शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

खंडणीखोर भाजप, सेनेला सत्ता देणार?

By admin | Updated: October 10, 2014 23:34 IST

अजित पवार यांचा सवाल : सुरेश पाटील प्रचारार्थ सभा

सांगली : महाराष्ट्रात १९९५ मध्ये भाजप-शिवसेनेच्या हातात सत्ता देऊन जनतेने अनुभव घेतला आहे़ खंडणीखोरांप्रमाणे कारभार करून महाराष्ट्राची पीछेहाट केली होती़ अशा खंडणीखोर भाजप-शिवसेनेच्या नेत्यांच्या हातात महाराष्ट्राची पुन्हा सत्ता द्यायची का? असा सवाल माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगलीत मतदारांना केला़ तसेच केंद्रात सत्ता आल्यावर भाजपच्या नेत्यांनी हिंदुत्व सोडले असून, राज्यात सत्ता आल्यास छत्रपती शिवाजी महाराजांनाही ते विसरतील, असा टोलाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांनी लगावला़ राष्ट्रवादीचे उमेदवार सुरेश पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित सांगलीतील सभेत पवार बोलत होते़  ते पुढे म्हणाले की, १९९५ मध्ये महाराष्ट्रात भाजप-शिवसेनेला संधी देऊन जनतेने पाहिले आहे़ खंडणीबहाद्दर अशीच या सरकारची ओळख होती़ विकासकामे करण्याऐवजी अधिकाऱ्यांना दमदाटी करून निधी हडप केला़ बदल्यांचा बाजार मांडला होता़  राज्य दिवाळखोरीत काढले़ साडेचार वर्षात केवळ जनतेची दिशाभूल केली़ सध्या मुंबई महापालिकेत शंभर कोटींचा भ्रष्टाचार उघडकीस आला आहे़ त्यांच्याकडे सत्ता असणाऱ्या महापालिकेत घोटाळे आहेत. तरीही प्रसारमाध्यमेही त्यांच्यावर काहीच टीका करीत नाहीत़ येडीयुरप्पांना भ्रष्टाचारप्रकरणी अटक झाली, तरीही त्यांना भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष केले. असे हे नरेंद्र मोदी आहेत़ याकडे त्यांचे दुर्लक्ष आणि आमच्याबाबत मात्र खोटं पण रेटून बोलत आहेत़ सिंचन योजनांवर चाळीस हजार कोटींचा खर्च आणि ७० हजार कोटींच्या घोटाळ्याचा आरोप होत आहे़ पंधरा वर्षातील महाराष्ट्राचे अंदाजपत्रक तीन लाख ७५ हजार कोटींचे आणि भाजपचे नेते आरोप करीत आहेत़ ११ लाख ८६ हजार कोटींच्या भ्रष्टाचाराचा. त्यांच्या खोटेपणाचा आणि खोट्या जाहिरातींचा जनताच पंचनामा करीत आहे़ मतदार मतदानाद्वारेच मराठवाडा-विदर्भवाल्यांना जागा दाखवतील, असा टोलाही त्यांनी गडकरी, फडणवीस यांना लगावला़ माजी मंत्री जयंत पाटील म्हणाले की, काँग्रेस, भाजप आणि शिवसेनेच्या उमेदवारांकडे विकासाचे व्हिजन नाही़ जनता त्यांना नाकारणार, याची त्यांना भीती वाटत असल्यामुळे ते राष्ट्रवादी उमेदवाराबद्दल अपप्रचार करीत आहेत़ पण, गुलाल सुरेशअण्णांनाच लागणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले़ (प्रतिनिधी)अजितदादा म्हणतात़़़मुंबईचे महत्त्व कमी करण्याचा मोदींचा डावसत्तेत आल्यावर शंभर दिवसात ‘एलबीटी’ रद्दउध्दव ठाकरे तासाला बदलत असून राज ठाकरेंचे ‘राज’ बदललेसांगलीत गडबड केल्यास निकालानंतर वाईट परिणाम भोगावे लागतीलमहाराष्ट्राच्या योजना गुजरातला पळविल्यामोदी बारामतीत आले, पण धनगर आरक्षणावर बोलण्याचे टाळले