करायला सांगितली"
8
ED Raid: 23 कोटींचं सोनं, 8 कोटी रोख; वसई विरार मनपाचे नगररचना उपसंचालक रेड्डीकडे सापडली कोट्यवधींची माया
9
Donald Trump : "मी असं म्हणत नाही की..."; भारत-पाकिस्तान युद्धविरामावर मोठे दावे करणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांची पलटी
10
सुटी रद्द झाल्याने कामावर परतणाऱ्या मेजरवर काळाचा घाला; डोळ्यादेखत पत्नीचा मृत्यू, लेक गंभीर जखमी
11
'पाकिस्तानशी फक्त दहशतवाद अन् PoK वर चर्चा होईल; तिसऱ्याचा हस्तक्षेप खपवून घेणार नाही'
12
'गदर'मधला दरम्यान सिंग आठवतोय का? एका आजारामुळे झालं होत्याचं नव्हतं, अभिनेत्याचा झाला दुर्देवी शेवट
13
व्यापाऱ्यांनी कोणाच्या धमकीला भीक घालू नये; आम्ही तुमच्या पाठीशी आहोत - देवेंद्र फडणवीस
14
इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; 'लेडी सेहवाग'ला मिळाली कमबॅकची संधी
15
अटक करण्याची धमकी देत मागितली खंडणी: उल्हासनगर पोलीस ठाण्यातील दोन पोलीस निलंबित
16
Crime: निवृत्त न्यायाधीशाच्या दोन मुले आणि सुनेला जन्मठेपेची शिक्षा; 2007 मधील प्रकरण काय?
17
Motivational Story: वडिलांचं सायकल दुरूस्तीचं दुकान, कष्टाची जाणीव ठेवून मुलानं दहावीत मिळवले घवघवीत यश
18
आश्चर्यकारक! आरोपीने बलात्कार पिडितेला भरकोर्टात केलं 'प्रपोज'; सर्वोच्च न्यायालयातील प्रसंग
19
"बेटा, सरेंडर कर", दहशतवाद्याने चकमकीआधी आईला केलेला Video कॉल; तिने समजावलं पण...
20
Shahapur: डोंगरावरून उडणारा ड्रोन अचानक कोसळला अन् गावात उडाली खळबळ; तो ड्रोन कोणाचा?

रेल्वेमध्ये ‘रेडी टू इट’ पदार्थ

By admin | Updated: July 18, 2016 04:59 IST

मेल-एक्स्प्रेसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दर्जेदार खाद्यपदार्थ मिळावेत, यासाठी आयआरसीटीसीकडून (इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम)‘रेडी टू इट’खाद्यपदार्थ देणारी सेवा सुरू केली

मुंबई : मेल-एक्स्प्रेसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दर्जेदार खाद्यपदार्थ मिळावेत, यासाठी आयआरसीटीसीकडून (इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम)‘रेडी टू इट’खाद्यपदार्थ देणारी सेवा सुरू केली आहे. रेल्वे प्रवासादरम्यान खाद्यपदार्थांचे पाकीट प्रवाशांना मिळेल आणि ते प्रवाशांसमोरच उकळत्या पाण्यात पाच मिनिटे ठेवून त्यांच्यासमोरच उघडले जाईल. प्रथम गरीब रथ एक्स्प्रेसमध्ये ही सेवा सुरू करण्यात आली असून, अन्य ट्रेनमध्ये सेवा लवकरच सुरू केली जाईल, अशी माहिती आयआरसीटीसीकडून देण्यात आली. आयआरसीटीसीकडून या पूर्वीच खाद्यपदार्थांची सेवा देणारी ‘फूड आॅन ट्रॅक’नावाने ई-कॅटरिंग सेवा सुरू केली आहे. ट्रेनमध्ये आवडते खाद्यपदार्थ मिळवण्यासाठी आयआरसीटीसीच्या वेबसाइटद्वारे, तसेच १८00१0३४१३९ किंवा १३९ वर एसएमएस पाठवून सेवेचा लाभ प्रवाशांना घेता येत आहे. २0१६ मध्ये जून महिन्यापर्यंत २२ हजार ४११ जणांनी जेवणाची आॅर्डर दिली आणि एकूण ४५ हजार ९५५ साठी जेवण देण्यात आले. प्रत्येक दिवशी सरासरी २४९ जेवणाच्या आॅर्डर येत आहेत. रेल्वेच्या देशभरातील सगळ्या झोनमधून एकूण १ लाख १३ हजार ८८४ आॅर्डर आल्या आहेत. असे असतानाच आयआरसीटीसीकडून ‘रेडी टू इट’नावाने आणखी एक खाद्यपदार्थ पुरवणारी सेवा सुरू करण्यात आली आहे. जूनअखेरीस आयआरसीटीसीने म्हैसूर येथील डिफेन्स फूट रिसर्च लॅबोरेटरीसह करार केला असून, त्यानुसार आरोग्यदायक पदार्थ तयार करण्याचे तंत्रज्ञान रेल्वेतील खाद्यपदार्थांसाठी वापरता येईल, अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. रेडी टू इटद्वारे प्रवाशांना बंद पाकिटातून खाद्यपदार्थ दिले जातील. खाद्यपदार्थांतील घटकांची पोषणमूल्ये अबाधित ठेवून नवीन तंत्रज्ञानानुसार ते पदार्थ गोठवण्यात आलेले असल्याने, बंद पाकिटांसह पदार्थ उकळत्या पाण्यात पाच मिनिटे ठेवावी लागतील आणि त्यानंतरच ते पाकिटातून बाहेर काढून प्रवाशांना खावे लागतील. यामुळे पदार्थाचा दर्जा चांगला राहील आणि आरोग्याला हानीही पोहोचू शकणार नाही, असा दावा आयआरसीटसीकडून करण्यात आला आहे. त्यानुसार, शाकाहारी बिर्याणी, राजमा-भात आणि डाळ-भात प्रवाशांना मिळेल.>प्रवाशांनी मागणी केलेले बंद पाकिटातील जेवण हे १५0 ग्रॅम ते ३00 ग्रॅमपर्यंत मिळेल. त्याची किंमत ही ४0 रुपये एवढी असेल. हे पाकीट प्रवाशांसमोरच उकळत्या पाण्यात ठेवले जाईल आणि त्यांच्यासमोरच ते उघडले जाणार आहे. त्यामुळे रेल्वेला पॅन्ट्री डबा जोडण्याचीही गरज लागणार नाही.