शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
3
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
4
नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव लागणार; CM फडणवीसांचे कृती समितीला आश्वासन
5
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
6
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
7
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
8
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
9
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
10
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
11
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
12
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
13
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
15
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
17
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
18
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
19
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
20
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!

रामजन्मभूमीचे तुकडे मान्य नाहीत- विहिंप

By admin | Updated: December 28, 2016 21:18 IST

अयोध्येतील रामजन्मभूमीवर पूर्णपणे हिंदूंचाच अधिकार आहे.

ऑनलाइन लोकमतनागपूर, दि. 28 - अयोध्येतील रामजन्मभूमीवर पूर्णपणे हिंदूंचाच अधिकार आहे. या जमिनीचे तीन तुकडे होऊ देणे आम्हाला मान्य नाही. तेथील संपूर्ण वादग्रस्त जमीन ही मंदिरासाठीच देण्यात आली पाहिजे, अशी टोकाची भूमिका विश्व हिंदू परिषदेने घेतली आहे. गुरुवारपासून नागपुरात विहिंपच्या केंद्रीय व्यवस्थापन समिती व प्रतिनिधी मंडळाचे संयुक्त अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. यासाठी नागपुरात आलेले आंतरराष्ट्रीय महामंत्री चंपत राय यांनी ही भूमिका मांडली.रामजन्मभूमीचा वाद न्यायप्रविष्ट आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयाने येथील वादग्रस्त जमिनीचे तीन तुकडे करण्याचा निर्णय दिला होता. मात्र मूळ दावा हा या जमिनीचे तुकडे करण्यासंदर्भात नव्हताच. अशा स्थितीत जमिनीच्या तीन भागांना मान्यता कशी द्यायची, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. केंद्र शासन राम मंदिराबाबत सध्या शांत असले तरी येत्या काळात निश्चित मंदिराची निर्मिती होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.हिंदू संस्कृतीपासून दूर गेल्याने भ्रष्टाचारात वाढदेशात भ्रष्टाचार, दुराचार वाढीस लागला आहे. हिंदू संस्कृतीपासून दूर गेल्याने भ्रष्टाचार वाढीस लागला आहे, असा दावा राय यांनी केला. हिंदूंनी अस्पृश्यतेच्या कुप्रथेपासून दूर जाण्याची आवश्यकता आहे. देशातील सर्वच धर्माचे लोक एकेकाळी  हिंदूच होते. इस्लाम व ख्रिश्चन धर्मातील लोकांना त्यांच्या पूर्वजांची आठवण करून द्यावी लागेल. जर असे झाले तर देशातील अनेक समस्या दूर होतील, असेदेखील ते म्हणाले.