शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
2
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
3
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
4
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
5
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
6
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
7
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
8
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
9
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
10
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
11
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
12
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!
13
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
14
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
15
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
16
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
17
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
18
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
19
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
20
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश

रेशन दुकानदार विकणार जीवनावश्यक वस्तू

By admin | Updated: July 20, 2016 21:18 IST

राज्यातील रेशन दुकानदारांनी सरकारविरोधात १ आॅगस्टपासून बेमुदत संपाची हाक दिलेली आहे. मात्र सरकारचा निषेध व्यक्त करताना जनसामान्यांना त्रास होऊ नये

- सरकारविरोधात अनोखे आंदोलन

मुंबई, दि.20 -  राज्यातील रेशन दुकानदारांनी सरकारविरोधात १ आॅगस्टपासून बेमुदत संपाची हाक दिलेली आहे. मात्र सरकारचा निषेध व्यक्त करताना जनसामान्यांना त्रास होऊ नये, म्हणून स्वस्तात तूरडाळ, पामतेल आणि भाजीपाला विकण्याचा विचार रेशन दुकानदार संघटना करत आहे.मुंबई रेशन दुकानदार संघटनेचे अध्यक्ष नविन मारू यांनी लोकमतला सांगितले की, सरकारने रेशन दुकानांतून तूरडाळ विक्रीचा परस्पर निर्णय घेतला. याबाबत संघटनेसोबत कोणतीही चर्चा केली नाही. याआधी गेल्या दोन वर्षांपासून संघटना कमिशनसारख्या महत्त्वाच्या मागणीसह विविध प्रलंबित मागण्यांसाठी शासनाकडे पाठपुरावा करत आहे. डोअर डिलीव्हरी यंत्रणा सुरू करण्यात अद्याप सरकारला यश आलेले नाही. याशिवा इतर मागण्यांकडेही सरकार साफ दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे सरकारविरोधात तीव्र आंदोलन करण्याचा निर्णय दुकानदारांनी घेतला आहे. सरकारविरोधातील आंदोलनाचा त्रास सामान्यांना होऊ नये, म्हणून दुकानदारांची पुढील आठवड्यात बैठक आयोजित केल्याचेही त्यांनी सांगितले.ते म्हणाले की, या बैठकीमध्ये रेशन दुकानदारांच्या माध्यमातून महाग झालेली तूरडाळ, पामतेल आणि भाजीपाला विक्रीचा निर्णय घेण्याचा विचार आहे.त्यासाठी ६६ रुपये प्रति किलोग्रॅम दराने अख्खा तूर विकत घेऊन त्याची डाळ तयार केली जाईल. डाळ करण्याचा खर्च आणि वाहतूक खर्च मिळून सुमारे ७५ रुपये किलो दराने तूरडाळ विकण्याचा विचार आहे. याशिवाय अनुदानाशिवाय ५५रुपये प्रति लीटर दराने पामतेलही रेशन दुकानदार खुल्या बाजारात विक्री करतील. याशिवाय महाग झालेला भाजीपाला थेट शेतकऱ्यांकडून उचलून थेट ग्राहकांपर्यंत पोहचवण्याचेही विचाराधीन आहे. या सर्व जीवनावश्यक गोष्टी ग्राहकांपर्यंत कशाप्रकारे पोहचवता येतील, याची चर्चा करून ठोस निर्णय बैठकीत घेतला जाईल.१ आॅगस्टपासून काय मिळणार?१ आॅगस्टपासून रेशन दुकानदारांनी राज्यव्यापी बेमुदत बंदची हाक दिली आहे. रेशन दुकानदार आॅगस्टमध्ये उचलण्यात येणाऱ्या रेशन धान्याचे पैसे सरकारला जमा करतील. मात्र गोदामातील माल उचलणार नाही. त्यामुळे रेशनकार्डधारकांना रेशनवरील धान्य मिळणार नाही. याउलट रेशन दुकानातून खुल्या बाजारातील सफेद केरोसीन, पामतेल, तूरडाळ आणि भाजीपाला विकण्याचे विचाराधीन आहे.

...तर मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा! कमॉडिटी मार्केटमुळे जीवनावश्यक वस्तूंचे दर गगनाला भिडल्याचा आरोप संघटनेने केला आहे. मुख्यमंत्र्यांनी हा जुगाराचा बाजार बंद केल्यास जीवनावश्यक वस्तूंचे दर आवाक्यात येतील, असा दावा मारू यांनी केला आहे. तसे नाही झाले, तर पदाचा राजीनामा देण्याची तयारीही त्यांनी दर्शवली आहे. मात्र दर कोसळले, तर मुख्यमंत्र्यांनी पदाचा राजीनामा द्यावा, असे आव्हानही मारू यांनी दिले आहे.