शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

खंडणीखोर भाजप, सेनेला सत्ता देणार?

By admin | Updated: October 10, 2014 23:34 IST

अजित पवार यांचा सवाल : सुरेश पाटील प्रचारार्थ सभा

सांगली : महाराष्ट्रात १९९५ मध्ये भाजप-शिवसेनेच्या हातात सत्ता देऊन जनतेने अनुभव घेतला आहे़ खंडणीखोरांप्रमाणे कारभार करून महाराष्ट्राची पीछेहाट केली होती़ अशा खंडणीखोर भाजप-शिवसेनेच्या नेत्यांच्या हातात महाराष्ट्राची पुन्हा सत्ता द्यायची का? असा सवाल माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगलीत मतदारांना केला़ तसेच केंद्रात सत्ता आल्यावर भाजपच्या नेत्यांनी हिंदुत्व सोडले असून, राज्यात सत्ता आल्यास छत्रपती शिवाजी महाराजांनाही ते विसरतील, असा टोलाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांनी लगावला़ राष्ट्रवादीचे उमेदवार सुरेश पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित सांगलीतील सभेत पवार बोलत होते़  ते पुढे म्हणाले की, १९९५ मध्ये महाराष्ट्रात भाजप-शिवसेनेला संधी देऊन जनतेने पाहिले आहे़ खंडणीबहाद्दर अशीच या सरकारची ओळख होती़ विकासकामे करण्याऐवजी अधिकाऱ्यांना दमदाटी करून निधी हडप केला़ बदल्यांचा बाजार मांडला होता़  राज्य दिवाळखोरीत काढले़ साडेचार वर्षात केवळ जनतेची दिशाभूल केली़ सध्या मुंबई महापालिकेत शंभर कोटींचा भ्रष्टाचार उघडकीस आला आहे़ त्यांच्याकडे सत्ता असणाऱ्या महापालिकेत घोटाळे आहेत. तरीही प्रसारमाध्यमेही त्यांच्यावर काहीच टीका करीत नाहीत़ येडीयुरप्पांना भ्रष्टाचारप्रकरणी अटक झाली, तरीही त्यांना भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष केले. असे हे नरेंद्र मोदी आहेत़ याकडे त्यांचे दुर्लक्ष आणि आमच्याबाबत मात्र खोटं पण रेटून बोलत आहेत़ सिंचन योजनांवर चाळीस हजार कोटींचा खर्च आणि ७० हजार कोटींच्या घोटाळ्याचा आरोप होत आहे़ पंधरा वर्षातील महाराष्ट्राचे अंदाजपत्रक तीन लाख ७५ हजार कोटींचे आणि भाजपचे नेते आरोप करीत आहेत़ ११ लाख ८६ हजार कोटींच्या भ्रष्टाचाराचा. त्यांच्या खोटेपणाचा आणि खोट्या जाहिरातींचा जनताच पंचनामा करीत आहे़ मतदार मतदानाद्वारेच मराठवाडा-विदर्भवाल्यांना जागा दाखवतील, असा टोलाही त्यांनी गडकरी, फडणवीस यांना लगावला़ माजी मंत्री जयंत पाटील म्हणाले की, काँग्रेस, भाजप आणि शिवसेनेच्या उमेदवारांकडे विकासाचे व्हिजन नाही़ जनता त्यांना नाकारणार, याची त्यांना भीती वाटत असल्यामुळे ते राष्ट्रवादी उमेदवाराबद्दल अपप्रचार करीत आहेत़ पण, गुलाल सुरेशअण्णांनाच लागणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले़ (प्रतिनिधी)अजितदादा म्हणतात़़़मुंबईचे महत्त्व कमी करण्याचा मोदींचा डावसत्तेत आल्यावर शंभर दिवसात ‘एलबीटी’ रद्दउध्दव ठाकरे तासाला बदलत असून राज ठाकरेंचे ‘राज’ बदललेसांगलीत गडबड केल्यास निकालानंतर वाईट परिणाम भोगावे लागतीलमहाराष्ट्राच्या योजना गुजरातला पळविल्यामोदी बारामतीत आले, पण धनगर आरक्षणावर बोलण्याचे टाळले