मुंबई : उद्योगमंत्री नारायण राणो यांनी आपल्या मंत्रिपदाचा दिलेला राजीनामा म्हणजे अगदी क्षुल्लक घटना आहे. अशा घटना दररोज घडतात. त्यामुळे अशा निर्थक गोष्टींमध्ये वेळ घालविण्यात काही अर्थ नाही. त्यावर मी प्रतिक्रिया देण्याचे सोडले आहे, असे म्हणत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राणोंच्या राजीनाम्याकडे दुर्लक्ष केले.
88व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हाचे अनावरण सोमवारी मातोश्री येथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी ते बोलत होते. साहित्य संमेलनात बोलताना उद्धव म्हणाले, 88व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हाच्या अनावरणाचा क्षण हा आनंद देणारा असून, राज्याच्या वेशी ओलांडून संमेलन पुढे जात आहे, याचेही कौतुक आहे. साहित्य संमेलन म्हटले, की संमेलन आणि वाद हे जणू समीकरणच आहे. यंदाचे साहित्य संमेलन मात्र वादाशिवाय पार पडेल, अशी आशा आहे.
साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा माधवी वैद्य, संमेलनाचे निमंत्रक व मुख्य संयोजक भारत देसडला, सरहद संस्थेचे अध्यक्ष संजय नहार आणि शिवसेना प्रवक्त्या नीलम गो:हे आदी याप्रसंगी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
..अखेर बोधचिन्ह साकारले!
च्गेले 15-2क् दिवस संमेलनाचे बोधचिन्ह साकारण्यासाठी धडपड सुरू होती. या काळात रात्रंदिवस मेहनत करत असताना जवळपास
8क् बोधचिन्हे साकारली, त्यानंतरच अखेर बोधचिन्ह साकारल्याचे कलाकार ख्वाजा सय्यद यांनी सांगितले.
च्हे बोधचिन्ह साकारण्यासाठी आपण संत नामदेवांच्या साहित्याचा अभ्यास केला. दरम्यान, या काळात ‘गुरू ग्रंथसाहिबमधील संत नामदेव’ या ग्रंथाचीही बरीच मदत झाली. त्याचप्रमाणो गतकाळातील साहित्य संमेलनांच्या बोधचिन्हांचाही संदर्भपूर्ण अभ्यास केल्याचे ख्वाजा सय्यद यांनी सांगितले.
नामदेवांचे राष्ट्रीय स्मारक
88व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने घुमान येथे संत नामदेवांचे राष्ट्रीय स्मारक उभारण्यात येईल. तसेच, केवळ स्मारक न उभारता मराठी साहित्य संपदेविषयी सर्व माहिती त्या ठिकाणी असेल. या माध्यमातून नामदेवांच्या स्मृतींचे जतन करण्यात येईल, असेही उद्धव यांनी स्पष्ट केले.
‘मी आणि माझं घर बरं’ हे सोडा
मराठी माणूस नेहमीच ‘मी आणि माझं घर बरं’ यामध्ये अडकलेला असतो. यातून त्याने बाहेर पडावे, अस आवाहनही उद्धव यांनी केले.
पंढरपूर-घुमान विशेष रेल्वेसेवा
केवळ साहित्य संमेलन घेऊन घुमान आणि महाराष्ट्राचे संबंध दृढ होऊ शकत नाहीत; तर त्यासाठी पंढरपूर-घुमान ही विशेष रेल्वेसेवा सुरू केली पाहिजे. मी स्वत: खासदारांकडून यासंबंधीच्या प्रस्तावाचा पाठपुरावा करणार असल्याचे उद्धव यांनी सांगितले.
राणोंनी राजकीय भूकंप घडविलाच नाही : केसरकर
सावंतवाडी : उद्योगमंत्री नारायण राणो यांनी सोमवारी राजकीय भूकंप घडविलाच नाही, असा उपरोधिक टोला आमदार दीपक केसरकर यांनी येथे लगावला. आपल्या विरोधात बोलणा:यांचे हात मुळापासून उखडून टाका, असे आदेश कार्यकत्र्याना दिले आहेत. त्यांची ही भाषा प्रक्षोभक असून, शासनाने त्यांचे भाषण तपासून त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणीही केसरकर यांनी केली.