शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
2
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
3
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
4
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
5
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
6
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
7
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
8
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
9
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
10
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
11
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
12
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
13
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
14
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
15
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
16
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
17
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
18
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
19
डेटिंग अ‍ॅपवरून सुंदर तरुणी कॅफेत भेटायला आली, १२००० रुपयांचे बिल केले आणि पळून गेली... तरुण बिचारा...
20
एअर इंडियाच्या आणखी एका विमानाला बॉम्बची धमकी; सौदी अरेबियात आपत्कालीन लँडिंग

राणेंच्या भूमिकेवर तोडगा?

By admin | Updated: July 21, 2014 03:31 IST

ही बैठक जवळपास ४० मिनिटे चालली. राणे यांच्या नाराजीवर गंभीरपणे पक्षांतर्गत चर्चा सुरू असून त्यातून अजूनही सन्मान्य तोडगा निघू शकेल, असे संकेत मिळू लागले आहेत.

नवी दिल्ली : महाराष्ट्रातील काँग्रेसमध्ये बदलाची शक्यता पूर्णपणे मावळली असताना उद्योगमंत्री नारायण राणे यांच्या बंडाच्या पार्श्वभूमीवर रविवारी सायंकाळी अचानक मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे व माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी सोनिया गांधी यांची भेट घेतल्याने राजकीय वातावरण पुन्हा तापले. ही बैठक जवळपास ४० मिनिटे चालली. राणे यांच्या नाराजीवर गंभीरपणे पक्षांतर्गत चर्चा सुरू असून त्यातून अजूनही सन्मान्य तोडगा निघू शकेल, असे संकेत मिळू लागले आहेत.सूत्रांनी सांगितले, की सोनियांचे राजकीय सल्लागार अहमद पटेल यांची स्वतंत्रपणे भेट घण्याच्या सूचना त्यांना देण्यात आल्या होत्या. सुशीलकुमार शिंदे यांनी अ‍ॅण्टोनी समितीपुढे स्वतंत्रपणे आपले मत मांडले होते. आता पुन्हा त्यांना काँग्रेस श्रेष्ठींनी बोलविल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. मात्र चव्हाण यांच्या निकटच्या सूत्रांनी सांगितले, की मुख्यमंत्र्यांबाबत कोणतीच चर्चा नसून, नाराज राणे यांच्या भूमिकेनंतर राज्यातील काँग्रेसच्या स्थितीवर चर्चा हाच विषय होता.काँग्रेस सूत्रांनी सांगितले, की सोमवारी नारायण राणे पक्ष नव्हे, तर मंत्रिपद सोडणार आहेत. पक्षात चैतन्य आणण्याची तयारी सुरू असताना या भूमिकेमुळे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात गेल्या तीन दिवसांत पक्षाच्या प्रतिमेला धक्का बसत आहे, त्यावर या बैठकीत चर्चा झाली. राणेंची नाराजी दूर कशी करता येईल, याची रणनीती ठरविण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. राणे यांचे समर्थक शिवसेनेत गेल्याने त्यांच्या या नव्या राजकीय चालीला किती ताकद द्यावी, यावरही विचार होत आहे. राणेंची व्यूहनीती कशी असेल, ते राजकीय संघटना काढून पक्षापुढे आव्हान उभे करतील का, पक्षातील नेत्यांना ते लक्ष्य बनविणार आहेत का असे सर्व प्रश्न चर्चेला होते. पण प्रत्यक्षात राणे यांनी पक्ष सोडण्याचे कोणतेही संकेत दिलेले नाहीत, किंबहुना आपण काँग्रेसमध्येच आहोत, असे स्पष्ट केले आहे. राणेंनी काँग्रेसच्या पराभवाची कारणमीमांसा करणाऱ्या ए.के. अण्टोेनी समितीसमोर जे मुद्दे मांडले होते, त्याची उजळणी करण्यात आली. त्यामुळेच त्यांची भूमिका आणि मते गंभीरपणे घेऊन त्यावर तोडगा काढण्यासाठी पक्षांतर्गत खल सुरू असल्याचे स्पष्ट होत आहे.काँग्रेसच्या विभागवार होणाऱ्या बैठकी २६ जुलैपर्यंत संपवा असे सूचित करण्यात आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक आघाडी करण्याचा प्रस्ताव आलेला आहे. मात्र कार्यकर्त्यांची इच्छा जाणून घेतल्यावरच २६ जुलैनंतर वाटाघाटी करावयाच्या की स्वतंत्र लढायचे ते ठरेल,यावर चर्चा झाल्याचे सूत्रांनी सांगितले. (विशेष प्रतिनिधी)