शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात आनंदी देश धोक्यात! रशियन सैन्याने घेरले; युरोपमध्ये खळबळ, युक्रेननंतर..
2
अचानक बसला आग लागली, ५ जणांचा मृत्यू, काच फोडून चालक पळून गेला
3
४ दिवसांच्या संघर्षात भारत ठरला वरचढ, पाकिस्तानला मोठं नुकसान; न्यूयॉर्क टाईम्सचा रिपोर्ट
4
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
5
पाकिस्ताननंतर बांगलादेशनं IMF कडे पसरले हात, बुडत्या अर्थव्यवस्थेचं कारण देत 'इतक्या' पैशांची मागणी
6
आजचे राशीभविष्य १५ मे २०२५: आर्थिक लाभ संभवतात, दुपारनंंतर मात्र अनेकांचे नशीब बदलेल...
7
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
8
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
9
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
10
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
11
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
12
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
13
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
14
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
15
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
16
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
17
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
18
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
19
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत
20
‘सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच’; दोन पोलिस अन् एका खबऱ्याला अटक, नेमके प्रकरण काय?

रावसाहेब दानवे काँग्रेसमध्ये येणार होते!

By admin | Updated: February 8, 2015 01:31 IST

रावसाहेब दानवे यांना भाजपचे प्रदेशाध्यक्षपद मिळाले नसते तर ते काँग्रेसमध्ये येणार होते, असा गौप्यस्फोट प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी केला.

नागपूर : रावसाहेब दानवे यांना भाजपचे प्रदेशाध्यक्षपद मिळाले नसते तर ते काँग्रेसमध्ये येणार होते, असा गौप्यस्फोट प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी विधानभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या उपस्थितीत शनिवारी पत्रकार परिषदेत केला.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारला शनिवारी १०० दिवस पूर्ण झाले. त्यापार्श्वभूमीवर काँग्रेसने ‘घोषणाबाज सरकारचे १०० दिवस’ अशा आशयाची टीकात्मक पुस्तिका प्रसिद्ध करून सरकार सर्वच पातळीवर अपयशी ठरल्याची टीका केली. कार्यक्रमाला माजी मंत्री सतीश चतुर्वेदी, नितीन राऊ त, राजेंद्र मुळक, आमदार सुनील केदार आदी उपस्थित होते. गेल्या तीन महिन्यांत राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत. विरोधात असताना आत्महत्यांना जबाबदार धरून सरकारवर आत्महत्येचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करणारे आता कुणावर गुन्हा दाखल करणार, सरकारच्या संवेदना संपल्या आहेत, अशी टीका विखे-पाटील यांनी केली.सोमवारी रास्ता रोकोशेतीमालाला भाव नाही. शेतकरी आत्महत्यांत झालेली वाढ, मुंबई शहराचे महत्त्व कमी करून गुजरातकडेच विशेष लक्ष आदी प्रश्नांवर भाजपा-शिवसेना युती सरकारचा निषेध करण्यासाठी काँग्रेसतर्फे सोमवारी राज्यभर रास्ता रोको करण्यात येणार आहे.दानवे यांचे प्रतिआव्हानकाँग्रेस बुडते जहाज असल्याने आपण तेथे जाण्याचा कधीही प्रयत्न केला नाही, असे सांगतानाच भाजपाचे आमदार फोडून दाखवा अन्यथा मी काँग्रेसचे आमदार फोडून दाखवतो, असे प्रतिआव्हान भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी नाशिकमध्ये बोलताना ठाकरे यांना दिले.