शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
2
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
3
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
4
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
5
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
6
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
7
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
8
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
9
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
10
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?
11
ऑनलाइन गेमिंगवर बंदी येण्यापूर्वी झुनझुनवालांची 'या' कंपनीतून एक्झिट; निखिल कामत, मधुसूदन केला यांना अजूनही विश्वास?
12
वाहतूक नियम मोडल्याचे चलन येताच फाईन भरा, ७५ टक्क्यांपर्यंत सूट मिळणार; महाराष्ट्रात विचार सुरु...
13
"पावसाळी अधिवेशनात लोकसभेत केवळ ३७ तास चर्चा, संसदेचा खर्च खासदारांकडून वसूल करा’’, नाराज खासदाराने केली मागणी
14
"बाळासाहेब थोरातांच्या केसालाही धक्का लावण्याची गोडसेच्या औलादीमध्ये धमक नाही", हर्षवर्धन सपकाळ यांनी ठणकावले
15
घरात काय चाललंय ते कळेना! पाक दिग्गज टीम इंडियात डोकावत श्रेयस अय्यरवर बोलला, म्हणे...
16
'का ग कुठे गेली होती?', सुनेत्रा पवारांबद्दलचा प्रश्न ऐकून अजित पवारांनी पत्रकार परिषदेतच जोडले हात
17
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा
18
Raigad Boat Accident: मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
19
"वरण-भात माझं आवडीचं जेवण", ट्रोल झाल्यावर विवेक अग्निहोत्रींची पलटी, म्हणाले- "मला अक्कल आली तेव्हा..."
20
Gold Silver Price 21 August: सोन्याच्या दरातील घसरण थांबली, चांदीमध्ये ₹१७४५ ची तेजी, सोनं किती महाग झालं? जाणून घ्या

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वातंत्र्याचे महायोद्धा

By admin | Updated: September 28, 2015 02:39 IST

भारताला स्वातंत्र्य मिळावे हे सर्व भारतीयांचे प्रमुख उद्दिष्ट होते. लाखो भारतीयांना एकत्रित आणून त्यांच्या

अमरावती : भारताला स्वातंत्र्य मिळावे हे सर्व भारतीयांचे प्रमुख उद्दिष्ट होते. लाखो भारतीयांना एकत्रित आणून त्यांच्या मनात स्वातंत्र्याची ज्योत प्रज्वलित करून प्रेरणा देण्याचे काम राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी त्याकाळी केले. त्यामुळे ते स्वातंत्र्याचे महायोद्धा ठरतात, असे प्रतिपादन प्राचार्य सुनंदा जामकर यांनी केले. धारणी येथील वसंतराव नाईक महाविद्यालयात प्रचारभीष्म श्यामरावदादा मोकदम स्मृती ग्रामगीता व्याख्यालमालेत प्रमुख वक्ते म्हणून त्या बोलत होत्या. 'स्वातंत्र्य युद्धातील महायोद्धा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज' या विषयावरील व्याख्यानप्रसंगी अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू मोहन खेडकर, प्रचारभीष्म श्यामरावदादा मोकदम जन्मशताब्दी केंद्रीय समितीचे अध्यक्ष मधुभाऊ घारड, धारणीच्या दयाराम पटेल स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष वीणा रमेश मालवीय, संस्थापक अध्यक्ष नानासाहेब भिसे, ब्रिटन येथील साजिद शेख, जनसंपर्क अधिकारी विलास नांदूरकर, महाविद्यालयाचे प्राचार्य एम.ए. काझी उपस्थित होते. स्वातंत्र्यपूर्व काळात राष्ट्रसंतांनी अनेक स्वातंत्र्य सैनिक तयार केलेत. भारताला स्वातंत्र्य मिळावे आणि स्वातंत्र्यांच्या महान कार्यात भारतीय जनतेचा व विशेषत: युवकांचा मोठ्या प्रमाणात सहभाग रहावा, यासाठी १९३३ साली आरती मंडळाची स्थापना करून त्यांनी जनतेचे प्रबोधन केले. अशिक्षित लोकांना एकत्रित करणे, त्यांना स्वातंत्र्य उठावामध्ये सहभागी करून घेण्याचे काम महाराजांनी करुन स्वातंत्र्ययुद्धाची पायाभरणी केली. भजन, रामधून या माध्यमाचा वापर भारतीयांच्या मनात स्वातंत्र्य संग्रामाची ज्योत चेतविण्यासाठी केला. भारतीय युवक बलवान व्हावा, तो स्वातंत्र्य युद्धात कामी यावा यासाठी महाराजांनी गावोगावी व्यायाम मंदिरे उघडली व गुरूदेव सेवा मंडळाची स्थापना केली. राष्ट्रसंतांच्या नेतृत्वात प्रचारभीष्म श्यामरावदादा मोकदम यांनी स्वातंत्र्य लढ्याची धुरा सांभाळली. श्यामरावदादा मोकदम महाराजांचे खंदे समर्थक होते. त्यामुळेच स्वातंत्र्य युद्धातील महायोद्धा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ठरत असल्याचे मत जामकर यांनी व्यक्त केले. कुलगुरू मोहन खेडकर हे अध्यक्षस्थानावरून बोलत होते. ते म्हणाले, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ग्रामगीतेत सांगितलेले चांगले गुण आत्मसात करावे. प्रास्ताविक व परिचय जनसंपर्क अधिकारी विलास नांदूरकर, संचालन श्रीखंडे, तर आभार प्राचार्य एम.ए. काझी यांनी मानले. व्याख्यानाला धारणीतील प्रतिष्ठित नागरिक, गुरूदेव सेवा मंडळाचे भक्तगण, शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.