शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
4
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
5
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
6
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
7
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
8
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
9
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
10
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
11
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
12
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
13
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
14
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
15
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
16
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
17
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
18
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
19
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
20
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...

रवी पुजारी टोळीचे आणखी चार हस्तक गजाआड

By admin | Updated: April 20, 2015 02:35 IST

उल्हासनगरमधील व्यापाऱ्याला फोन करून तसेच एसएमएस पाठवून पाच कोटींच्या खंडणीची मागणी करणाऱ्या रवी पुजारीच्या आणखी चार

ठाणे : उल्हासनगरमधील व्यापाऱ्याला फोन करून तसेच एसएमएस पाठवून पाच कोटींच्या खंडणीची मागणी करणाऱ्या रवी पुजारीच्या आणखी चार हस्तकांना ठाणे खंडणीविरोधी पथकाने अटक केली. त्यांच्याकडून दोन पिस्तूल, पाच जिवंत काडतुसे, दोन चॉपर आणि पाच मोबाइल असा ऐवज हस्तगत केल्याची माहिती पोलिसांनी दिली.अटकेतील हनुमान म्हात्रे हा अवैध रेती उत्खनन व बांधकाम साहित्याचा व्यवसाय करणारा आहे. तसेच तो या व्यवसायातील साथीदार गौरवच्या मदतीने बांधकाम व्यावसायिकांची माहिती म्हात्रेला देत होता. तसेच म्हात्रे ती काशिराम पाशीला देऊन तो रवी पुजारीकडे पोहोचवत असे. मग, रवी पुजारीकडून संबंधित व्यावसायिकांना फोन येत असल्याची माहिती तपासात उघडकीस आली. काशिराम हा मुंबईतील सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर खून, खुनाचा प्रयत्न, खंडणी, गोळीबार अशा प्रकारचे ५० पेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत. तसेच त्याच्यावर यापूर्वी मकोकान्वये कारवाई करण्यात आली असून त्याच्याकडून चॉपर, दोन मोबाइल फोन पोलिसांनी हस्तगत केले आहेत. गौरव याच्यावर खून, खुनाचा प्रयत्न तसेच बेकायदेशीर पिस्तूल बाळगणे असे गुन्हे दाखल आहेत. त्याच्याकडून एक पिस्तूल, ३ जिवंत काडतुसे व मोबाइल असा ऐवज मिळाला आहे. कैलास याच्यावरही खंडणीचे दोन गुन्हे दाखल असून त्याच्याकडून १ पिस्तूल, २ जिवंत काडतुसे व दोन मोबाइल हस्तगत केले आहेत. तसेच हनुमान याच्यावर खुनाचे, मारामारीचे गुन्हे दाखल असून त्याच्याकडे एक चॉपर आणि मोबाइल मिळाल्याची माहिती पोलिसांनी दिली. ही कारवाई खंडणीविरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक एन.टी. कदम यांच्या पथकाने केली. (प्रतिनिधी)