शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर अन् युद्धविराम...राहुल गांधींची PM मोदींना पत्राद्वारे मोठी मागणी
2
'1971 आणि 2025 ची परिस्थिती वेगळी', युद्धविराम अन् इंदिरा गांधींबाबत शशी थरुर स्पष्टच बोलले
3
Chandrapur Tiger Attack: चंद्रपुरात वाघाच्या हल्ल्यात ३ महिलांचा मृत्यू, गावकऱ्यांमध्ये घबराट
4
Murali Naik : "शहीद झालो तर पार्थिव तिरंग्यात..."; मुरली नाईक यांच्या वडिलांनी सांगितली लेकाची शेवटची इच्छा
5
भारतानं पाकिस्तानात घुसून मारलं, लष्कराचा दरारा रावळपिंडीपर्यंत पोहोचला; ऑपरेशन सिंदूरवर राजनाथ सिंह स्पष्टच बोलले 
6
SIP मध्ये गुंतवणूक करताना बहुतेक गुंतवणूकदार 'या' चुका करतात; थेट परताव्यावर होतो परिणाम
7
Yogi Adityanath : "पाकिस्तानला विचारा 'ब्रह्मोस' क्षेपणास्त्राची ताकद काय आहे?"; योगी आदित्यनाथ कडाडले
8
नाशिकला अवकाळी पावसाने झोडपले; शहरात तासभर गडगडाट अन् कडकडाट
9
"मी मोठी झाल्यावर सैन्यात भरती होईन आणि बदला घेईन"; शहीद जवानाच्या लेकीचा निर्धार
10
भारत-पाकिस्तान संघर्षाचा BCCI ला मोठा फटका; आठवड्यात ४२० कोटी रुपये पाण्यात जाणार?
11
Ceasefire Violation: भारतासोबत शस्त्रसंधीची चर्चा करणारे पाकिस्तानी लष्कराचे डीजीएमओ कोण आहेत?
12
Bhagwant Mann : "देशाच्या हितासाठी पंजाब रक्त..."; भगवंत मान यांची राजस्थानला अतिरिक्त पाणी देण्याची मोठी घोषणा
13
युद्धविराम पंतप्रधान मोदींनी घेतली उच्चस्तरीय बैठक, तिन्ही लष्करप्रमुखांसह अजित डोवाल, राजनाथ सिंहांची उपस्थिती
14
लक्ष्य साध्य झाले पण 'ऑपरेशन सिंदूर' अजूनही सुरुच; हवाई दलाने दिली मोठी अपडेट...
15
मेळघाटातील ‘त्या’ आरएफओंची राज्य महिला आयोगाकडे धाव, ‘त्या’ अधिकाऱ्याला अभय
16
फक्त एक मिस्ड कॉल किंवा SMS द्वारे PF बॅलन्स तपासा; कुठेही लॉगइन करण्याची गरज नाही
17
'युद्धविरामचे पालन करू, पण काश्मीर अन् सिंधू करार...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे मोठे विधान
18
फक्त ४० रुपयांमध्ये पोटभर जेवण! 'या' बॉलिवूड कलाकाराने उघडलंय हॉटेल, चाहत्यांकडून कौतुक
19
पैशांसाठी कुणावरही अवलंबून राहू नये असं वाटतं? मग आजपासून 'या' १० टीप्स फोलो करा
20
पाकिस्तानकडून युद्धविरामचे उल्लंघन; भारतीय क्रिकेटपटूंनी पाकची केली कुत्र्याची तुलना, म्हणाले...

खडसेंना फसविण्यामागे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ - अबू आझमी

By admin | Updated: June 1, 2016 19:19 IST

सध्या कोणाचाही कोणाला फोन येवू शकतो़ त्यामुळे लगेचच त्या व्यक्तीला दोषी समजणे चुक आहे. दोघांमध्ये काय संभाषण झाले हे समोर येवू द्या, त्यानंतरच काय ते ठरविता येईल़.

ऑनलाइन लोकमत

नांदेड, दि. 1 -  सध्या कोणाचाही कोणाला फोन येऊ शकतो़ त्यामुळे लगेचच त्या व्यक्तीला दोषी समजणे चुक आहे. दोघांमध्ये काय संभाषण झाले हे समोर येवू द्या,  त्यानंतरच काय ते ठरविता येईल़. परंतु विनाकारण आकांडतांडव केले जात असून यामागे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा हात असल्याचा आरोप करीत खडसे हे चांगले व्यक्ती असल्याची पाठराखणही सपाचे आमदार अबू आझमी यांनी केली़. कंधार येथील एका कार्यक्रमासाठी ते बुधवारी नांदेडात आले होते़ ते म्हणाले, मी भाजपाच्या विरोधात आहे. परंतु खडसेंचे जळगांवमध्ये चांगले काम आहे. अल्पसंख्याक समाजातील लोकही त्यांना मानतात. त्यामुळे ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नजरेत आले आहेत. आजघडीला त्यांच्या पाठीशी भाजपाचा कुणीही उभा राहत नसून खडसेंनीही राजीनामा देण्याची गरज नसल्याचे आझमी म्हणाले. या देशात मुस्लिमांना काहीच द्यायचे नाही हाच भाजपाचा अजेंडा आहे. त्यामुळे भाजपाच्या काळात आम्हाला त्यांच्याकडून काहीच अपेक्षा नाहीत. देशात शेतकऱ्यांची सर्वात वाईट अवस्था महाराष्ट्रात असून भाजपाच्या काळात शेतकरी आत्महत्येत वाढच झाली आहे. सरकारला दोन वर्ष पूर्ण झाल्याबद्दल कोट्यवधी रुपयांच्या जाहिराती देण्यात आल्या. परंतु प्रत्यक्षात कोणतेच काम योग्यरितीने झाले नाही़. विदेश नितीही चुकीची असून चीन चिथावणीखोर वक्तव्य करीत आहे, तर मोदी पाकिस्तानात जाऊन शरीफ यांची भेट घेत आहेत. सरकार आपल्या भूमिकांवरही ठाम नसून महाराष्ट्रात गोमांस बंदी केली असताना शेजारील त्यांचीच सत्ता असलेल्या गोव्यात मात्र गोमांसावर बंदी नाही़, अशी दुटप्पी भूमिका या सरकारची आहे. मुस्लिमांसाठी असलेल्या बजेटमध्येही वाढ करण्याची गरज असून आरक्षणाच्या मुद्यावर आता काँग्रेस ओरडत असली तरी, त्यांच्या सत्ता काळात त्यांनी अखेरच्या क्षणी केवळ अध्यादेश काढण्यापेक्षा दुसरे काही केले नाही़.