मुंबई : मुंबईसह कोकण आणि उत्तर महाराष्ट्रातील काँग्रेसच्या कोटय़ातील 72 जागांसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती बुधवारी घेण्यात आल्या. काँग्रेसच्या प्रचार समितीचे प्रमुख नारायण राणो यांनी आज टिळक भवनावर हजेरी लावली. स्वत: राणो आणि त्यांचे समर्थक संदेश पारकर या दोघांनीही कुडाळमधून निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यामुळे कुडाळमधून नेमके कोण लढणार, याबाबत उत्सुकता आहे.
तर कणकवली मतदारसंघासाठी नितेश राणो व आमदार विजय सावंत यांनी उमेदवारी मागितल्यामुळे या जागेवरही पेच निर्माण होणार आहे. कणकवलीतून उमेदवारी मागणारे आ. सावंत यांच्यावर नितेश राणो यांनी तोंडसुख
घेतले. लोकसभेत पक्षाच्या अधिकृत उमेदवाराविरुद्ध काम करणा-यांना तिकीट द्यायचे की नाही ते पक्षश्रेष्ठी ठरवतील.त्यांच्या कारवायांची माहिती यापूर्वीच आम्ही प्रदेश काँग्रेसला दिली आहे, असे राणो यांनी पत्रकारांना सांगितले. (प्रतिनिधी)
च्उद्योगमंत्री नारायण राणो यांच्यासह कृषी मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, महिला बालकल्याण मंत्री वर्षा गायकवाड, वस्त्रोद्योग मंत्री नसीम खान आदी दिग्गजांनी आपले अर्ज पक्षाकडे सादर केले. राणोंच्या अर्जाकडे सर्वाचेच लक्ष लागले होते.
च्पक्षाने एकूण 288 जागांसाठी अर्ज मागविले आहेत. मात्र काँग्रेसच्या कोटय़ातील 174 जागांसाठीच्या मुलाखती आज होतील.
ज्यांनी अर्ज भरला नसेल त्यांनाही नंतर
अर्ज भरण्याची संधी देण्यात येणार आहे, अशी माहिती प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी दिली.