शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
९ वर्षांची मुलगी बेपत्ता झाल्याची बातमी अन्... विजयच्या रॅलीत ३६ जणांचा मृत्यू, पाण्याच्या बाटल्या फेकत होता अभिनेता
3
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
4
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
5
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
6
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
7
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
8
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
9
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
10
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
11
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
12
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
13
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
14
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
15
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
16
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
17
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
18
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
19
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...
20
“पूरग्रस्तांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी सर्वस्व पणाला लावू”; अजित पवारांचा VCद्वारे संवाद

वर्ध्यात रचला गेला खंडणीचा कट

By admin | Updated: May 15, 2017 06:25 IST

पर्यावरणमंत्री रामदास कदम यांच्या नावाने खंडणी मागण्याचा कट वर्ध्यात शिजल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी मंत्री कदम यांच्या

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा/आकोली : पर्यावरणमंत्री रामदास कदम यांच्या नावाने खंडणी मागण्याचा कट वर्ध्यात शिजल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी मंत्री कदम यांच्या कार्यालयातील टंकलेखक महेश सावंत याच्यानंतर मनोज मानवटकर (रा. पुलई) यास रविवारी अटक करण्यात आली आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चांदूर (रेल्वे) येथील रेती कंत्राटदार गजानन खंडार यांनी भिकुजी महाराज संस्थान परिसरातील रेतीघाट लिलावात खरेदी केला होता. रेतीघाट घेतल्यानंतर खंडारला पर्यावरणमंत्री रामदास कदम यांच्या कार्यालयातून महेश सावंत फोन करून दोन महिन्यांपासून दहा लाखांची खंडणी मागत होता. या प्रकरणी खंडार याच्या तक्रारीवरून मलबार हिल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसी हिसका दाखविताच त्याने प्रकरणाची कबुली दिली. या सर्व प्रकरणात त्याला वर्धा जिल्ह्यातील पुलई येथील मनोज मानवटकर याचे सहकार्य लाभल्याचे समोर आले. ही माहिती समोर येताच मुंबई पोलिसांनी वर्धा पोलिसांशी संपर्क साधत या प्रकरणातील महेश सावंत याचा साथीदार तसेच संपूर्ण कट रचणारा मास्टरमाइंड मनोज मानवटकर याला सदर ठेकेदाराकडून ५० हजार रुपये स्वीकारताना अटक केली.