शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रेमभंग झालेल्या युवतीनं १२ राज्यातील पोलिसांची झोप उडवली; समोर आली कहाणी, कोण आहे 'ती'?
2
पतीने 'ती' गोष्ट लपवली; पत्नीला कळताच सरळ पोलीस स्टेशनला गेली! तक्रार करत म्हणाली... 
3
६००० कर्मचाऱ्यांना काढूनही 'या' कंपनीचं मन भरलं नाही, आता पुन्हा एकदा कपातीची टांगती तलवार
4
"राज-उद्धव ठाकरे बंधूंनी कितीही कार्यक्रम घ्या, मुंबईचा महापौर उत्तर भारतीयच होणार"
5
"मला विश्वास बसत नाहीये...", शेफाली जरीवालाच्या निधनाने श्रेयस तळपदेला बसला मोठा धक्का
6
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
7
"त्यावेळी आम्ही मनात आणलं असतं तर..."; महापौरपदाबाबत देवेंद्र फडणवीसांचा पहिल्यांदाच खुलासा
8
Ashadhi Ekadashi 2025: तुकाराम महाराजांना बाप्पाच्या मूर्तीत दिसले पांडुरंगाचे रूप; तेव्हा...
9
ओमानचा ऐतिहासिक निर्णय; ७ लाख भारतीयांवर थेट परिणाम होणार!
10
रिक्षाचालकाने शेअर केला असा व्हिडीओ, थेट अमेरिकेतून भारतात पोलिसांकडे आली तक्रार, त्यानंतर...  
11
ENG W vs IND W : स्मृती मानधना सगळ्यात भारी! जाणून घ्या भारत-इंग्लंड यांच्यातील खास रेकॉर्ड
12
कोल्हापुरी चप्पलेतून कर्रकर्र आवाज का येतो, तुम्हाला माहितेय का? ९९ टक्के लोक फेल!
13
९४ वर्षीय अब्जाधीश वॉरेन बफेंचा मोठा निर्णय, दान केले ६ बिलियन डॉलर्सचे शेअर्स
14
"हे मराठीचं प्रेम नाही, तर महापालिका निवडणुका..."; देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
15
शेतीच्या वादातून रक्तरंजित संघर्ष, पुतण्यानं माय-लेकाची केली हत्या; आरोपीनेही आयुष्य संपवलं
16
"ठेच लागल्यावर 'आई गं' म्हणायचं की 'ओ मेरी माँ'...", पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीला केदार शिंदेंचा तीव्र विरोध
17
डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल मिळेल का, काय वाटतं? यापूर्वी कोणत्या राष्ट्राध्यक्षांना मिळाले नोबेल?
18
मुंबई: मृत मुलाच्या वीर्यासाठी आईची धडपड, सेंटरने वीर्य देण्यास नकार दिल्यानंतर न्यायालयात धाव
19
SL vs BAN : मॅचसह मालिका गमावली अन् लगेच कॅप्टन्सी सोडली! पहिल्या टेस्टमध्ये बेस्ट खेळीसह रचला होता इतिहास
20
भांडूपमधील जादूटोणा प्रकरण: अटकेनंतर पोलीस ठाण्यातच दाम्पत्याकडून मंत्रोच्चार, वैभव आणि हर्षदाला पोलिसांनी घडवली अद्दल

रद्द नोटा स्वीकारण्यास रिझर्व्ह बँकेचा नकार

By admin | Updated: January 2, 2017 18:44 IST

३० डिसेंबरपर्यंत बदलवू किंवा निर्धारित बँकेत जमा करू न शकलेले नागरिक या नोटा रिझर्व्ह बँकेत ३१ मार्च २०१७ पर्यंत जमा करू शकतील

ऑनलाइन लोकमतनागपूर, दि. 2 - रद्द झालेल्या ५०० व १००० च्या जुन्या नोटा ३० डिसेंबरपर्यंत बदलवू किंवा निर्धारित बँकेत जमा करू न शकलेले नागरिक या नोटा रिझर्व्ह बँकेत ३१ मार्च २०१७ पर्यंत जमा करू शकतील, असे स्पष्ट निर्देश केंद्र सरकारच्या अर्थ मंत्रालयाने दिले होते. मात्र रिझर्व्ह बँकेने आता या नोटा स्वीकारण्यास स्पष्ट नकार दिला आहे. ही सवलत केवळ विदेशात राहणाऱ्या भारतीयांसाठी (एनआरआय) असल्याचे आरबीआयकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे सोमवारी नागपुरातील आरबीआयच्या कार्यालयात जुन्या नोटा जमा करण्यासाठी गेलेल्या नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ नोव्हेंबरला ५०० व १००० च्या नोटा रद्द करण्याच्या निर्णयाची घोषणा केली. नागरिकांजवळ असलेल्या जुन्या नोटा ते ३० डिसेंबरपर्यंत बँकांमध्ये बदलवू किंवा जमा करू शकणार होते. जे नागरिक ठरलेल्या मुदतीत त्यांच्याजवळच्या जुन्या नोटा बदलवू अगर खात्यात जमा करू शकले नाहीत त्यांच्यासाठी ३१ मार्चपर्यंत रिझर्व्ह बँकेच्या कार्यालयात त्या नोटा बदलण्याची किंवा जमा करण्याची सवलत पंतप्रधानांनी त्यावेळी जाहीर केली होती. केंद्र सरकारच्या अर्थ मंत्रालयाने तसे परिपत्रकही काढले होते. प्रसार माध्यमांकडूनही त्यानुसार प्रचार करण्यात आला होता. मात्र आतापर्यंत अनेक वेळा नवीन घोषणा करणाऱ्या सरकारप्रमाणेच रिझर्व्ह बँकेने नवीन परिपत्रक काढून रद्द झालेल्या नोटा स्वीकार करण्यास नकार दिला आहे. या ना त्या कारणाने ५० दिवसांत जुन्या नोटा बदलू अगर खात्यात जमा करू न शकलेल्या नागरिकांनी ३० डिसेंबरची मुदत संपल्यानंतर सोमवारी रिझर्व्ह बँकेकडे धाव घेतली. दोन दिवस सुट्या असल्याने सोमवारी बँक उघडताच नागपूरच्या रिझर्व्ह बँक कार्यालयासमोर लोकांची गर्दी जमा झाली. रद्द झालेल्या ५०० व १००० च्या नोटा घेऊन काही लोक त्या बदलण्यासाठी तर काही त्या नोटा खात्यात जमा करण्यासाठी आले होते. मात्र रिझर्व्ह बँकेने या नोटा जमा करण्यास स्पष्ट नकार दिला. ३१ मार्चपर्यंतची सवलत विदेशात राहणारे भारतीय किंवा ९ नोव्हेंबर ते ३० डिसेंबरच्या काळात विदेशात असलेल्या नागरिकांसाठीच असल्याचे नोटीसच बँकेने कार्यालयासमोर लावले आहे. त्यामुळे नोटाबदलीसाठी बँकेत आलेल्या नागरिकांनी प्रचंड संताप व्यक्त केला. आरबीआयने वेळेवर अशाप्रकारची नोटीस लावून सामान्य नागरिकांना फसविल्याचा आरोप नागरिकांनी केला.