शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

रावसाहेब दानवेंना राज्यात फिरणं मुश्किल करू - धनंजय मुंडे

By admin | Updated: May 11, 2017 13:02 IST

शेतक-यांची अवहेलना करणारे विधान केल्याप्रकरणी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी रावसाहेब दानवेंना इशारा दिला आहे.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि, 11 -  एक लाख टन तूर खरेदी केली, तरी रडतात साले, असे वादग्रस्त आणि शेतकऱ्यांची अवहेलना करणारे वक्तव्य केल्याबद्दल भाजपाचे प्रदेशाध्यक्ष दानवे यांच्यावर चौफेर टीका होत आहे.  याप्रकरणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी दानवेंविरोधात हल्लाबोल चढवला आहे.  दानवेंचे वक्तव्य राज्यातील तमाम शेतक-यांच्या आत्मसन्मानाला धक्का पोहोचवणारे आहे. याविरोधात आम्ही राज्यभर निषेध करू, दानवेंना राज्यात फिरणं मुश्किल करू, असा इशारा  धनंजय मुंडे यांनी दिला आहे. 
 
राज्यातल्या 10  हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यानंतरही सरकार कर्जमाफी द्यायला तयार नाही, शेतमालाला भाव नाही. उलट भाजपाचे प्रदेशाध्यक्ष दानवे यांच्यासारखे नेते बेजबाबदार, अवमानजनक वक्तव्ये करुन शेतकऱ्यांच्या जखमांवर मीठ चोळत आहेत, अशी टीका सर्व स्तरातून सुरू आहे.
 
दानवे यांनी यापूर्वीही वादग्रस्त वक्तव्ये केली आहे. विदर्भ, मराठवाड्यात दुष्काळ नसतानाही दुष्काळाचं  खोटं  चित्र उभं करुन शेतकऱ्यांना मदत दिल्याचं बेजबाबदार वक्तव्य त्यांनी केलं होतं. वास्तविक पाहता राज्य दुष्काळाने होरपळत होता, हे दानवे यांना दिसले नाही. शेतकऱ्यांना कर्जमुक्ती हवी असेल तर विरोधी पक्षांनी एकत्र येऊन शेतकरी आत्महत्या करणार नाहीत, असा लेखी प्रस्ताव विरोधकांनी द्यावा, असं विधानही  दानवे यांनी केलं आहे. 
 
निवडणूक काळात ‘लक्ष्मीदर्शन’ घेण्याचं आवाहनही त्यांनी मतदारांना केलं होतं. शेतकऱ्यांच्या आत्मसन्मानाला धक्का लावण्याचं काम दानवे यांनी केले असून त्यांना आता राज्यात फिरणं मुश्किल करू, असा इशारा मुंडे यांनी दिला.
शेतकऱ्यांना कुठलीही मदत करायची नाही, उलट शेतकऱ्यांच्या उत्पन्नांवर कर आकारणी करण्याचा इशारा द्यायचा. शेतकऱ्यांना कर्जमाफी दिल्यास बँका तोट्यात जातील, अर्थव्यवस्था धोक्यात येईल, अशी वक्तव्ये करुन शेतकऱ्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करायचे, हे खेदजनक असल्याचेही श्री. मुंडे यांनी म्हटले आहे. 
 
राज्याचे मंत्री विनोद तावडे यांनीही शेतकऱ्यांना फुकटची टोलमाफी हवी असल्याचे वादग्रस्त वक्तव्य यापूर्वीही केलं असल्याकडेही मुंडे यांनी  लक्ष वेधले.