शहरं
Join us  
Trending Stories
1
“CM फडणवीसांना टोमणा नाही, मित्र म्हणून सल्ला देतो की...”; नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे?
2
“शेतकऱ्यांनो विसरा हमी… खेळा रम्मी…”; कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंवर विरोधकांची सडकून टीका
3
"राणे कुटुंबाने खून केलेले लोक हिंदूंच होते, नितेश राणेंनी वडिलांना..."; मनसे नेत्यांचे खळबळजनक आरोप
4
“बोले तैसा चाले आहे की वाकडी यांची पाऊले ते कळेल”; निवृत्तीवरून ठाकरेंचा RSS-मोदींना टोला
5
पगारातून कापला गेलेला TDS आता सहज परत मिळणार, सरकार बदलणार नियम, कधीपासून लागू?
6
'सन ऑफ सरदार २' पोस्टपोन, 'या' सिनेमाला घाबरुन बदलली रिलीज डेट? नवीन तारीख समोर
7
अरेच्चा...! पत्नी मागेच राहिली, केंद्रीय मंत्र्याने १ किमीवरून ताफा पुन्हा मागे वळवला; काय घडलं?
8
"कमी जागा मिळो अथवा जास्त, मुख्यमंत्री नितीश कुमारच होणार", जदयूचा भाजपला स्पष्ट मेसेज, एनडीएमध्ये पेच
9
गिरगाव चौपाटीवर मासेमारीस मज्जाव? बंदर बंद झाल्याने बोटी हटविण्याचे मच्छीमारांना आदेश
10
पाकिस्तान समर्थक जमात ए इस्लामीने बांगलादेशात दाखवली ताकद; देशात इस्लामिक राजवटीचे संकेत?
11
तेल ते टेलिकॉमपर्यंत... उद्योगपती मुकेश अंबानींचं साम्राज्य किती मोठं? इतक्या कंपनीचे आहेत मालक
12
महाराष्ट्रातील ४-५ मंत्र्यांना मिळणार डच्चू?; संजय राऊतांचा दावा, एका मंत्र्याचं नावही सांगितले
13
लँडिंगची तयारी अन् अचानक उड्डाण; दोन विमानांच्या २५ मिनिटे आकाशात! इंडिगोच्या विमानांमध्ये प्रवाशांचा थरकाप
14
शेतीचे असंख्य प्रश्न प्रलंबित, कृषीमंत्री ‘रमी’ खेळण्यात मग्न; रोहित पवारांनी व्हिडिओच दाखवला
15
"दिवसाला ८ शेतकरी आत्महत्या अन् कृषिमंत्री विधानसभेत बसून रमी खेळतायेत, लाज वाटत नाही का?"
16
'स्लीपिंग प्रिन्स'ची २० वर्षांची लढाई संपली! वडिलांनी लाईफ सपोर्ट काढण्यास दिला होता नकार!
17
ओडिशात नराधमांनी किशोरवयीन मुलीला पेटवले, ७० टक्के भाजल्याने प्रकृती गंभीर
18
Live in Partner Murder: 'एएसआय' लिव्ह पार्टनरची हत्या, ज्या पोलीस ठाण्यात होती सेवेत तिथेच गेला शरण
19
भारत-पाकिस्तान सामना रद्द; तीव्र नाराजीनंतर WCL आयोजकांनी मागितली जाहीर माफी, म्हणाले...
20
विधानसभा विरोधी पक्षनेतेपद रिकामेच, आता नागपूर अधिवेशनापर्यंत प्रतीक्षा!

रामदास कदम - शेट्टी यांच्यात तू तू मैं मैं

By admin | Updated: September 25, 2014 09:19 IST

महायुतीच्या मंगळवारी रात्री झालेल्या बैठकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी व शिवसेना नेते आमदार रामदास कदम यांच्यात अक्षरश: तू तू मैं मैं झाल्याचे वृत्त आहे.

संदीप प्रधान, मुंबईमहायुतीच्या मंगळवारी रात्री झालेल्या बैठकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी व शिवसेना नेते आमदार रामदास कदम यांच्यात अक्षरश: तू तू मैं मैं झाल्याचे वृत्त आहे.वांद्रे-कुर्ला संकुलातील एका हॉटेलात सेनेचे नेते दिवाकर रावते, रामदास कदम, अनिल देसाई व संजय राऊत हे नियोजित वेळी पोहोचले. मात्र भाजपाच्या किंवा मित्रपक्षांच्या नेत्यांचा पत्ता नव्हता. अर्ध्या तासानंतर भाजपा प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस व विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते विनोद तावडे हे दाखल झाले. त्यानंतर जवळपास पाऊण तासानंतर ओम माथूर बैठकीच्या ठिकाणी पोहोचले. यामुळे अगोदरच शिवसेना नेते अस्वस्थ झाले होते. सध्या शिवसेना व भाजपा नेत्यांमध्ये एकमेकांच्या सहनशीलतेचा अंत पाहण्याची अहमहमिका लागलेली आहे.बैठक सुरू होताच केवळ सात जागा मिळत असल्याने स्वाभिमानीच्या राजू शेट्टी यांच्या संतापाचा कडेलोट झाला. तुम्ही आम्हाला काय भिकारी समजता का? आम्ही तुमच्याकडे कटोरा घेऊन आलो नाही. दोन महिने आपली चर्चा सुरू आहे ती केवळ सात जागा देऊ करण्याकरिता का? शेट्टी यांचा आवाज चढल्याने शिवसेनेच्या रामदास कदम यांचे पित्त खवळले. तोंड संभाळून बोला. इतके टोकाचे बोलायचे असेल तर चर्चा कशाला करायची? तुमची भाषा बरोबर नाही, अशा शब्दांत कदम यांनी शेट्टींचा समाचार घेतला. लागलीच शेट्टी उठले आणि तरातरा लिफ्टकडे निघाले. त्यांच्यापाठोपाठ विनोद तावडे व आशिष शेलार धावत गेले. त्यांनी त्यांना विनंती करून हाताला धरून परत आणले. लोकसभा निवडणुकीत मित्रपक्षांना तुम्ही चार जागा दिल्या. त्या तर्कशास्त्रानुसार प्रत्येक लोकसभा मतदारसंघातील सहा यानुसार किमान २४ विधानसभा मतदारसंघ सोडण्याची मागणी बैठकीत केली गेली. रिपाइंचे रामदास आठवले हे भोजनाला न थांबताच निघून गेले.