शहरं
Join us  
Trending Stories
1
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
2
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
3
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
4
पाकिस्तानात निसर्गाचा हाहाकार; मुसळधार पाऊस अन् पुरामुळे 1 हजारहून अधिक जणांचा मृत्यू
5
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7७ लाख कोटींची कमाई
6
भारताविरोधात गन सेलिब्रेशन करणाऱ्या पाकिस्तानच्या फरहानचा माजोरडेपणा कायम, आता म्हणाला....
7
काँग्रेसचे नेते आणि हिमाचलमधील मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी केलं दुसरं लग्न, कोण आहे त्यांची दुसरी पत्नी?
8
डीजेचा मोठा आवाज ठरेल जीवघेणा; हार्ट अटॅक, ब्रेन हॅमरेजचा धोका, फुटू शकते मेंदूची नस
9
चार्ली किर्कच्या शोकसभेत पत्नीने केलं अनपेक्षित विधान; एरिका किर्क म्हणाल्या," त्या तरुणाला मी..."
10
“युद्धाची गरजच भासणार नाही, एक दिवस POKतील जनता म्हणेल की आम्ही भारतवासी आहोत”: राजनाथ सिंह
11
जुगाराच्या व्यसनामुळे बनला 'चोर'; वडिलांशी खोटं बोलून मित्रांच्या नावाने घेतलं ३३ लाखांचं कर्ज
12
टाटा-महिंद्राच्या कंपनीचे शेअर आपटले! पण अदानींचा 'हा' स्टॉक ठरला टॉप गेनर; IT क्षेत्राला सर्वाधिक फटका
13
मेट्रोचे सर्व टप्पे २०२६च्या अखेरपर्यंत प्रवाशांकरता खुले होतील- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
14
“आता रिकामे ठेवू नका, काहीतरी जबाबदारी द्या, चुकलो असेन तर...”; धनंजय मुंडेंची भरसभेत विनंती
15
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
16
VIDEO: आईची माया! सिंहीणने रेडकूवर घातली झडप, म्हशीने शिंगाने लावलं उडवून अन् पुढे...
17
बगरम हवाई तळावर अमेरिकेचा 'डोळा'; ट्रम्प यांना आता का हवंय अफगाणिस्तानचं 'एअरफील्ड'?
18
ज्या सुटकेसवर बसून रील बनवलं, त्यातच तिला भरून नदीत फेकलं; लव्हस्टोरीचा भयंकर शेवट
19
कहो ना कहो...! इमरान हाश्मीसमोर गाताना राघव जुयालच्या डोळ्यात आलेलं पाणी, म्हणाला...
20
आजपासून स्वस्त झालं Rail Neer; जीएसटी रिव्हिजननंतर रेल्वेनं कमी केली MRP

आरबीआयचे अधिकारीच सुट्टीवर

By admin | Updated: November 13, 2016 21:52 IST

केंद्र शासनाच्या निर्णयामुळे बँक कर्मचा-यांनी शनिवारी, रविवारी सुट्टी असताना नागरिकांच्या सेवेसाठी रात्रंदिवस काम केले.

ऑनलाइन लोकमतपुणे, दि. 13 - केंद्र शासनाच्या निर्णयामुळे बँक कर्मचा-यांनी शनिवारी, रविवारी सुट्टी असताना नागरिकांच्या सेवेसाठी रात्रंदिवस काम केले. मात्र नोटा बदलून घेण्यासाठी देशातील कोट्यावधी नागरिक बँकांसमोर रांगा लावून उभे असताना रिझर्व बँक आॅफ इंडियाच्या (आरबीआय)अधिका-यांनी सुट्टी घेतली,त्यामुळेच बँकांपर्यंत पैसे पोहचले नाहीत,असा आरोप करत आॅल इंडिया बँक एम्पॉईज असोसिएशनचे उपाध्यक्ष विश्वास उटगी यांंनी शासनाचे या प्रकरणाची वरिष्ठ स्तरावर चौकशी करावी, अशी मागणी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या घोषणेनंतर देशातील सर्व नागरिक आणि बँक कर्मचा-यांनी सहकार्याची भूमिका दाखवत बँकांचे व्यवहार सुरू केले. नोटा बंदच्या पार्श्वभूमीवर शासन आदेशानुसार बँक कर्मचा-यांनी सुट्टी रद्द करून शनिवारी व रविवारी सकाळी 8 ते रात्री 12 वाजेपर्यंत काम केले. नागरिकांनी संयम दाखवत निमुटपणे बँकांच्यासमोर रांगा लावल्या. मात्र आरबीआयकडून बँकांकडे रक्कम न आल्याने ती नागरिकांना देता आली नाही. त्यामुळे संपूर्ण देश कामाला लागलेला असताना आरबीआयच्या अधिका-यांनी बँकांकडे रक्कम पाठवली नाही,असा आरोप उटगी यांनी केला. तसेच संबंधित प्रकाराची चौकाशी करून संबंधितांवर कारवाई करावी, असे लोकमतशी बोलताना सांगितले.उटगी म्हणाले, काळा पैसा बाहेर यावा,भष्टाचार कमी व्हावा आणि दहशतवादाला आळा बसावा या उद्देशाने केंद्र शासनाने नोटा बंद करण्याचा निर्णय घेतल्याचे जाहीर केले. त्यात राष्ट्रीयकृत बँकांसह सर्व सहकारी बँकांनीही सहकार्य करण्याची भूमिका दाखवली. मात्र अनेक बँकांकडे पैसेच पोहचलू शकले नाही. परिणामी नागरिकांचे हाल झाले. त्यामुळे ज्या अधिकारी घेतलेल्या सुट्टीमुळे बँकांपर्यंत पैसे पोहचू शकले नाहीत, त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.