शहरं
Join us  
Trending Stories
1
आता दोघांनीही थांबावे; डोनाल्ड ट्रम्प यांची भारत-पाकिस्तानमध्ये पुन्हा मध्यस्थीची ऑफर
2
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
3
भारताच्या एअर स्ट्राईकमुळे पाकिस्तानमध्ये कितीजण मृत्युमुखी पडले? आकडा आला समोर  
4
बहावलपूरवरील हल्ला पाकिस्तानी सैन्याच्या लागलाय जिव्हारी, कापलं गेलंय नाक, कारण काय?
5
पाकिस्तानच्या गोळीबारात भारतीय जवान शहीद; डॉक्टरांनी वाचविण्याचा खूप प्रयत्न केला...
6
नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून आगळीक, भारतीय नागरिकांच्या मृत्यूनंतर चोख प्रत्युत्तर देण्याचे लष्कराला आदेश 
7
‘ऑपरेशन सिंदूर’ला नागपुरातील ‘नागास्त्र-१’चे बळ ? टेहळणीसोबतच लक्ष्याचा भेद करण्याची क्षमता
8
पॉवरप्लेमध्ये अर्धा संघ तंबूत परतल्यावरही CSK नं काढली मॅच; प्लेऑफ्स शर्यतीत KKR तळ्यात मळ्यात
9
Operation Sindoor 2.0: पाकिस्तानला सहजासहजी सोडणार नाही भारत, आणखी काय-काय घडणार?
10
Thank You Rohit Sharma! हिटमॅनच्या कसोटी निवृत्तीनंतर कोण काय म्हणाले? वाचा सविस्तर
11
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे अवसान गळाले, आता म्हणतात, "आम्ही संयम पाळू, तणाव आणखी वाढता नये’’  
12
मुरिदकेमध्ये बड्या दहशतवाद्याचा खात्मा? पाकिस्तानी सैन्यातील अधिकाऱ्यांची अंत्ययात्रेला हजेरी   
13
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
14
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
15
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
16
Operation Sindoor Live Updates: रक्ताच्या एकेक थेंबाचा बदला घेऊन, शाहबाज शरीफ यांची भारताला धमकी
17
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
18
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
19
अजिंक्य रहाणेचं अर्धशतक हुकलं; पण IPL मध्ये ५ हजार धावांचा पल्ला गाठत मारली खास क्लबमध्ये एन्ट्री
20
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."

रत्नागिरीचा निकाल ९६.३४ टक्के

By admin | Updated: June 9, 2015 00:59 IST

दहावी परीक्षा : जिल्ह्याचे दणदणीत यश

रत्नागिरी : स्थापनेपासून राज्यात अव्वल स्थान राखणाऱ्या कोकण बोर्डात दहावी परीक्षेत रत्नागिरी जिल्ह्याचा क्रमांक दुसरा असला तरी ९६.३४ टक्के निकालाने जिल्ह्याची मान उंचावली आहे. रत्नागिरीच्या सिद्धी बाळकृष्ण झोरे हिने बोर्डात अव्वल येऊन जिल्ह्याच्या यशाला आणखीनच झळाळी दिली आहे.महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या कोकण विभागीय मंडळातर्फे घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत रत्नागिरी जिल्ह्यातून २६ हजार ८३७ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी २५ हजार ८५५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. एकूण निकाल ९६.३४ टक्के इतका लागला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातून १२ हजार ९५० विद्यार्थी परीक्षेला बसले होते, पैकी १२ हजार ५५४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्याचा निकाल ९६.९४ टक्के इतका लागला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याने निकालाच्या टक्केवारीत रत्नागिरीपेक्षा ०.०६ टक्क्याने बाजी मारत अव्वल स्थान मिळविले आहे. उत्कृष्ट यशामुळे सर्वच शाळांमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले होते. (प्रतिनिधी)सायबर कॅफेत गर्दी निकाल पाहण्यासाठी विद्यार्थी व पालकांनी सायबर कॅफेत गर्दी केली होती. स्मार्ट फोनमुळे बहुतांश घरात इंटरनेट सुविधा असल्यामुळे सकाळपासूनच निकाल पाहण्याची उत्सुकता लागली होती. दुपारी एक वाजता निकाल संकेतस्थळावर उपलब्ध होताच नंबर पाहण्यासाठी प्रत्येकाची घाई सुरू होती.१३७ शाळांचा निकाल १०० टक्केरत्नागिरी जिल्ह्यातील एकूण ३८७ शाळांमधील १३७ शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे. एकूण २६ हजार ८३७ विद्यार्थ्यांपैकी ६ हजार १४ विद्यार्थ्यांनी विशेष गुणवत्ताप्राप्त केली आहे. प्रथम श्रेणीत ९ हजार ६१५, व्दितीय श्रेणीत ८ हजार २३१, तृतीय श्रेणीत १९९५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.मुलींचा झेंडारत्नागिरी जिल्ह्यातून १३ हजार ८६८ मुलगे परीक्षेला बसले होते, पैकी १३ हजार ३३३ मुले उत्तीर्ण झाले आहेत. मुलांच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ९६.१४ टक्के इतके आहे. तसेच जिल्ह्यातून १२ हजार ९६९ विद्यार्थिनी परीक्षेला बसल्या होत्या, पैकी १२ हजार ५२२ विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या आहेत. मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ९६.५५ टक्के इतके आहे. मुलांपेक्षा मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ०.४१ टक्क्यांनी अधिक आहे. पुनर्परीक्षार्थींचा निकाल ५१.१६ टक्के रत्नागिरी जिल्ह्यातून १२९८ विद्यार्थी पुनर्परीक्षेसाठी बसले होते, पैकी ६६४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, एकूण निकाल ५१.१६ टक्के इतका लागला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातून ३७१ पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती, पैकी १८९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, ५०.९४ टक्के इतका निकाल लागला आहे.