शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
2
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
3
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
4
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
5
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
6
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
7
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
8
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
9
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
10
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
11
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
12
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
13
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
14
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
15
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
16
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
17
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
18
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
19
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
20
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश

राणेंचा राजीनामा निरर्थक!

By admin | Updated: July 22, 2014 09:59 IST

उद्योगमंत्री नारायण राणो यांनी आपल्या मंत्रिपदाचा दिलेला राजीनामा म्हणजे अगदी क्षुल्लक घटना आहे. अशा घटना दररोज घडतात.

मुंबई : उद्योगमंत्री नारायण राणो यांनी आपल्या मंत्रिपदाचा दिलेला राजीनामा म्हणजे अगदी क्षुल्लक घटना आहे. अशा घटना दररोज घडतात. त्यामुळे अशा निर्थक गोष्टींमध्ये वेळ घालविण्यात काही अर्थ नाही. त्यावर मी प्रतिक्रिया देण्याचे सोडले आहे, असे म्हणत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राणोंच्या राजीनाम्याकडे दुर्लक्ष केले.
88व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हाचे अनावरण सोमवारी मातोश्री येथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी ते बोलत होते. साहित्य संमेलनात बोलताना उद्धव म्हणाले, 88व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हाच्या अनावरणाचा क्षण हा आनंद देणारा असून, राज्याच्या वेशी ओलांडून संमेलन पुढे जात आहे, याचेही कौतुक आहे. साहित्य संमेलन म्हटले, की संमेलन आणि वाद हे जणू समीकरणच आहे. यंदाचे साहित्य संमेलन मात्र वादाशिवाय पार पडेल, अशी आशा आहे.
 साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा माधवी वैद्य, संमेलनाचे निमंत्रक व मुख्य संयोजक भारत देसडला, सरहद संस्थेचे अध्यक्ष संजय नहार आणि शिवसेना प्रवक्त्या नीलम गो:हे आदी  याप्रसंगी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
 
..अखेर बोधचिन्ह साकारले!
च्गेले 15-2क् दिवस संमेलनाचे बोधचिन्ह साकारण्यासाठी धडपड सुरू होती. या काळात रात्रंदिवस मेहनत करत असताना जवळपास 
8क् बोधचिन्हे साकारली, त्यानंतरच अखेर बोधचिन्ह साकारल्याचे कलाकार ख्वाजा सय्यद यांनी सांगितले.
 
च्हे बोधचिन्ह साकारण्यासाठी आपण संत नामदेवांच्या साहित्याचा अभ्यास केला. दरम्यान, या काळात ‘गुरू ग्रंथसाहिबमधील संत नामदेव’ या ग्रंथाचीही बरीच मदत झाली. त्याचप्रमाणो गतकाळातील साहित्य संमेलनांच्या बोधचिन्हांचाही संदर्भपूर्ण अभ्यास केल्याचे ख्वाजा सय्यद यांनी सांगितले. 
 
नामदेवांचे राष्ट्रीय स्मारक
88व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने घुमान येथे संत नामदेवांचे राष्ट्रीय स्मारक उभारण्यात येईल. तसेच, केवळ स्मारक न उभारता मराठी साहित्य संपदेविषयी सर्व माहिती त्या ठिकाणी असेल. या माध्यमातून नामदेवांच्या स्मृतींचे जतन करण्यात येईल, असेही उद्धव यांनी स्पष्ट केले.
‘मी आणि माझं घर बरं’ हे सोडा  
मराठी माणूस नेहमीच ‘मी आणि माझं घर बरं’ यामध्ये अडकलेला असतो. यातून त्याने बाहेर पडावे, अस आवाहनही उद्धव यांनी केले.
 
पंढरपूर-घुमान विशेष रेल्वेसेवा
केवळ साहित्य संमेलन घेऊन घुमान आणि महाराष्ट्राचे संबंध दृढ होऊ शकत नाहीत; तर त्यासाठी पंढरपूर-घुमान ही विशेष रेल्वेसेवा सुरू केली पाहिजे. मी स्वत: खासदारांकडून यासंबंधीच्या प्रस्तावाचा पाठपुरावा करणार असल्याचे उद्धव यांनी सांगितले.
 
राणोंनी राजकीय भूकंप घडविलाच नाही : केसरकर
सावंतवाडी : उद्योगमंत्री नारायण राणो यांनी सोमवारी राजकीय भूकंप घडविलाच नाही, असा उपरोधिक टोला आमदार दीपक केसरकर यांनी येथे लगावला.  आपल्या विरोधात बोलणा:यांचे हात मुळापासून उखडून टाका, असे आदेश कार्यकत्र्याना दिले आहेत. त्यांची ही भाषा प्रक्षोभक असून, शासनाने त्यांचे भाषण तपासून त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणीही केसरकर यांनी केली.