शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
2
Mumbai Covid: मुंबईतील केईएम रुग्णालयात दोन रुग्णांचा कोविडमुळे मृत्यू; रुग्णालयाने अखेर काय सांगितलं?
3
७ वर्षांनी 'टीम मोदी'मध्ये परतले एमजे अकबर; केंद्रीय मंत्रिपदाचा का द्यावा लागला होता राजीनामा?
4
Mumbai Fire: विधान भवनाच्या प्रवेशद्वाराजवळ आग; शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची माहिती
5
'सिमकार्ड नको, आता काहीतरी मोठे करा...', हरियाणाच्या तारीफला पाकिस्तानने दिले होते 'हे' काम!
6
बाजारात चढ-उतार! इन्फोसिससह 'हे' शेअर्स घसरले; तुमच्या पोर्टफोलिओवर काय परिणाम?
7
Mumbai: नाल्यात अडकलेल्या मुलीला वाचवण्याच्या प्रयत्नात एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
8
"त्यांनी माझं पॅकअप केलं होतं..", आमिर खानमुळे 'तारक मेहता...' फेम अभिनेत्याची गेली नोकरी
9
IPL 2025: "धोनीचे फॅन्स खरे आहेत, बाकीच्यांचे..."; हरभजन सिंगने विराट कोहलीवर केला शाब्दिक हल्ला?
10
अभिनेत्री शिल्पा शिरोडकरला कोरोनाचं निदान, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली माहिती
11
८व्या वेतन आयोगानंतर पगार आणि पेन्शन किती वाढेल? कधी लागू होईल? कोणाला मिळेल फायदा?
12
"आजाराबद्दल ऐकून काळजी वाटली, आम्ही तुमच्या सोबत..."; PM मोदींनी जो बायडेनना दिला धीर
13
एसीची सर्व्हिसिंग करण्याची योग्य वेळ तुम्हाला माहितीय का? अन्यथा बसेल मोठा फटका
14
मोसादचा सर्वात खतरनाक गुप्तहेर...! एली कोहेनला चौकात फाशी दिलेली, त्याला आज ६० वर्षे झाली; इस्रायलचे सिक्रेट ऑपरेशन
15
CJI साठी काय असतो प्रोटोकॉल? महाराष्ट्र दौऱ्यावर आलेले सरन्यायाधीश गवई झाले नाराज
16
10th Pass Job: दहावी पास उमेदवारांसाठी बँकेत चांगल्या पगाराची नोकरी, लगेच करा अर्ज!
17
पाकिस्तानला माहिती देणे चूक नाही, गंभीर गुन्हा...राहुल गांधींची जयशंकर यांच्यावर घणाघाती टीका
18
India Pakistan War : मोठा खुलासा! सीमेवरील तणावाच्या काळात चीनने पाकिस्तानसाठी हेरगिरी केली
19
मीठ ते विमान... पण सुरुवात कुठून? जमशेदजी टाटांच्या पहिल्या व्यवसायाची अनोखी गोष्ट
20
ज्योती मल्होत्रा, अन् नवांकुर चौधरीसह ते 10 लोक कोण, ज्यांच्यावर देशद्रोहाचा आरोप?

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वातंत्र्याचे महायोद्धा

By admin | Updated: September 28, 2015 02:39 IST

भारताला स्वातंत्र्य मिळावे हे सर्व भारतीयांचे प्रमुख उद्दिष्ट होते. लाखो भारतीयांना एकत्रित आणून त्यांच्या

अमरावती : भारताला स्वातंत्र्य मिळावे हे सर्व भारतीयांचे प्रमुख उद्दिष्ट होते. लाखो भारतीयांना एकत्रित आणून त्यांच्या मनात स्वातंत्र्याची ज्योत प्रज्वलित करून प्रेरणा देण्याचे काम राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी त्याकाळी केले. त्यामुळे ते स्वातंत्र्याचे महायोद्धा ठरतात, असे प्रतिपादन प्राचार्य सुनंदा जामकर यांनी केले. धारणी येथील वसंतराव नाईक महाविद्यालयात प्रचारभीष्म श्यामरावदादा मोकदम स्मृती ग्रामगीता व्याख्यालमालेत प्रमुख वक्ते म्हणून त्या बोलत होत्या. 'स्वातंत्र्य युद्धातील महायोद्धा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज' या विषयावरील व्याख्यानप्रसंगी अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू मोहन खेडकर, प्रचारभीष्म श्यामरावदादा मोकदम जन्मशताब्दी केंद्रीय समितीचे अध्यक्ष मधुभाऊ घारड, धारणीच्या दयाराम पटेल स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष वीणा रमेश मालवीय, संस्थापक अध्यक्ष नानासाहेब भिसे, ब्रिटन येथील साजिद शेख, जनसंपर्क अधिकारी विलास नांदूरकर, महाविद्यालयाचे प्राचार्य एम.ए. काझी उपस्थित होते. स्वातंत्र्यपूर्व काळात राष्ट्रसंतांनी अनेक स्वातंत्र्य सैनिक तयार केलेत. भारताला स्वातंत्र्य मिळावे आणि स्वातंत्र्यांच्या महान कार्यात भारतीय जनतेचा व विशेषत: युवकांचा मोठ्या प्रमाणात सहभाग रहावा, यासाठी १९३३ साली आरती मंडळाची स्थापना करून त्यांनी जनतेचे प्रबोधन केले. अशिक्षित लोकांना एकत्रित करणे, त्यांना स्वातंत्र्य उठावामध्ये सहभागी करून घेण्याचे काम महाराजांनी करुन स्वातंत्र्ययुद्धाची पायाभरणी केली. भजन, रामधून या माध्यमाचा वापर भारतीयांच्या मनात स्वातंत्र्य संग्रामाची ज्योत चेतविण्यासाठी केला. भारतीय युवक बलवान व्हावा, तो स्वातंत्र्य युद्धात कामी यावा यासाठी महाराजांनी गावोगावी व्यायाम मंदिरे उघडली व गुरूदेव सेवा मंडळाची स्थापना केली. राष्ट्रसंतांच्या नेतृत्वात प्रचारभीष्म श्यामरावदादा मोकदम यांनी स्वातंत्र्य लढ्याची धुरा सांभाळली. श्यामरावदादा मोकदम महाराजांचे खंदे समर्थक होते. त्यामुळेच स्वातंत्र्य युद्धातील महायोद्धा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ठरत असल्याचे मत जामकर यांनी व्यक्त केले. कुलगुरू मोहन खेडकर हे अध्यक्षस्थानावरून बोलत होते. ते म्हणाले, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ग्रामगीतेत सांगितलेले चांगले गुण आत्मसात करावे. प्रास्ताविक व परिचय जनसंपर्क अधिकारी विलास नांदूरकर, संचालन श्रीखंडे, तर आभार प्राचार्य एम.ए. काझी यांनी मानले. व्याख्यानाला धारणीतील प्रतिष्ठित नागरिक, गुरूदेव सेवा मंडळाचे भक्तगण, शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.