शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

वाचा, कल्पना करा, लिहा!

By admin | Updated: January 19, 2016 03:18 IST

‘‘वाचनातून आपण माणूस म्हणून घडत असतो. आपल्या व्यक्तिमत्त्वाचा विकास होत असतो. याउलट टीव्हीमुळे कल्पनाशक्तीला कुंपण घातले जाते.

प्रज्ञा केळकर-सिंग, ज्ञानोबा-तुकारामनगरी (पिंपरी)‘‘वाचनातून आपण माणूस म्हणून घडत असतो. आपल्या व्यक्तिमत्त्वाचा विकास होत असतो. याउलट टीव्हीमुळे कल्पनाशक्तीला कुंपण घातले जाते. लोकांनी आपल्यावर टीका केली, तरी सकारात्मकतेने आयुष्याला सामोरे जा. भरपूर वाचा, मनाला आणि बुद्धीला खाद्य पुरवा, अनुभवसमृद्ध व्हा आणि मग लिहिते व्हा’’ असा गुरुमंत्र लेखक चेतन भगत यांनी गप्पांच्या ओघात तरुणाईला दिला.साहित्य संमेलनाच्या आतापर्यंतच्या इतिहासात प्रथमच ‘यूथ आयकॉन’ अशी ओळख असलेल्या लेखक चेतन भगत यांचा तरुणाईशी खास संवाद आयोजित करण्यात आला होता. चेतन भगत यांनी आयुष्याचे विविध टप्पे, अनुभव, पुस्तकांमागील विचारप्रक्रिया याबाबत दिलखुलासपणे एक एक पदर उलगडला. संमेलनातील ही मुलाखत सर्वाधिक रंगली आणि खुलली.मराठीतून रसिकांना अभिवादन करत त्यांनी सर्वांची मने जिंकून घेतली. ‘प्रेमाला नसते भाषेचे कुंपण, तिथे असते शब्दांची गुंफण’ असे सांगत त्यांनी संवाद साधला.मराठी संस्कृतीचे तोंडभरून कौतुक करताना चेतन भगत म्हणाले, ‘‘आजकाल मुलांसमोर मनोरंजनाचे अनेक पर्याय उपलब्ध झाल्याने त्यांचे मन स्थिर नाही. त्यांना कंटाळा येण्याची भयंकर भीती वाटते. त्यांच्या कल्पनाविलासावर मर्यादा येतात. मुलांना चिमण्यांपेक्षा ‘अँग्री बर्ड’ जास्त जवळचा वाटतो. यातून बाहेर काढण्यासाठी मुलांना वाचनाची सवय लागली पाहिजे. एकाग्रता नसेल, तर चांगला विद्यार्थी घडत नाही.’’चेतन भगत यांनी तरुणांना स्वत:च स्वत:चे प्रेरणास्थान बनण्याचा मैत्रीचा सल्ला दिला. मनाचा आवाज ऐका आणि पुढे जा. प्रत्येक जण आपल्याबद्दल मते नोंदवत असतो. ‘ऐकावे जनाचे, करावे मनाचे’ हे सूत्र डोक्यात ठेवून वाटचाल केल्यास यश नक्कीच मिळेल, असे त्यांनी सांगितले. याच वेळी स्वत:च्या संस्कृतीवर प्रेम कराच; पण, इतरांच्या संस्कृतीचा अनादर करू नका, असेही सांगितले. आजच्या तरुणांनी चतुर व्हावे की रांचो? असे विचारले असता, या दोन्हींचा प्रत्येकाने समतोल साधला पाहिजे, असा युक्तिवाद चेतन भगत यांनी केला. ते म्हणाले, ‘‘प्रत्येक तरुणामध्ये चतुर आणि रांचो वसलेला आहे. या दोहोंचा समतोल कसा साधायचा, ही हातोटी शिकली पाहिजे. जीवनात बरेच धक्के खावे लागतात. एक रस्ता बंद झाला, तर दुसरा खुला होतोच. त्यामुळे नैराश्याला जीवनातून डिलिट करा. आयुष्यात भरपूर मजा करा. पण, भविष्याकडेही गांभीर्याने पाहा. करिअरची अनेक दालने तरुणांसमोर खुली आहेत. अशा वेळी मनाचा आवाज ऐका आणि आत्मविश्वासाने पुढे जा.’’आकडे आणि कृष्णचेतन भगत यांच्या प्रत्येक पुस्तकाच्या नावात आकड्यांचा वापर केलेला असतो. तसेच, पुस्तकातील नायकाचे नाव कृष्णाच्या नावाशी निगडित असते. याबाबत छेडले असता ते म्हणाले, ‘‘मी इंजिनिअरिंगचा विद्यार्थी आहे आणि बँकेतही काम केले आहे. त्यामुळे आकड्यांशी जवळचा संबंध आहे. याच आकडेमोडीच्या आठवणी पुस्तकांच्या नावांमधून मी जपतो. माझे कृष्णावर खूप प्रेम आहे. एका पुस्तकाचा खप १ कोटी असेल आणि प्रत्येक पुस्तकात नायकाचे नाव किमान ६० वेळा वापरले जात असेल, तर माझ्यामुळे ६०० कोटी वेळा कृष्णाचा जप केला जातो.’’यावर पडल्या टाळ्या!माझे वय राहुल गांधींपेक्षा कमी आहे. त्यामुळे ते ‘मोस्ट इलिजिबल बॅचलर’ आहेत, तोवर मीही तरुणच राहणार!भारतात असेच घडते...एखादी मुलगी आवडते, खास ठरते, पण ती पूर्ण गर्लफ्रेंड नसते. तेव्हा आम्ही तिला ‘हाफ गर्लफ्रेंड’ म्हणतो!अभिनेत्याचे केवळ रंग-रूप पाहिले जाते; तर लेखकाचे विचार परावर्तित होतात. नायकापेक्षा जीवनाचे तत्त्वज्ञान सांगणारे विवेकानंद जास्त भावतात.