शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj Thackeray : 'दोन्ही ठाकरे एकत्र न आल्यास मराठी माणूस हताश होईल'; मनसे नेत्याचं मोठं विधान
2
'ऑपरेशन सिंदूर'ची माहिती देण्यासाठी पाकिस्तानने पैसे दिले'; लष्करातील गद्दार जवानाने उघड केले गुपित, बँके खात्यांची चौकशी सुरू
3
खासगी कंपन्यांना मिळणार वीजपुरवठ्याचा परवाना, अदानीचा ठाणे, नवी मुंबईवर दावा
4
Zerodha च्या कामथ बंधूंनी 'या' कंपनीचे २५० कोटींचे शेअर्स खरेदी केले; मार्केटमध्ये उतरण्यापूर्वी खेळला मोठा डाव 
5
"हिंदी भाषा काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत बोलली गेलीच पाहिजे, केंद्राने..."; अबू आझमींकडून हिंदीची वकिली
6
'ट्रॅजेडी क्वीन'वर येणार सिनेमा, 'या' अभिनेत्रीला ऑफर झाली मीना कुमारींची भूमिका
7
पहलगामच्या हल्ल्यात ३ नव्हे ४ दहशतवादी होते सामील; चौथा काय करत होता? ऐकून येईल चीड!
8
आठ महिन्यांत चौघांची हत्या; २० वर्षांच्या गँगस्टरचा एन्काऊंटरमध्ये खात्मा, VIDEO आला समोर
9
"कुठे आहेत नाना पाटेकर, प्रशांत दामले? कुठायत मराठी क्रिकेटपटू?"; हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून सवाल
10
खासदार प्रिया सरोज आणि क्रिकेटर रिंकू सिंह यांच्या लग्नाची तारीख टळली; समोर आलं मोठं कारण...
11
धारावीतील २४९ पैकी १६१ बांधकामे पात्र, पहिली यादी जाहीर; अपात्र लोकांना ५ जुलैपर्यंत संधी
12
इराणने कमी क्षमतेच्या मिसाईल डागल्या अन् अमेरिकेने त्या पडू दिल्या...; कतारवरील हल्ल्यामागचे गुपित कुणाला कळले...
13
सोहेलसोबत पळून जाऊन केलेलं लग्न, मग २४ वर्षांनी का झाला घटस्फोट? सीमा सजदेहने सांगितलं खरं कारण
14
कसली भारी दिसत्येय 'सैराट'मधील परश्याचा मित्र 'लंगड्या'ची गर्लफ्रेंड, सौंदर्यात नायिकांनाही देते टक्कर!
15
ठाणे: आणखी २ इमारतींवर हातोडा, मुंब्रा-शीळच्या बेकायदा इमारतींमधील रहिवासी रस्त्यावर
16
मध्य पूर्वेतील तणाव, हिंडगनबर्गचे आरोप अन् धारावी प्रकल्प; गौतम अदानी स्पष्टच बोलले
17
युद्धविरामाबाबतचा संभ्रम संपला, अखेर इस्राइल-इराणमधील संघर्ष आटोपला, पण अखेरचा हल्ला करत इराण म्हणाला...  
18
इराण-इस्रायल युद्धबंदीमुळे बाजार 'रॉकेट'; पण 'या' कंपन्यांचे शेअर्स धडाधड कोसळले; काय आहे कारण?
19
कोण आहे अलीफा अहमद?; पती डॉक्टर तर स्वत: TCS मध्ये करत होती नोकरी; आता बनल्या आमदार
20
Iran Israel War : इराण-इस्त्रायलमध्ये १२ दिवसांचं युद्ध, लष्करी तळ, शहरं उद्ध्वस्त; कुणाचं किती नुकसान?

सत्तेशिवाय राणे राहुच शकत नाहीत - वैभव नाईक

By admin | Updated: April 14, 2017 20:09 IST

काँग्रेसला सोडचिठ्ठी देण्याची नारायण राणे यांची भूमिका ही स्वतःबरोबरच आपल्या मुलांच्या हितासाठीच आहे. प्रत्येकवेळी ते आपला स्वार्थ साधत असतात

ऑनलाइन लोकमत

कणकवली, दि. 14 : काँग्रेसला सोडचिठ्ठी देण्याची नारायण राणे यांची भूमिका ही स्वतःबरोबरच आपल्या मुलांच्या हितासाठीच आहे. प्रत्येकवेळी ते आपला स्वार्थ साधत असतात. सत्तेशिवाय ते क्षणभरही राहुच शकत नाहीत हे अनेकवेळा स्पष्ट झाले आहे. अशी टिका करतानाच नारायण राणे यांच्या भाजपा प्रवेशामुळे शिवसेनेला काहीही फरक पड़णार नाही. असे शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार वैभव नाईक यांनी स्पष्ट केले.  येथील विजय भवनमध्ये शुक्रवारी आयोजित पत्रकार परीषदेत ते बोलत होते. यावेळी उपजिल्हाप्रमुख राजू शेट्ये, विद्यार्थी सेनेचे तालुकाप्रमुख राजू राठोड, माजी नगरसेवक भुषण परुळेकर , भास्कर राणे आदी उपस्थित होते.यावेळी बोलताना आमदार नाईक म्हणाले, नारायण राणे यांनी काँग्रेसच्या माध्यमातून आठ वर्षे सत्ता भोगली आहे. तर त्यांच्या मुलांना खासदार , आमदार बनविण्यात आले आहे. त्याचप्रमाणे विधानसभा निवडणुकीत ते दोन वेळा पराभूत होऊन देखील त्यानी हट्टाने विधान परिषदेची आमदारकी मागून घेतली आहे. तसेच विधानपरिषद गटनेते पदही मिळविले आहे. मात्र, काँग्रेसच्या माध्यमातून एवढे सर्व मिळून सुध्दा आता ते पक्ष सोडून भाजपमध्ये जाण्याचा विचार करीत आहेत. हा केवळ त्यांचा स्वार्थच आहे.जनतेशी त्यांना काही देणेघेणे राहिलेले नाही. सत्तेशिवाय नारायण राणे क्षणभरही राहु शकत नाहीत. त्यासाठीच त्यांचे हे पक्ष बदलाचे प्रयत्न सुरु आहेत. त्यांना इडी मार्फत चौकशीच्या नोटिसा देण्यात आल्या आहेत. आपल्या पाठीमागचा हा चौकशीचा ससेमिरा लवकर थांबावा यासाठी सत्ताधारी पक्षात जाण्याचा त्यांचा विचार सुरु आहे. त्यासाठीच त्यांची सध्या सर्व धावपळ सुरु आहे. 12 वर्षापूर्वी त्यानी शिवसेना सोडली त्यावेळीही राज ठाकरे व त्यांची चर्चा झाली होती. सन 2009 च्या निवडणुकीनंतर शिवसेना सत्तेत येणार नाही.हे स्पष्ट झाल्यानेच त्यानी त्यावेळी शिवसेना सोडली होती. आता आगामी काळात पुन्हा काँग्रेस लवकर सत्तेत येणार नाही हे त्यांना समजल्यानेच त्यांची काँग्रेस पक्ष सोडण्याची हालचाल सुरु झाली आहे. मात्र, अहमदाबाद येथील घटनेनंतर त्यांची ही भूमिका जनतेसमोर उघड झाली आहे.त्यामुळे भविष्यात जे लोक काँग्रेसबरोबर रहातील त्यानी काँग्रेसमध्ये राणेंवर अन्याय झाला असे समजू नये. याउलट त्यानी काँग्रेसमध्येच रहावे. तर राणेंची साथ सोडून यापूर्वीच भाजप मध्ये प्रवेश केला आहे, त्यानीहि आपल्या भूमिकेवर ठाम रहात राणे विरोध कायम ठेवावा.हेच जिल्ह्याच्या हिताच्या दृष्टीने योग्य आहे आणि ही सिंधुदुर्गवासियांची इच्छा आहे.> राणेंच्या भाजप मध्ये जाण्याने शिवसेनेला काही फरक पड़त नाही. उलट राणे विरोधात असल्याने शिवसेना वाढत आहे. शिवसेनेचे खासदार, आमदार निवडून आले असून सत्तेतही शिवसेना आली आहे. अनेक सत्तास्थाने शिवसेनेच्या हातात आली आहेत.त्यामुळे यापुढेही शिवसेना सामान्य जनतेसाठी सर्व स्तरावर विकासाची भूमिका कायम लावून धरेल.वेळप्रसंगी संघर्षही करेल. असेही आमदार नाईक यांनी यावेळी सांगीतले

> "तो" विषय आपल्याकडे अद्याप आलेला नाही! काही दिवसांपूर्वी नारायण राणे पुन्हा शिवसेनेत प्रवेश करणार अशी चर्चा सर्वत्र रंगली होती. याविषयी बोलताना आमदार वैभव नाईक म्हणाले, " तो" विषय अद्याप आपल्याकडे आलेला नाही. त्यामुळे त्याविषयी कााही बोलण्यात अर्थ नाही.