शहरं
Join us  
Trending Stories
1
‘शटडाऊन’च्या पहिल्याच दिवशी अमेरिकेत संकट; देशातील अनेक महत्त्वाची पर्यटनस्थळे तात्पुरती बंद
2
‘बाबा’कडे तसले टॉय, पॉर्न सीडी, अश्लील चॅट अन्... चैतन्यानंदच्या चौकशीतून धक्कादायक माहिती बाहेर
3
सर्व राज्यांत मतदार यादीतून हटवणार मृत व्यक्तींची नावे; जन्म-मृत्यू नोंदणी कार्यालयाचा डेटा निवडणूक यंत्रणेशी जोडणार
4
हिंसा हे प्रश्नांचे उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य आहे : सरसंघचालक डॉ. मोहन भागवत
5
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
6
Sana Mir Controversial Comment : सनाची Live मॅच वेळी वादग्रस्त कमेंट; ICC तिला नोकरीवरून काढणार?
7
केवळ लठ्ठपणाच नव्हे, तर मुलांच्या यकृतातील चरबी ठरतेय गंभीर आजारांसाठी आमंत्रण!
8
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
9
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
10
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
11
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
12
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
13
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
14
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
15
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
16
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
17
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
18
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
19
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
20
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा

मुंबईतील अनधिकृत फ्लॅटधारकांना आशेचा किरण

By admin | Updated: June 26, 2014 00:46 IST

मुंबईतील कॅम्पा कोलावासीयांना कुणाकडूनच दिलासा मिळेनासा झाला असतानाच केंद्रातील भाजपाप्रणीत रालोआ सरकारच्या रूपात येथील नागरिकांना आशेचा किरण दिसू लागला आह़े

हरीश गुप्ता - नवी दिल्ली
मुंबईतील कॅम्पा कोलावासीयांना कुणाकडूनच दिलासा मिळेनासा झाला असतानाच केंद्रातील भाजपाप्रणीत रालोआ सरकारच्या रूपात येथील नागरिकांना आशेचा किरण दिसू लागला आह़े कॅम्पा कोलावासीयांची समस्या सोडविण्याच्या दृष्टीने महाराष्ट्रातील पृथ्वीराज चव्हाण सरकारला सवरेतोपरी मदतीचे संकेत रालोआ सरकारने दिले आहेत़
केवळ कॅम्पा कोलातील 96 अनधिकृत फ्लॅटधारकांनाच नव्हे तर या धर्तीवर विविध न्यायालयांत अडकून पडलेल्या प्रकरणांवर दिलासा देण्याच्या दृष्टीने केंद्रातील रालोआ आणि महाराष्ट्रातील काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकार राजकीय मतभेद दूर सारून कामाला लागले आहेत.राज्य सरकारने या मुद्यावर  संपर्क केल्यानंतर केंद्राने त्यास सकारात्मक प्रतिसाद दिला. दिल्लीत आले असता मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी या मुद्यावर मोदी सरकारमधील काही मंत्र्यांशी संपर्क केल्याचे कळत़े संबंधित फाईल अॅटर्नी जनरल मुकुल रोहतगी यांच्याऐवजी सॉलिसिटर जनरल रणजित कुमार यांच्याकडे पाठविण्यात येईल, असे त्यांना सांगण्यात आल़े मुकुल रोहतगी यांनी सर्वोच्च न्यायालयात कॅम्पा कोलावासीयांचे प्रतिनिधित्व केले होत़े त्यामुळे हे प्रकरण ते हाताळू इच्छित नाही़ त्यानंतर हे प्रकरण रणजित कुमार यांच्याकडे पाठविण्यात येणार आह़े रणजित कुमार सध्या लंडनच्या खासगी दौ:यावर असून 6 जुलैला परतणार आहेत़  सूत्रंनी दिलेल्या माहितीनुसार, सर्वोच्च न्यायालयासमक्ष एकत्रित प्रयत्नांवर सहमती मिळविण्यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
कॅम्पा कोला सोसायटीत केवळ पाच मजल्यांची परवानगी असताना त्यापेक्षा अधिक मजले बांधण्यात आल़े हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचल्यानंतर न्यायालयानेही येथील 96 अनधिकृत फ्लॅट पाडण्याचे आदेश दिले आहेत़ याउपरही कॅम्पा कोलावासीय फ्लॅट वाचविण्यास आंदोलन करीत आहेत़
तूर्तास कॅम्पा कोलावासीयांना शांततापूर्वक त्यांचे फ्लॅट खाली करून प्रशासनास सहकार्य करण्याचे राज्य सरकार व स्थानिक प्रशासनाकडून सांगण्यात आले आह़े तुमचा मुद्दा गंभीर आह़े पण सद्यस्थितीत सर्वोच्च न्यायालयाकडून त्वरित दिलासा मिळण्याची कुठलीही शक्यता नाही, असा सल्लाही त्यांना दिला गेला आह़े 96 फ्लॅटचा ताबा मिळाल्याचा स्थिती अहवाल राज्य सरकारला सर्वोच्च न्यायालयात सादर करावयाचा आह़े
सोसायटीच्या रहिवाशांना दिलासा देण्याच्या दृष्टीने विविध पर्याय आणि कायदेशीर सल्ले विचारात घेतले जात आहेत़ सोसायटीतील सात इमारतींचे परिसरालगतच्या भूखंडासोबत एकत्रित करून चटईक्षेत्र निर्देशांक (एफएसआय) वाढवून देण्याचा एक पर्याय विचाराधीन आह़े पर्यायी भूखंड मान्य होणार वा नाही, हेही बघितले जात आह़े एका अन्य पर्यायाअंतर्गत येथील अनधिकृत फ्लॅटधारक, बिल्डर्स तसेच अवैध बांधकामात साथ देणारे महापालिका आणि राज्य सरकारच्या अधिका:यांविरुद्ध कठोर दंडात्मक कारवाईचाही विचार सुरू आह़े
 
मुंबई शहरातच नव्हे तर देशभर मोठय़ा प्रमाणात अनधिकृत बांधकामे आहेत़ हा एक गंभीर प्रश्न असून तो निकाली काढणो गरजेचे आह़े यासंदर्भात निश्चित धोरण ठरवल्यास अशा बांधकामाचा फटका बसलेल्या लोकांना कोर्टाच्या पाय:या ङिाजवाव्या लागणार नाही, सोबतच सरकारी तिजोरीतील ओघही वाढेल़
 
राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयाचा आदेश फिरवत आहे किंवा त्यात हस्तक्षेप करीत असल्याचे वाटू नये, असे महाराष्ट्र सरकारचे प्रयत्न आहेत़ दुसरीकडे राज्य सरकारकडून योग्य प्रस्ताव येईर्पयत केंद्र सरकार या प्रकरणात कुठलाही हस्तक्षेप करू शकत नाही, असे केंद्रीय नेत्यांनी स्पष्ट केले आह़े