शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
3
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
4
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
5
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
6
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
7
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
8
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
9
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
10
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
11
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
12
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
13
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
14
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
15
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
16
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
17
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
18
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
19
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
20
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."

रामराजेंनी केली मध्यस्थांकरवी याचना!--उदयनराजे भोसले यांचा गौप्यस्फोट-

By admin | Updated: April 4, 2015 00:09 IST

असे छप्पन्न छत्रपती आले तरी बेहत्तर!-- ---रामराजेंची जहरी टीका : मी घाबरणार नाही--सातारा राजे संघर्ष

सातारा : ‘रामराजेंच्या काळातील जलसंपदा विभागातील तीन चौकशा चालू आहेत. कोंडाणे धरणाप्रमाणेच निवकणे धरणाचीही चौकशी सुरू झाली आहे. अशा अनेक चौकशांचा ससेमिरा आता सुरू होणार आहे. तेव्हा, त्यांच्या या मर्कटलीलांचा जाब आम्ही शेतकरी हितासाठी विचारला तर त्यात वावगं काय? आम्ही नीरा-देवघरच्या पाण्याविषयी फलटणला बैठक घेणार समजल्यावर दूरभाषेवरून मध्यस्थांकरवी हा प्रश्न जास्त लावून धरू नका, अशी याचनाही याच रामराजेंनी केली,’ असा गौप्यस्फोट खासदार उदयनराजे भोसले यांनी एका पत्रकान्वये केला आहे.ते पुढे म्हणाले की, ‘सभापतिपदावर असताना तुम्हाला निवडणूक लढवता येते की नाही? ते माहिती आहे. तथापि, सभापतिपदाचा राजीनामा देऊन मग आम्हाला, निवडणुकीचे आव्हान दिले असते तर तुमच्यात अजून काही तरी राम दिसला असता. आपली खुर्ची आणि लाल दिवा सुरक्षित ठेवून, तुम्ही लढण्याची भाषा करीत आहात म्हणजे पडलं तरी तुमचा लाल दिवा सुरक्षित, नाक कापलं गेलं तरी भोके सुरक्षित अशी तुमची रावणाची सोयीस्कर चाल आहे.’‘अहो, राम-रघुनाथराव, लढण्याची तुमची शारीरिक ताकद आता राहिली आहे का? तरी सुध्दा खुमखुमी असेल तर आधी सभापती आणि विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा द्या आणि मग आव्हान देण्याची भाषा करा, असे आव्हान देणारे आमच्यापुढे नंतर नसलेली-असलेली शेपटं घालतात, असे कित्तेकवेळा झालेले आहे,’ असाही टोमणा शेवटी उदयनराजे यांनी मारला आहे.उदयनराजेंचे चार प्रश्ननीरा-देवघरचे पाणी वाटप नियोजन का बदलले ?१५-२० वर्षांत रकमा खर्च होऊनही सिंंचन का झाले नाही?पाणी शिवारात का पोहोचले नाही ? कृष्णा खोऱ्याच्या कामात प्रचंड अनियमितता का झाली ?(संबंधित बातमी पान २)रामराजेंची जहरी टीका : मी घाबरणार नाहीतरडगाव : ‘फलटण तालुक्याच्या विकासाशी काडीचा संबंध नसणाऱ्यांकडून छत्रपती नावाचं मार्केटिंग करून तालुक्यात दहशतीचे वातावरण निर्माण केले जात आहे. तसेच माझ्याविरोधात भ्रष्टाचाराचे पुरावे सादर करू, अशी भीती दाखवली जात आहे. परंतु, सर्वसामान्य जनतेची ताकद माझ्या पाठीशी असल्याने असे छप्पन छत्रपती आले तरी मी घाबरणार नाही,’ असा टोला रामराजे नाईक-निंबाळकर यांनी उदयनराजे यांना लगावला.तरडगाव येथे ‘श्रीराम’च्या निवडणूक प्रचारात ते बोलत होते. ‘ज्यांना नीरा-देवघर धरणात पाणी किती आहे, ते माहीत नाही. ज्यांनी पुनर्वसनाच्या बैठका कधी घेतल्या नाहीत, ज्यांनी उरमोडी बघितली आहे की नाही, ज्यांना स्वत:च्या मतदारसंघाचा विकास साधता आला नाही व फलटण तालुक्याच्या विकासाशी ज्यांचा काही संबंध नाही, अशा व्यक्तीकडून तालुक्यातील हस्तक्षेप कधीही मान्य केला जाणार नाही. त्यास कायम आपला विरोध राहील. मला भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली अडविण्यास निघालेल्यांना मी कधी व कसा अडकवेन हे कळू देखील देणार नाही,’ असा इशारा रामराजेंनी उदयनराजेंनरामराजेंचे चार प्रश्न कारखान्याची ऐंशी कोटींची जमीन खरेदी कराल का ?पाटबंधारेसाठी निधी आणणार का ?एफआरपी प्रमाणे केंद्राकडून उसाला दर आणणार का ?प्रश्न सोडविणार नसाल तर राजीनामा देणार का ?