शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
3
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
4
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
5
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
6
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
7
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
8
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
9
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
10
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
11
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
12
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
13
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
14
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
15
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
16
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
17
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
18
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
19
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
20
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
Daily Top 2Weekly Top 5

वनौषधींच्या विक्रीसाठी रामदेवबाबांना साकडे!

By admin | Updated: January 21, 2016 03:50 IST

आदिवासींनी संकलित केलेल्या वनोपजांवर प्रक्रिया करून तयार केलेल्या वनौषधींना व्यापक बाजारपेठ मिळावी, यासाठी पतंजलीच्या दुकानांमधून या वस्तू विक्रीस ठेवल्या जाव्यात

मुंबई : आदिवासींनी संकलित केलेल्या वनोपजांवर प्रक्रिया करून तयार केलेल्या वनौषधींना व्यापक बाजारपेठ मिळावी, यासाठी पतंजलीच्या दुकानांमधून या वस्तू विक्रीस ठेवल्या जाव्यात, असे साकडे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी रामदेवबाबांना घातले आहे.आदिवासींना मोठ्या प्रमाणात रोजगार मिळावा, त्यातून त्यांची जीवनोन्नती व्हावी, हा उद्देश डोळ्यासमोर ठेऊन आपण रामदेवबाबा यांची भेट घेतल्याचे मुनगंटीवार यांनी सांगितले. रामदेव बाबांनी मध, कोरफड जेल, आवळा यासारख्या वस्तू खरेदी करण्याची तयारी दर्शविली आहे. यासंबंधीच्या अटी आणि शर्ती निश्चित झाल्यानंतर लवकरच वनविभाग आणि पतंजली उद्योग समूह यांच्यात सामंजस्य करार केला जाईल, ज्यातून पतंजली उद्योगसमूह या वनधनापोटी निश्चित रक्कम वनविभागास प्रदान करील, अशी माहिती मुनगंटीवार यांनी दिली.रामदेव बाबांनी वनधनाच्या विक्रीतून कमीत कमी २० कोटी रुपयांची मासिक उलाढाल होऊ शकेल, असा दावाही त्यांनी केला. वनमंत्री म्हणाले की, ‘राज्यातील वनवृत्तामध्ये आदिवासी लोकांचे वास्तव्य असून, त्यांच्याकडून विविध प्रकारचे गौण वनोपज संकलित केले जाते. शासनाने यासाठीच राज्य अर्थसंकल्पात श्यामाप्रसाद मुखर्जी जनवन योजनेची घोषणा केली होती. आता या योजनेंतर्गत असलेल्या संयुक्त वन व्यवस्थापन समित्यांच्या माध्यमातून या वनौषधींना व्यापक बाजारपेठ मिळवून देण्यात येत आहे. आजच्या बैठकीनंतर वनविभाग या विषयाचा पाठपुरावा करणार असून, भविष्यात यासंबंधीची पतंजली समूहाबरोबरची दुसरी बैठक हरिद्वार येथे होणार आहे.’वनमंत्र्यांनी हरित महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी ३ जुलै रोजी राज्यात एकाच वेळी २ कोटी वृक्ष लागवडीची महत्त्वाकांक्षी योजना आखल्याची माहिती रामदेव बाबांना दिली. यावर बाबांनी या कामासाठी ३ लाख स्वयंसेवकांची सेवा उपलब्ध करून दिली जाईल, असे सांगितले. हरिद्वारच्या धर्तीवर नागपूर येथे सर्वात मोठे फूड पार्क सुरू करणार असल्याची माहिती ही रामदेव बाबांनी यावेळी दिली.