शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

राणेंच्या भूमिकेवर तोडगा?

By admin | Updated: July 21, 2014 03:31 IST

ही बैठक जवळपास ४० मिनिटे चालली. राणे यांच्या नाराजीवर गंभीरपणे पक्षांतर्गत चर्चा सुरू असून त्यातून अजूनही सन्मान्य तोडगा निघू शकेल, असे संकेत मिळू लागले आहेत.

नवी दिल्ली : महाराष्ट्रातील काँग्रेसमध्ये बदलाची शक्यता पूर्णपणे मावळली असताना उद्योगमंत्री नारायण राणे यांच्या बंडाच्या पार्श्वभूमीवर रविवारी सायंकाळी अचानक मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे व माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी सोनिया गांधी यांची भेट घेतल्याने राजकीय वातावरण पुन्हा तापले. ही बैठक जवळपास ४० मिनिटे चालली. राणे यांच्या नाराजीवर गंभीरपणे पक्षांतर्गत चर्चा सुरू असून त्यातून अजूनही सन्मान्य तोडगा निघू शकेल, असे संकेत मिळू लागले आहेत.सूत्रांनी सांगितले, की सोनियांचे राजकीय सल्लागार अहमद पटेल यांची स्वतंत्रपणे भेट घण्याच्या सूचना त्यांना देण्यात आल्या होत्या. सुशीलकुमार शिंदे यांनी अ‍ॅण्टोनी समितीपुढे स्वतंत्रपणे आपले मत मांडले होते. आता पुन्हा त्यांना काँग्रेस श्रेष्ठींनी बोलविल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. मात्र चव्हाण यांच्या निकटच्या सूत्रांनी सांगितले, की मुख्यमंत्र्यांबाबत कोणतीच चर्चा नसून, नाराज राणे यांच्या भूमिकेनंतर राज्यातील काँग्रेसच्या स्थितीवर चर्चा हाच विषय होता.काँग्रेस सूत्रांनी सांगितले, की सोमवारी नारायण राणे पक्ष नव्हे, तर मंत्रिपद सोडणार आहेत. पक्षात चैतन्य आणण्याची तयारी सुरू असताना या भूमिकेमुळे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात गेल्या तीन दिवसांत पक्षाच्या प्रतिमेला धक्का बसत आहे, त्यावर या बैठकीत चर्चा झाली. राणेंची नाराजी दूर कशी करता येईल, याची रणनीती ठरविण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. राणे यांचे समर्थक शिवसेनेत गेल्याने त्यांच्या या नव्या राजकीय चालीला किती ताकद द्यावी, यावरही विचार होत आहे. राणेंची व्यूहनीती कशी असेल, ते राजकीय संघटना काढून पक्षापुढे आव्हान उभे करतील का, पक्षातील नेत्यांना ते लक्ष्य बनविणार आहेत का असे सर्व प्रश्न चर्चेला होते. पण प्रत्यक्षात राणे यांनी पक्ष सोडण्याचे कोणतेही संकेत दिलेले नाहीत, किंबहुना आपण काँग्रेसमध्येच आहोत, असे स्पष्ट केले आहे. राणेंनी काँग्रेसच्या पराभवाची कारणमीमांसा करणाऱ्या ए.के. अण्टोेनी समितीसमोर जे मुद्दे मांडले होते, त्याची उजळणी करण्यात आली. त्यामुळेच त्यांची भूमिका आणि मते गंभीरपणे घेऊन त्यावर तोडगा काढण्यासाठी पक्षांतर्गत खल सुरू असल्याचे स्पष्ट होत आहे.काँग्रेसच्या विभागवार होणाऱ्या बैठकी २६ जुलैपर्यंत संपवा असे सूचित करण्यात आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक आघाडी करण्याचा प्रस्ताव आलेला आहे. मात्र कार्यकर्त्यांची इच्छा जाणून घेतल्यावरच २६ जुलैनंतर वाटाघाटी करावयाच्या की स्वतंत्र लढायचे ते ठरेल,यावर चर्चा झाल्याचे सूत्रांनी सांगितले. (विशेष प्रतिनिधी)