शहरं
Join us  
Trending Stories
1
'कशाला रोडमॅप? आजच अंमलबजावणी करा!'; जरांगे-मुख्यमंत्र्यांचे OSD यांच्यात काय चर्चा झाली?
2
दिवाळीपूर्वी मोठी भेट! कपडे, खाद्यपदार्थांवरील GST ५% होणार? 'या' वस्तू आणि सेवांवरील टॅक्सही घटणार
3
जम्मूच्या दोडा येथे ढगफुटी; डोंगरावरून आलेल्या पुरात चार जणांचा मृत्यू, १० हून अधिक घरे वाहून गेली
4
Pune: लक्ष्मी रोडवरील थरार... गर्दीत बस येताच चालकाला ह्रदयविकाराचा झटका; पोलीस धावले अन्...
5
वाह! आयुष्य असावं तर 'या' क्रिकेटरसारखं...; ६ महिने आराम अन् पगार मिळतो २७ कोटी
6
तंत्रज्ञानाची किमया! इंटरनेटशिवाय WhatsApp कॉल; गुगलचा आश्चर्याचा धक्का, काय आहे प्लॅन?
7
Ganpati Puja 2025: घरी स्थापन केलेल्या बाप्पाची दररोज पूजा कशी करावी? ‘या’ गोष्टींचे पालन आवश्यकच
8
अर्जुन-सानिया यांच्या साखरपुड्यासंदर्भातील फिरकी घेणारा प्रश्न अन् सचिन तेंडुलकरचा 'स्ट्रेट ड्राइव्ह'
9
उकडीचे की तळणीचे मोदक? वाद मोठा जहाल, पण दोन्ही मोदक आरोग्याच्या हिताचे; वाचा फायदे
10
मेड इन इंडिया! मारुतीची पहिली इलेक्ट्रिक कार अखेर लॉन्च, परदेशातही निर्यात होणार
11
डोनाल्ड ट्रम्प यांचा हट्टीपणा, अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ लागू; भारत 'चौफेर' पलटवार करणार?
12
गणेश चतुर्थी २०२५: गुरुजींना उशीर झाला? रेकॉर्डेट कंटेट नको? स्वतःच करा गणपती प्राणप्रतिष्ठा
13
चीनमध्ये शक्तीप्रदर्शन; मोदी, पुतिन आणि जिनपिंग एकाच व्यासपीठावर, अमेरिकेला लागणार मिरची
14
गणपती २०२५: ६ मूलांकांना ८ राजयोग शुभ, दुपटीने चौफेर लाभ; धनलक्ष्मी-गणेश कृपेचा वरदहस्त!
15
पैसै घेऊन मूर्तीकार पळाला, कारखाना जैसे थे ठेवला; ऐनवेळी मूर्ती कुठून आणायची, गणेशभक्तांना चिंता
16
Nikki Murder Case : निक्कीला जाळणाऱ्या विपिनच्या कुटुंबाचं सर्वात मोठं खोटं पकडलं; तपासात 'अशी' झाली पोलखोल
17
‘या’ ३ तारखांना जन्मलेले लोक भाग्यवान, पैसा कमी पडत नाही; गणपती देतो अपार सुख, लक्ष्मी वरदान!
18
कॅनरा बँकेला ११७ कोटींचा गंडा; अमित थेपाडेला अटक, ईडीची दक्षिण मुंबईतील हॉटेलमध्ये कारवाई
19
मेड इन इंडिया 'ई-विटारा'ची १०० देशांमध्ये होणार निर्यात; पंतप्रधान मोदी म्हणाले, "भारताच्या आत्मनिर्भर आणि..."
20
भयंकर! बांगलादेशात नदीमध्ये सापडतायेत मृतदेह; आतापर्यंत ७५० बॉडी पोलिसांनी मोजल्या, कारण काय?

माझ्यासारखा वाचक आउटडेटेड झालाय

By admin | Updated: December 20, 2015 00:18 IST

सध्या वृत्तपत्रांमध्ये वृत्ताला आणि मताला प्राधान्य दिले जात नाही. ती जागा आता ‘पेज थ्री’ संस्कृतीने घेतली आहे. त्यामुळे वृत्तपत्रात अग्रलेखालाही महत्त्व उरले नसल्याने माझ्यासारखा

पुणे : सध्या वृत्तपत्रांमध्ये वृत्ताला आणि मताला प्राधान्य दिले जात नाही. ती जागा आता ‘पेज थ्री’ संस्कृतीने घेतली आहे. त्यामुळे वृत्तपत्रात अग्रलेखालाही महत्त्व उरले नसल्याने माझ्यासारखा वाचक आऊटडेटेड बनला आहे, अशी खंत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शनिवारी पुण्यात व्यक्त केली.पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या नूतनीकरण केलेल्या कमिन्स सभागृहाचे उद्घाटन पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. पवार म्हणाले, पूर्वीचे पहिले पान वाचनीय असायचे. दुसऱ्या पानावर उद्या काय छापून येणार, याबाबतही प्रचंड उत्सुकता असायची. एखाद्या घटनेचे अथवा राजकीय घडामोडीचे वार्तांकन कोणता पत्रकार उद्या काय करेल, याबाबत वाचकांमध्ये उत्सुकता असे. मात्र, आता व्यावसायिकतेच्या वा जाहिरातीच्या या युगात पहिले पान सोडूनच पुढे जावे लागते. अग्रलेख हा गायब झाल्यासारखाच असून, त्याला दुय्यम स्थान प्राप्त झाले आहे. मागे दिल्ली प्रवासात एका वतर्मानपत्राच्या संपादकांशी भेट झाली. त्यांना अग्रलेखाबाबत विचारले असता त्याची आता काही गरज नसून, ‘पेज थ्री’ आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. काय वाचावे, याचा सध्या शोध घ्यावा लागत असल्याचे त्यांनी सांगितले.शासन वेगळया वाटेवर जात असेल तर त्याला ताळयावर आणण्याची तसेच प्रसंगी शासनाची धोरणे बदलण्याची ताकद शोधपत्रकारितेत आहे, असेही ते म्हणाले. (प्रतिनिधी)