शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
2
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
3
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
4
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
5
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
6
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
7
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
8
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
9
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
10
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
11
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
12
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
13
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
14
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
15
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
16
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
17
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
18
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
19
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
20
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!

रायरेश्वरचा पर्यटनदृष्ट्या होणार विकास

By admin | Updated: May 5, 2017 01:50 IST

पर्यटनात वाढ व्हावी, स्थानिकांना रोजगार उपलब्ध होण्याच्या दृष्टीने रायरेश्वर किल्ल्यावर पर्यटनपूरक सोयी-सुविधांसाठी सुमारे

भोर : पर्यटनात वाढ व्हावी, स्थानिकांना रोजगार उपलब्ध होण्याच्या दृष्टीने रायरेश्वर किल्ल्यावर पर्यटनपूरक सोयी-सुविधांसाठी सुमारे १ कोटी ६४ लाखांचा निधी मंजूर केला आहे. भविष्यात अजून निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे आश्वासन पर्यटन विकासमंत्री जयकुमार रावल यांनी दिले.भोर तालुक्यात छत्रपती शिवाजीमहाराजांनी हिंदवी स्वराज्याची शपथ घेतलेला रायरेश्वर किल्ला तसेच रोहिडेश्वर या गडकोट किल्ल्याच्या पायथ्याला, शौचालय युनिट, टेंट बांधणे, म्युझियम, रेलिंग, रायरेश्वर मंदिर परिसर सुधारणा, पार्किंग सुविधा कामांसाठी रायरेश्वर किल्ल्याला १ कोटी ६४ लाख ६५ हजार व रोहिडा किल्ल्याला सुमारे १ कोटी ३१ लाख ८० हजार असा एकूण २ कोटी ९६ लाख ४५ हजार रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. त्यातील १ कोटी वर्ग करण्यात आले असून त्याचा भूमिपूजन समारंभ रावल यांच्या हस्ते झाला. त्या वेळी ते बोलत होते.या वेळी खासदार सुप्रिया सुळे, आमदार संग्राम थोपटे, जिल्हा परिषद सदस्य रणजित शिवतरे, उपविभागीय अधिकारी मौसमी बर्डे, तहसीलदार वर्षा शिंगण, चंद्रकांत बाठे, विक्रम खुटवड, लहू शेलार, विठ्ठल आवाळे, शैलेश सोनवणे, रोहन बाठे, राजेश काळ, धनंजय वाडकर, नितीन धारणे, दिलीप बाठे, हभप नामदेवमहाराज किंद्रे, साळवे, चंद्रशेखर शेळके, सुनील धुमाळ, विश्वास ननावरे, श्रीधर किंद्रे, स्वप्निल जाधव, सुभाष कोंढाळकर, नारायण जंगम, पोपट सुके, सुनील भेलके, सोमनाथ जंगम, तानाजी जंगम, सखाराम जंगम, किशोर जंगम, गोपाळ जंगम, कृष्णा जंगम, गोविंद जंगम उपस्थित होते.प्रास्ताविकात रणजित शिवतरे यांनी पर्यटन विभागाने प्रथम रस्त्याचे काम करावे, अशी मागणी केली.आमदार संग्राम थोपटे म्हणाले, ‘‘गेली अनेक वर्षे रायरेश्वर व रोहिडेश्वर किल्ले विकासापासून वंचित होते. त्याला निधी मंजूर करण्यात आला आहे. यामुळे भविष्यात पर्यटनात वाढ होणार आहे. मात्र रस्ता करताना वनविभागाची जमीन जाणार असल्याने त्याला मंजुरी घेऊनच काम करावे लागणार आहे.’’या वेळी खासदार सुळे म्हणाल्या, ‘‘अनेक वर्षांपासून भोर, वेल्हे तालुक्यातील गडकिल्ले विकासापासून दूर असल्याने पर्यटन बंद होते. मात्र या किल्ल्यांवर पायाभूत सुविधा निर्माण करून पर्यटनपूरक उद्योग सुरू केल्यास स्थानिकांना रोजगार उपलब्ध होणार आहे.’’दुसऱ्यांदा हेलिकॉप्टर गडावर१९९२ मध्ये शरद पवार देशाचे संरक्षणमंत्री असताना रायरेश्वर किल्ल्यावर हेलिकॉप्टरने आले होते. त्यानंतर तब्बल २५ वर्षांनी पर्यटनमंत्री जयकुमार रावल व खासदार सुप्रिया सुळे हेलिकॉप्टरने गडावर आले होते. हेलिकॉप्टर पाहण्यासाठी नागरिकांनी एकच गर्दी केली होती. रायरेश्वर व रोहिडेश्वर या किल्ल्यांचा पर्यटनदृष्ट्या विकास करण्याची अनेक वर्र्षांपासूनची मागणी होती. मात्र प्रत्यक्षात पर्यटन विभागाकडून पाहणी करून विकास आराखडा तयार करून त्याला मंजुरी मिळाली. निधीही वर्ग झाल्याने दोन्ही गडांचा पर्यटनपूरक विकास होणार आहे. त्यामुळे ४०० वर्षे किल्ल्यावर राहून अनेक असुविधांमुळे जीवन कंठत होते.मात्र आता काही तरी आशेचा किरण दिसत असल्याने गडावरील जंगम लोकांत आनंदाचे वातावरण आहे. यामुळे पर्यटकांत वाढ होणार असल्याने रोजगारही मिळणार असल्याचे किशोर जंगम यांनी सांगितले.