शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election : महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका कधी होणार? समोर आली मोठी अपडेट
2
रशियाने इराणला का मदत केली नाही? राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी सांगितले कारण! म्हणाले...
3
युद्धाच्या मैदानात आता 'मच्छर' उतरवणार चीन?; असं तंत्रज्ञान ज्याचा अमेरिकेने विचारही केला नसेल
4
ना पाकिस्तान, ना अफगाणिस्तान, मग इराणपर्यंत कसे पोहोचले B-2 बॉम्बर? खुद्द अमेरिकेनेच केला खुलासा
5
तुमच्या आधार कार्डवरुन कोणी कर्ज घेतलंय का? लगेच तपासा; ही आहे प्रोसेस
6
निवृत्तीनंतरही जगा 'राजासारखं'! 'या' ५ सरकारी पेन्शन योजना तुम्हाला आयुष्यभर देतील पैसाच पैसा!
7
IT क्षेत्राला मोठा धक्का! इन्फोसिस, TCS, विप्रोचे शेअर्स धडाधड कोसळले; अमेरिकन कंपनीच्या एका निर्णयाचा फटका
8
Gold Silver Price 23 June: इराण-इस्रायल युद्धादरम्यान सोन्या-चांदीच्या दरात तेजी; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणच्या फोर्डोसह तीन ठिकाणांवर अमेरिकेने हल्ले चढविले, पण या ठिकाणाकडे ढुंकूनही पाहिले नाही...
10
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यामुळे घाबरला पाकिस्तान; शाहबाज शरीफ यांनी बोलावली तातडीची बैठक, मुनीरही उपस्थित राहणार 
11
एकाच प्रियकरासोबत होते नववधू आणि तिच्या आईचे संबंध, अनैतिक संबंधांच्या गुंत्यात गेला पतीचा बळी
12
अनर्थ टळला! टेकऑफ घेण्याआधीच विमानात तांत्रिक बिघाड; पायलटच्या सतर्कतेमुळे १७७ प्रवासी सुरक्षित
13
हिंदी सक्तीच्या भूमिकेवरून साहित्यिक एकवटले; कवीने परत केला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार
14
लेकाला मांडीवरुन घेऊन कार्तिकीचा केला गाण्याचा सराव, शेअर केला क्युट व्हिडिओ
15
"माझी मुलगी आधी एअर इंडियात पायलट होती...", अहमदाबाद विमान दुर्घटनेवर अलका कुबल म्हणाल्या...
16
'आप'ने पुन्हा पाडलं भाजपाच्या गडाला खिंडार; पोटनिवडणुकीतील दणदणीत विजयाची ५ कारणे काय?
17
३ मुलांच्या आईचं १४ वर्षांचं अफेयर, तिसऱ्याची एन्ट्री झाली अन् पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
18
BEL Stock Price: 'या' नवरत्न स्टॉकनं केलं मालामाल; १ लाख रुपयांचे झाले १ कोटींपेक्षा अधिक, कोणता आहे शेअर?
19
तत्काळ तिकीट बुकिंगच्या नियमांमध्ये मोठा बदल! १ जुलैपासून आधार लिंक नसेल तर मिळणार नाही तिकीट
20
मराठमोळ्या अभिनेत्याने या कारणामुळे केली आत्महत्या, पोलिसांनी सांगितला घटनाक्रम

रत्नागिरीचा निकाल ९६.३४ टक्के

By admin | Updated: June 9, 2015 00:59 IST

दहावी परीक्षा : जिल्ह्याचे दणदणीत यश

रत्नागिरी : स्थापनेपासून राज्यात अव्वल स्थान राखणाऱ्या कोकण बोर्डात दहावी परीक्षेत रत्नागिरी जिल्ह्याचा क्रमांक दुसरा असला तरी ९६.३४ टक्के निकालाने जिल्ह्याची मान उंचावली आहे. रत्नागिरीच्या सिद्धी बाळकृष्ण झोरे हिने बोर्डात अव्वल येऊन जिल्ह्याच्या यशाला आणखीनच झळाळी दिली आहे.महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या कोकण विभागीय मंडळातर्फे घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत रत्नागिरी जिल्ह्यातून २६ हजार ८३७ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी २५ हजार ८५५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. एकूण निकाल ९६.३४ टक्के इतका लागला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातून १२ हजार ९५० विद्यार्थी परीक्षेला बसले होते, पैकी १२ हजार ५५४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्याचा निकाल ९६.९४ टक्के इतका लागला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याने निकालाच्या टक्केवारीत रत्नागिरीपेक्षा ०.०६ टक्क्याने बाजी मारत अव्वल स्थान मिळविले आहे. उत्कृष्ट यशामुळे सर्वच शाळांमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले होते. (प्रतिनिधी)सायबर कॅफेत गर्दी निकाल पाहण्यासाठी विद्यार्थी व पालकांनी सायबर कॅफेत गर्दी केली होती. स्मार्ट फोनमुळे बहुतांश घरात इंटरनेट सुविधा असल्यामुळे सकाळपासूनच निकाल पाहण्याची उत्सुकता लागली होती. दुपारी एक वाजता निकाल संकेतस्थळावर उपलब्ध होताच नंबर पाहण्यासाठी प्रत्येकाची घाई सुरू होती.१३७ शाळांचा निकाल १०० टक्केरत्नागिरी जिल्ह्यातील एकूण ३८७ शाळांमधील १३७ शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे. एकूण २६ हजार ८३७ विद्यार्थ्यांपैकी ६ हजार १४ विद्यार्थ्यांनी विशेष गुणवत्ताप्राप्त केली आहे. प्रथम श्रेणीत ९ हजार ६१५, व्दितीय श्रेणीत ८ हजार २३१, तृतीय श्रेणीत १९९५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.मुलींचा झेंडारत्नागिरी जिल्ह्यातून १३ हजार ८६८ मुलगे परीक्षेला बसले होते, पैकी १३ हजार ३३३ मुले उत्तीर्ण झाले आहेत. मुलांच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ९६.१४ टक्के इतके आहे. तसेच जिल्ह्यातून १२ हजार ९६९ विद्यार्थिनी परीक्षेला बसल्या होत्या, पैकी १२ हजार ५२२ विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या आहेत. मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ९६.५५ टक्के इतके आहे. मुलांपेक्षा मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ०.४१ टक्क्यांनी अधिक आहे. पुनर्परीक्षार्थींचा निकाल ५१.१६ टक्के रत्नागिरी जिल्ह्यातून १२९८ विद्यार्थी पुनर्परीक्षेसाठी बसले होते, पैकी ६६४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, एकूण निकाल ५१.१६ टक्के इतका लागला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातून ३७१ पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती, पैकी १८९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, ५०.९४ टक्के इतका निकाल लागला आहे.