शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025 IND vs PAK Final : ठरलं! इतिहासात पहिल्यांदाच भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल
2
'संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना NDRF निधीतून भरीव मदत द्या'; CM फडणवीसांची अमित शाहांकडे मागणी
3
इस्रायलची राजधानी तेलअवीव येथे कारमध्ये मोठा स्फोट, अनेक जण जखमी झाल्याची शक्यता
4
PAK vs BAN: Live मॅचमध्ये कॉमेडी! दोन्हीं बॅटर स्ट्राइक एन्डला; तरी Run Out करायला नाही जमलं (VIDEO)
5
संकट अद्याप टळलेले नाही, पुढील २ दिवस पाऊस वाढण्याचा अंदाज; विदर्भ, मराठवाड्यात काय होणार?
6
लडाख हिंसाचारानंतर सोनम वांगचुक यांच्यावर मोठी कारवाई; सरकारने रद्द केला एनजीओचा परवाना
7
Saim Ayub : आफ्रिदीच्या जावयाला टक्कर देण्याच्या नादात फजिती; सर्वाधिक वेळा पदरी पडला भोपळा!
8
कोथरूड मारहाण प्रकरणात निलेश घायवळही आरोपी; दहशत वाढवण्यासाठी दिली होती पिस्तुल
9
Suryakumar Yadav Hearing On PCB Complaint : सूर्याला फक्त वॉर्निंग की... फायनल आधी होणार फैसला!
10
'शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी PM केअर फंड वापरा'; उद्धव ठाकरेंची सरकारकडे मोठी मागणी
11
कपड्यांवरून ट्रोलिंगबाबत अखेर अमृता फडणवीस यांनी सोडलं मौन, म्हणाल्या- "ज्या महिलेकडे..."
12
झुबिन गर्गच्या मृत्यू प्रकरणात नवं वळण; संगीतकार ज्योती गोस्वामीला अटक, अनेकांची चौकशी सुरु
13
Taskin Ahmed 100 Wickets : पाक विरुद्ध बांगलादेशी गोलंदाजाची कमाल! पहिल्याच षटकात साधला 'शतकी' डाव
14
“विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची मानसिकता नाही, MPSC पुढे ढकला”; कुणी केली सरकारकडे मागणी? 
15
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
16
Asia Cup 2025 Final: सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
17
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
18
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
19
VIDEO: दिसण्यावर जाऊ नका... काकांनी गायलेलं रोमँटिंक गाणं ऐका, नक्कीच त्यांचे 'फॅन' व्हाल
20
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक

रणदिवेंचा उल्लेख राहून गेला

By admin | Updated: January 7, 2016 02:16 IST

‘संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचा इतिहास जिवंत राहावा, या साठी मुंबईत उभारलेल्या दालनात दिनू रणदिवे यांचा उल्लेख अनवधानाने राहून गेला

ठाणे : ‘संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचा इतिहास जिवंत राहावा, या साठी मुंबईत उभारलेल्या दालनात दिनू रणदिवे यांचा उल्लेख अनवधानाने राहून गेला, त्याबाबत मी जाहीर माफी मागतो. या दालनात त्यांचे साहित्य, त्यांच्या आठवणी आणि अनुभवांचा संग्रह ठेवण्यात येईल,’ असे आश्वासन शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि त्यांच्या मुखपत्राचे संपादक उद्धव ठाकरे यांनी दिले. मराठी पत्रकार परिषद, ठाणे शहर दैनिक पत्रकार आणि जिल्हा पत्रकार संघाने बुधवारी गडकरी रंगायतनमध्ये पत्रकार दिन व पुरस्कार वितरण सोहळा आयोजित केला होता. त्यात प्रमुख पाहुणे म्हणून ठाकरे बोलत होते. या कार्यक्रमात ज्येष्ठ पत्रकार दिनू रणदिवे यांना ठाकरे यांच्या हस्ते जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ज्येष्ठ पत्रकार दिनू रणदिवे यांना कधी हल्ल्याची भीती वाटली नाही. त्यांच्या पत्रकारितेचा आदर्श आताच्या पत्रकारांनी घेतला, तर त्यांनाही हल्ल्याची भीती वाटण्याचे कारण नाही. पूर्वीचे पत्रकार लोकांनी शहाणे व्हावे म्हणून लिहायचे. आताचे काही पत्रकार मात्र मी स्वत: किती शहाणा आहे, हे दाखविण्यासाठी लिहितात. पत्रकारांची ही वाटचाल कशी स्वीकारायची, असा प्रश्न त्यांनी केला. पत्रकार हा समाजाचा महत्त्वाचा घटक आहे. पत्रकारांनी समोरच्यावर टीका जरूर करावी, पण ती चूक दाखविणारी असावी. हाती असलेल्या शस्त्राने समोरच्यावर वार करून त्याला रक्तबंबाळ करू नये. आम्ही चुकलो तर आम्हाला आरसा दाखवा, मार्गदर्शक म्हणून आमच्या सोबत रहा, असे आवाहन त्यांनी केले. लहानपणापासून घरात संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचे वातावरण होते. तो प्रभाव आजही माझ्यावर कायम असून, पुढील पिढीला या चळवळीचा इतिहास कळावा म्हणूनच दालन उभारल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पत्रकारांनीच पथ्य पाळले, लिहिताना मर्यादांचे भान ठेवले, तर त्यांच्यावर कोण हल्ला करेल? पत्रकारांवर हल्ले होता कामा नयेत, या मताचा मी आहे, पण त्यांनी सीमा नीट पाळल्या, मर्यादा ओळखल्या, तर सर्व जण गुण्यागोविंदाने राहतील, असा सल्लाही ठाकरे यांनी दिला.विदर्भाला अनेक खाती मिळाली आहेत. मुख्यमंत्रीही विदर्भाचेच आहेत. त्यामुळे विदर्भाचा हवा तेवढा विकास करा. मात्र, महाराष्ट्र तोडू नका, अशी स्पष्ट भूमिका ठाकरे यांनी मांडली. सत्काराला उत्तर देताना दिनू रणदिवे यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या आठवणींना उजाळा दिला, तसेच बाळासाहेबांनी कशा रीतीने न डगमगता संयुक्त महाराष्ट्र पत्रिकेला व्यंगचित्रे दिली, त्याचे दाखले रणदिवे यांनी यावेळी दिले. वृत्तपत्रांचे प्रॉडक्ट झाले असल्याने आता संपादकांच्या वर प्रॉडक्ट मॅनेजर आले आहेत. वाचकाला नेमके काय द्यायचे, मजकुराची जाहिरातीशी सांगड कशी घालायची, या बाबतचे सर्व निर्णय ते घेतात, पण त्यांनाही वृत्तपत्रांचे आणि पत्रकारितेचे ज्ञान देण्याची गरज आहे. तसे झाले, तरच पत्रकारितेची परंपरा कायम राहील, अशी भूमिका ज्येष्ठ पत्रकार अरूण टिकेकर यांनी मांडली. ठाणे जिल्हा मराठी पत्रकार संघातर्फे जिल्ह्यातील ज्येष्ठ पत्रकाराला दिला जाणारा जीवनगौरव पुरस्कार सुधीर कोऱ्हाळे यांना देण्यात आला, तसेच उत्कृष्ट जिल्हा पत्रकार संघाचा रंगाण्णा वैद्य आदर्श जिल्हा पत्रकार संघ पुरस्कार भंडारा जिल्ह्याला देण्यात आला. पाकला इशारे देणारे मोदी दिसावेत मोदी यांनी निवडणुकीपूर्वी पाकला जे कडक इशारे दिले होते तसेच सडेतोड उत्तर ते आताही देतील अशी, आशा व्यक्त करत देशात घडणाऱ्या घटनांची नोंद जनता डोळसपणे घेत असते, असा टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी लगावला. ठाकरे पुढे म्हणाले की, पाकिस्तानने आतापर्यत आपला घातच केला आहे. पाकशी किती काळ चांगल्या भावनेने चर्चा करणार? परिस्थिती नियंत्रणात नसेल तर किती काळ चर्चेची वाट बघणार? लवकरात लवकर सडेतोड उत्तराची अपेक्षा आहे असल्याचे ठाकरे म्हणाले. राज्यातही फॉर्म्युल्याची आवश्यकतादिल्लीत वाहतूक कोंडीवर मात करण्याकरिता लागू केलेल्या सम-विषम फॉर्मुल्याचे स्वागत होत असून आपल्याकडेही वाहतूक कोंडी टाळण्याकरिता अशाच एखाद्या फॉर्म्युलाची आवश्यकता आहे, असे ठाकरे म्हणाले. सम-विषम क्रमांकाची वाहने विशिष्ट दिवशीच रस्त्यावर आणावीत या फॉर्म्युलाचे त्यांनी थेट समर्थन केले नाही. यावर मत मागवत असल्याचे मोघम उत्तर दिले.शिवसेना मंत्र्यांना कॉनव्हॉय हवापाकिस्तानी पत्रकारांना सुरक्षा दिली जाते तर आपल्या मंत्र्यांना का नको? मंत्री हे देखील जनतेचेच काम करीत आहेत. त्यांना कॉनव्हॉय द्यायचा की नाही हा सरकारचा प्रश्न आहे. मात्र हे मंत्री जिथे जातील तिथे त्यांना सुरक्षा मिळावी, अशी अपेक्षा आहे, असेही ते म्हणाले.खैरे यांची पाठराखणशेतकऱ्यांना सर्वात जास्त मदत शिवसेनेनी केली आहे. यापुढेही करणार आहे. त्यामुळे खैरे यांच्या घरातील विवाह सोहळ््यानिमित्त केलेल्या खर्चाचाा बाऊ करण्याची गरज नाही, असे सांगत ठाकरे यांनी खैरे यांची पाठराखण केली.अच्छे दिन नव्हे; चांगले दिवस येतीलसर्वांनी मिळून एकोप्याने काम केले तर अच्छे दिन नाही तर चांगले दिवस आल्याशिवाय राहणार नाही असा टोमणाही ठाकरे यांनी मोदींना कार्यक्रमातील भाषणाच्या शेवटी दिला.