शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
3
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
4
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
5
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
6
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
7
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
8
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
9
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
10
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
11
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
12
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
13
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
14
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
15
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
16
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
17
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
18
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
19
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
20
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
Daily Top 2Weekly Top 5

भाडेनियंत्रण कायद्यातून सुटका

By admin | Updated: May 8, 2015 06:01 IST

भाडेनियंत्रण कायद्याच्या अंमलातून ५०० चौ.फू.पेक्षा मोठे व्यापारी तर ८६२ चौ.फू. पेक्षा मोठे निवासी गाळे काढून त्यांचे भाडे पुढील तीन वर्षांनंतर

मुंबई : भाडेनियंत्रण कायद्याच्या अंमलातून ५०० चौ.फू.पेक्षा मोठे व्यापारी तर ८६२ चौ.फू. पेक्षा मोठे निवासी गाळे काढून त्यांचे भाडे पुढील तीन वर्षांनंतर बाजारभावाच्या १०० टक्के दराने वसूल करण्यास परवानगी देण्याचा प्रस्ताव राज्य शासनाच्या विचाराधीन आहे. यामुळे जुन्या इमारतींच्या विकासाचा मार्ग मोकळा होऊन भाडेपट्ट्यावर घरे उपलब्ध होतील, असा विश्वास सरकारमधील उच्चपदस्थ व्यक्त करीत आहेत.भाडेनियंत्रण कायद्यानुसार भाडेवाढीवर मर्यादा असल्याने अनेक जुन्या इमारतींमधील भाडेकरु अत्यंत नाममात्र भाड्याने राहत आहेत. परिणामी मालकांनी इमारतींच्या देखभालीकडे दुर्लक्ष केले आहे. अशा नादुरुस्त इमारतींच्या पुनर्विकासाची मोठी समस्या निर्माण झाली आहे. भाडेकरु पुनर्विकासास तयार होत नाहीत . भाडेनियंत्रण कायद्यातील या बदलामुळे भाडेतत्त्वावर घरे उपलब्ध होतील व केंद्राची घोषणा पूर्णत्वाला जाण्यास हातभार लागेल, असा विश्वास सरकारला वाटतो.राज्य सरकारचे प्रस्तावित गृहनिर्माण धोरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मंजुरीकरिता सादर केले आहे. त्यांनी मंजुरी दिल्यावर त्यावर लोकांकडून हरकती व सूचना मागवण्यात येतील. त्यानंतर त्याला अंतिम स्वरुप दिले जाणार आहे. ५०० चौ.फू. क्षेत्रफळापेक्षा मोठे व्यापारी, ८६२ चौ.फू. क्षेत्रफळापेक्षा मोठे गाळे बाजारभावाच्या १०० टक्के दराने भाडेतत्त्वावर देण्याची तरतूद या धोरणात आहे. या कायद्यातून मोठी बांधकामे बाहेर काढल्यावर व्यापारी व निवासी भाडेकरुंवर ताण पडून असंतोष निर्माण होऊ नये याकरिता निर्णय झाल्यापासून पुढील तीन वर्षे बाजारभावाच्या ५० टक्के दराने त्यांना भाडे आकारण्यात येईल. चौथ्या वर्षापासून १०० टक्के दराने भाडे आकारणी करता येईल. मात्र जागा मालकांनी भाडेवाढीपोटी भाडेकरुंना नाडू नये याकरिता भाड्याची रक्कम ही भाडेकरुच्या उत्पन्नाच्या ३० टक्क्यांपेक्षा जास्त असता कामा नये, असे बंधन घालण्यात आले आहे. (विशेष प्रतिनिधी)