शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
3
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
4
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
5
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
6
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
7
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
8
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
9
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
10
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
11
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
12
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
13
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
14
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
15
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
16
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
17
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
18
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
19
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
20
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
Daily Top 2Weekly Top 5

खडसेंना फसविण्यामागे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ - अबू आझमी

By admin | Updated: June 1, 2016 19:19 IST

सध्या कोणाचाही कोणाला फोन येवू शकतो़ त्यामुळे लगेचच त्या व्यक्तीला दोषी समजणे चुक आहे. दोघांमध्ये काय संभाषण झाले हे समोर येवू द्या, त्यानंतरच काय ते ठरविता येईल़.

ऑनलाइन लोकमत

नांदेड, दि. 1 -  सध्या कोणाचाही कोणाला फोन येऊ शकतो़ त्यामुळे लगेचच त्या व्यक्तीला दोषी समजणे चुक आहे. दोघांमध्ये काय संभाषण झाले हे समोर येवू द्या,  त्यानंतरच काय ते ठरविता येईल़. परंतु विनाकारण आकांडतांडव केले जात असून यामागे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा हात असल्याचा आरोप करीत खडसे हे चांगले व्यक्ती असल्याची पाठराखणही सपाचे आमदार अबू आझमी यांनी केली़. कंधार येथील एका कार्यक्रमासाठी ते बुधवारी नांदेडात आले होते़ ते म्हणाले, मी भाजपाच्या विरोधात आहे. परंतु खडसेंचे जळगांवमध्ये चांगले काम आहे. अल्पसंख्याक समाजातील लोकही त्यांना मानतात. त्यामुळे ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नजरेत आले आहेत. आजघडीला त्यांच्या पाठीशी भाजपाचा कुणीही उभा राहत नसून खडसेंनीही राजीनामा देण्याची गरज नसल्याचे आझमी म्हणाले. या देशात मुस्लिमांना काहीच द्यायचे नाही हाच भाजपाचा अजेंडा आहे. त्यामुळे भाजपाच्या काळात आम्हाला त्यांच्याकडून काहीच अपेक्षा नाहीत. देशात शेतकऱ्यांची सर्वात वाईट अवस्था महाराष्ट्रात असून भाजपाच्या काळात शेतकरी आत्महत्येत वाढच झाली आहे. सरकारला दोन वर्ष पूर्ण झाल्याबद्दल कोट्यवधी रुपयांच्या जाहिराती देण्यात आल्या. परंतु प्रत्यक्षात कोणतेच काम योग्यरितीने झाले नाही़. विदेश नितीही चुकीची असून चीन चिथावणीखोर वक्तव्य करीत आहे, तर मोदी पाकिस्तानात जाऊन शरीफ यांची भेट घेत आहेत. सरकार आपल्या भूमिकांवरही ठाम नसून महाराष्ट्रात गोमांस बंदी केली असताना शेजारील त्यांचीच सत्ता असलेल्या गोव्यात मात्र गोमांसावर बंदी नाही़, अशी दुटप्पी भूमिका या सरकारची आहे. मुस्लिमांसाठी असलेल्या बजेटमध्येही वाढ करण्याची गरज असून आरक्षणाच्या मुद्यावर आता काँग्रेस ओरडत असली तरी, त्यांच्या सत्ता काळात त्यांनी अखेरच्या क्षणी केवळ अध्यादेश काढण्यापेक्षा दुसरे काही केले नाही़.