शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

आत्मविश्वास वाढवायचाय!.. या 8 गोष्टी वाचा

By admin | Updated: March 19, 2017 09:05 IST

काही जणांमध्ये न्यूनगंडामुळे आत्मविश्वासाची कमी भासत असते व ते स्वतःला कमी लेखू लागतात. म्हणूनच आत्मविश्वास वाढवणं गरजेचं असतं...

ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 19 - यशस्वी जीवनासाठी आत्मविश्‍वास एक खूप महत्त्वाचा गुण आहे. यश शिखर सर करणा-या बहुतेकांमध्‍ये हा गुण आढळतो. आत्मविश्‍वास एक असा गुण आहे जो प्रत्येकात कमी-अधिक प्रमाणात असतो. मात्र सध्‍याची आत्मविश्‍वासाची पातळी वाढवून ती आणखी वाढवली जाऊ शकते. जर तुमचा स्वतःवर विश्वास असेल तर कोणतीही गोष्ट तुम्ही सहज मिळवू शकता. अनेक यशस्वी व्यक्ती या फक्त आत्मविश्वासामुळे मोठ्या झालेल्या असतात. पण काही जणांमध्ये न्यूनगंडामुळे आत्मविश्वासाची कमी भासत असते व ते स्वतःला कमी लेखू लागतात. म्हणूनच आत्मविश्वास वाढवणं गरजेचं असतं...टेन्शन नही लेने का : सतत हसत रहा. तुम्हाला कितीही टेन्शन असलं तरी ते चेहऱ्यावर दिसू देऊ नका. लोकांशी प्रेमाने बोला व वागा. अपयश आलं तरी त्याचा त्रास करून घेऊ नका. कारण टेन्शन घेतलं कि आत्मविश्वास कमी होत असतो.पेहरावाकडे लक्ष द्या : तुम्ही कोणत्या प्रकारचे कपडे परिधान करता त्याचा तुमच्या आत्मविश्‍वासावर परिणाम होत असतो. चांगले दिसण्‍यांने तुम्ही लोकांना आत्मविश्‍वासाने सामोरे जाऊ शकता. कारण चारचौघात आपण कसे दिसतो अशा शंकांमुळे न्यूनगंड निर्माण होत असतो. म्हणून पेहरावाकडे लक्ष द्या.यशस्वी लोकांकडे लक्ष द्या : तुमच्या आसपास अशी लोक असतात ज्यांना पाहून तुम्हाला वाटते ती व्य‍क्ती आत्मविश्‍वासाने पूर्ण आहे. अशा लोकांकडे लक्ष्‍य द्या आणि ती करत असलेल्या गोष्‍टी तुमच्या दैनंदिन आयुष्‍यात फॉलो करा. जसे की चालणे, बसणे, बोलताना आय कॉन्टॅक्ट यावर जास्त लक्ष द्या.प्रयत्न करा : एखादी गोष्ट जमत नसेल तर तिला सोडून देऊ नका, ती पूर्ण करण्यासाठी निदान प्रयत्न तरी करा. कारण प्रयत्न केल्यावरही अपयश आलं तरी त्यातून मिळालेला अनुभवातून तुम्हाला खूप शिकवून जातो. म्हणून प्रयत्न करणं कधीही सोडू नका.तुलना करूच नका : स्वतःची दुसऱ्या व्यक्तीबरोबर कधीच तुलना करूच नका. कारण समोरचा कसा आहे हे फक्त समोरून दिसत असते. त्याच्याबाबत पूर्ण सत्य आपल्याला माहिती नसते म्हणून त्याच्याशी तुलना करू नका.मान्य करायला शिका : बदल करण्यासाठी व आत्मविश्वास वाढण्यासाठी कोणतीही गोष्ट मान्य करायला पाहिजे. जसे कि, एखादी गोष्ट तुम्हाला येत नसेल तर तुम्ही ती मान्य करा उगाच मिरवत बसू नका. यामुळे पोपट झाल्यास न्यूनगंड निर्माण होतो. दाबलेल्या आवाजात बोलू नका : तुम्ही जर दबलेल्या आवाजात बोलत असाल तर तर ते आजच बंद करा. कारण यामुळे आपण आपला आत्मविश्वास गमावून बसतो. म्हणून बिनधास्त बोला.स्वत:ची स्तुती करा : दररोज सकाळी आरशासमोर उभे राहून तुमच्यात असलेले सर्व चांगले गुण आठवा व स्वतःची स्तुती करा. यामुळे आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.