शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धवजी, हंबरडा राखून ठेवा, महापालिकेतील पराभवानंतर तुमच्या..."; शेलारांचे ठाकरेंना उत्तर
2
या उद्योगातील ५० हजार नोकऱ्या धोक्यात! हळूच जातील जॉब; हा आहे कंपन्यांचा प्लान
3
सोन्यापासून बनवला सगळ्यात महागडा ड्रेस, तुम्ही बघितला का? वजन १० किलो आणि किंमत...
4
"मी आरशात बघतो, पण तुम्ही शेतकऱ्यांकडे तरी बघा"; CM फडणवीसांच्या टीकेला उद्धव ठाकरेंचे प्रत्युत्तर
5
नोबेल परत घ्या, मुस्लिम संघटनांनी मारिया कोरिना मचाडो यांच्या विरोधात आंदोलन केले सुरू
6
"...तर दोन्ही उपमुख्यमंत्री साधे मंत्री म्हणून फिरले पाहिजेत"; ठाकरेंचं नियमावर बोट, सरकारला सुनावले खडेबोल
7
मोदींचा ‘तो’ फोटो शेअर करणाऱ्या मामा पगारेंना काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी घेतलं खांद्यावर, केला सत्कार
8
"सत्याने प्रेरीत पण...", 'बॅड्स ऑफ..' वादावर आर्यन खाननं सोडलं मौन; समीर वानखेडे प्रकरणावर म्हणाला...
9
पश्चिम बंगाल पुन्हा 'आरजी कर'सारखी घटना; MBBS च्या विद्यार्थिनीवर सामूहिक अत्याचार...
10
'कबुतरांमुळे महायुतीचं सरकार जाईल', शांतीदूत जनकल्याण पार्टी लढवणार मुंबई महापालिका निवडणूक; जैन मुनींनी केली घोषणा
11
IND vs WI 2nd Test Day 2 Stumps: टीम इंडिया पुन्हा तिसऱ्या दिवशीच कॅरेबियन पाहुण्यांचा 'करेक्ट कार्यक्रम' करणार?
12
Diwali Astro 2025: दिवाळीच्या प्रकाशपर्वात भाग्य उजळणार! राशीनुसार पहा आनंद आणि ऐश्वर्य योग!
13
वीरेंद्र सेहवागची पत्नी करतेय बीसीसीआय अध्यक्षांना डेट? सोशल मीडियावर अफवांचं वादळ, तो फोटो ठरतोय कारण
14
भारताच्या शस्त्रांपुढे पाकिस्तानचे काहीच चालणार नाही; कितीही साठा वाढवला तरीही उपयोग नाही
15
'डेंजर झोन'मध्ये साई सुदर्शननं घेतला जबरदस्त No Look Catch! कॅरेबियन बॅटरसह सगळेच शॉक (VIDEO)
16
"मोदी सरकारने अदानीच्या कल्याणमधील सिमेंट कंपनीसाठी सर्व नियम बदलले", काँग्रेसचा गंभीर आरोप
17
दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मोदी सरकारचे मोठे गिफ्ट; लॉन्च केल्या ₹35,440 कोटींच्या दोन योजना...
18
बँकांत तब्बल १७६ कोटी रुपये पडून, तुमचे तर नाहीत ना? मालकच मिळेनात, १० वर्षांपासून ग्राहक फिरकले नाहीत, पैसे नेण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन
19
बिहारमध्ये काँग्रेसचं टेन्शन वाढलं...! 57 पेक्षा जास्त जागा द्यायला लालूंचा नकार; आता काय होणार?
20
पैशांसाठी पोलिसांची हैवानियत! पास झाला म्हणून पार्टी करणाऱ्या विद्यार्थ्याला मारहाण; पॅनक्रियाज हॅमरेजने मृत्यू

राणेंच्या भूमिकेवर तोडगा?

By admin | Updated: July 21, 2014 03:31 IST

ही बैठक जवळपास ४० मिनिटे चालली. राणे यांच्या नाराजीवर गंभीरपणे पक्षांतर्गत चर्चा सुरू असून त्यातून अजूनही सन्मान्य तोडगा निघू शकेल, असे संकेत मिळू लागले आहेत.

नवी दिल्ली : महाराष्ट्रातील काँग्रेसमध्ये बदलाची शक्यता पूर्णपणे मावळली असताना उद्योगमंत्री नारायण राणे यांच्या बंडाच्या पार्श्वभूमीवर रविवारी सायंकाळी अचानक मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे व माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी सोनिया गांधी यांची भेट घेतल्याने राजकीय वातावरण पुन्हा तापले. ही बैठक जवळपास ४० मिनिटे चालली. राणे यांच्या नाराजीवर गंभीरपणे पक्षांतर्गत चर्चा सुरू असून त्यातून अजूनही सन्मान्य तोडगा निघू शकेल, असे संकेत मिळू लागले आहेत.सूत्रांनी सांगितले, की सोनियांचे राजकीय सल्लागार अहमद पटेल यांची स्वतंत्रपणे भेट घण्याच्या सूचना त्यांना देण्यात आल्या होत्या. सुशीलकुमार शिंदे यांनी अ‍ॅण्टोनी समितीपुढे स्वतंत्रपणे आपले मत मांडले होते. आता पुन्हा त्यांना काँग्रेस श्रेष्ठींनी बोलविल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. मात्र चव्हाण यांच्या निकटच्या सूत्रांनी सांगितले, की मुख्यमंत्र्यांबाबत कोणतीच चर्चा नसून, नाराज राणे यांच्या भूमिकेनंतर राज्यातील काँग्रेसच्या स्थितीवर चर्चा हाच विषय होता.काँग्रेस सूत्रांनी सांगितले, की सोमवारी नारायण राणे पक्ष नव्हे, तर मंत्रिपद सोडणार आहेत. पक्षात चैतन्य आणण्याची तयारी सुरू असताना या भूमिकेमुळे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात गेल्या तीन दिवसांत पक्षाच्या प्रतिमेला धक्का बसत आहे, त्यावर या बैठकीत चर्चा झाली. राणेंची नाराजी दूर कशी करता येईल, याची रणनीती ठरविण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. राणे यांचे समर्थक शिवसेनेत गेल्याने त्यांच्या या नव्या राजकीय चालीला किती ताकद द्यावी, यावरही विचार होत आहे. राणेंची व्यूहनीती कशी असेल, ते राजकीय संघटना काढून पक्षापुढे आव्हान उभे करतील का, पक्षातील नेत्यांना ते लक्ष्य बनविणार आहेत का असे सर्व प्रश्न चर्चेला होते. पण प्रत्यक्षात राणे यांनी पक्ष सोडण्याचे कोणतेही संकेत दिलेले नाहीत, किंबहुना आपण काँग्रेसमध्येच आहोत, असे स्पष्ट केले आहे. राणेंनी काँग्रेसच्या पराभवाची कारणमीमांसा करणाऱ्या ए.के. अण्टोेनी समितीसमोर जे मुद्दे मांडले होते, त्याची उजळणी करण्यात आली. त्यामुळेच त्यांची भूमिका आणि मते गंभीरपणे घेऊन त्यावर तोडगा काढण्यासाठी पक्षांतर्गत खल सुरू असल्याचे स्पष्ट होत आहे.काँग्रेसच्या विभागवार होणाऱ्या बैठकी २६ जुलैपर्यंत संपवा असे सूचित करण्यात आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक आघाडी करण्याचा प्रस्ताव आलेला आहे. मात्र कार्यकर्त्यांची इच्छा जाणून घेतल्यावरच २६ जुलैनंतर वाटाघाटी करावयाच्या की स्वतंत्र लढायचे ते ठरेल,यावर चर्चा झाल्याचे सूत्रांनी सांगितले. (विशेष प्रतिनिधी)