शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

रामनाथ कोविंद मुंबईत दाखल, ढोल ताशांच्या गजरात स्वागत

By admin | Updated: July 15, 2017 11:30 IST

मुंबई विमानतळावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी रामनाथ गोविंद यांचं स्वागत केलं

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 15 - राष्ट्रीय लोकशाही आघाडी (रालोआ)चे राष्ट्रपतिपदाचे उमेदवार रामनाथ कोविंद मुंबईत दाखल झाले आहेत. रामनाथ कोविंद आज एका दिवसाच्या मुंबई दौ-यावर आहेत. मुंबई विमानतळावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी रामनाथ गोविंद यांचं स्वागत केलं. यानंतर रामनाथ कोविंद मरिन ड्राईव्ह येथील गरवारे क्लबमध्ये दाखल झाले असून त्याठिकाणी ढोल ताशांच्या गजरात त्यांचं स्वागत करण्यात आलं. गरवारे क्लबमध्ये शिवसेनेचे आमदारदेखील उपस्थित आहेत.
 
गरवारे क्लबमध्ये आयोजित मेळाव्यात रामनाथ कोविंद महाराष्ट्रातील रालोआचे खासदार आणि आमदारांना संबोधित करणार आहेत. 
 
आणखी वाचा
 
रामनाथ कोविंद यांच्याविरोधात विरोधी पक्षांतर्फे काँग्रेस नेत्या मीरा कुमार यांना राष्ट्रपतिपदाची निवडणूक लढविण्याची उमेदवारी देण्यात आली आहे. पण अजूनही मीरा कुमार या निवडणुकीत विजयापासून दूर आहेत. पण याउलट एनडीएचे उमेदवार रामनाथ कोविंद यांचा विजय जवळपास निश्चित मानला जातो आहे. कोविंद यांच्या खात्यात निवडणुकीच्या आधीच एनडीए आणि इतर पक्षांकडून मिळणारी 63.1 टक्के मत जमा आहेत. रामनाथ कोविंद यांना एनडीएच्या 48.9 टक्के मतांचा पाठिंबा आहे. तर जदयूच्या 1.91 टक्के, अण्णाद्रमुखच्या 5.39 टक्के, बिजू जनता दलाच्या 2.99 टक्के , तेलंगणा राष्ट्रसमितीच्या 2 टक्के ,  वायएसआरसीपीच्या 1.53 टक्के आणि आयएनएलडी या पक्षाच्या 0.38 टक्के मतांचा पाठिंबा रामनाथ कोविंद यांना मिळाला आहे. एकुण मिळून 63.1 टक्के मतांनी रामनाथ कोविंद यांचं पारडं जड आहे. म्हणूनच राष्ट्रपति पद त्यांच्याकडेच जाणार अशी शक्यता निर्माण झाली आहे.
 
भाजपाकडून जेव्हा बिहारचे राज्यपाल रामनाथ कोविंद यांचं नाव राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी जाहीर करण्यात आलं तेव्हा भाजपचा मित्र पक्ष असलेल्या शिवसेनेची भूमिका निश्चित नव्हती. दलित मतदारांना आपल्याकडे वळविण्यासाठी रामनाथ कोविंद यांचं नावं पुढे केलं जातं आहे, असा आरोप शिवसेनेने केला होता. पण त्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रामनाथ कोविंद यांना पाठिंबा दर्शविला. शिवसेनेची 2.34 टक्के मतं रामनाथ कोविंद यांना मिळणार आहेत.