शहरं
Join us  
Trending Stories
1
बापरे! इराणमधील ४०० किलो युरेनियम गायब; अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी वेन्सनी अखेर मान्य केले
2
भारतासोबतचा पंगा तुर्कस्तानच्या अंगलट आला! एक महिन्यात कोट्यवधीच नुकसान झालं
3
काऊंटडाऊन सुरू! शुभांशू शुक्लांसह अंतराळवीर स्पेसक्राफ्टमध्ये बसले, ४१ वर्षांनी दुसरा भारतीय...
4
Malegaon Factory Election Result: पहिल्या फेरीअखेर अजित पवार गटाचे १७, तावरे गटाचे चार उमेदवार आघाडीवर
5
ऑपरेशन सिंदूरनंतर भारत आणि पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री पहिल्यांदाच येणार आमने-सामने, भेट होणार? समोर येतेय अशी माहिती  
6
नेहा त्याला भाऊ मानायची, पण तौफीकला लग्न करायचं होते, त्यामुळे त्याने...; कुटुंबाचा दावा
7
मुंबईमध्ये नऊ कोटींचे सोने जप्त, सोने वितळवणाऱ्या ७ जणांना अटक, असे करायचे काम
8
ओसाड वाळवंट असलेला कतार कसा झाला श्रीमंत देश! ५० वर्षांपूर्वीची 'ती' घटना, जिने बदलून टाकलं सारं चित्र!
9
Guru Purnima 2025: प्रत्येकाने आयुष्यात गुरु का केले पाहिजे? त्यांचे आपल्या आयुष्यातील स्थान जाणून घ्या!
10
Jasprit Bumrah, IND vs ENG: जसप्रीत बुमराह कुठले सामने खेळणार? कर्णधार शुबमन गिलने लगेचच दिलं उत्तर, म्हणाला- "मोठा ब्रेक..."
11
सोलापूरात विमान लँड होताच समोर आला कुत्रा; पायलटची उडाली भंबेरी, सुरक्षा रक्षकही धास्तावले
12
PF Withdrawal : ना फॉर्मची चिंता ना कुठे जाण्याचं टेन्शन; EPF खात्यातून UPI द्वारे काढू शकता पैसे, आली मोठी अपडेट
13
ओरिजनल काय आहे का? सुबोध भावे-तेजश्रीच्या मालिकेचा प्रोमो पाहून प्रेक्षक नाराज
14
Mumbai Rain Updates: मुंबईत पावसाची नाइट शिफ्ट; दिवसा ब्रेक; भांडुपमध्ये भिंत कोसळली
15
"मी पहिल्याच रात्री त्याला स्पर्श करू दिला असता, पण..."; सिताराचा दावा, पतीवर गंभीर आरोप
16
आषाढारंभ:आषाढापासून ४ महिने आध्यात्मिक वातावरण आणि सण, उत्सव, व्रत, वैकल्याची रेलचेल!
17
इराणच्या अणुकेंद्रांवरील हल्ला निष्फळ, अमेरिकेचा गोपनीय अहवाल फुटल्याने खळबळ, ट्रम्प म्हणाले... 
18
आणीबाणीला आज ५० वर्षे पूर्ण, पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल!
19
भारताचा चीनवर पलटवार, दिला झटका; ६ उत्पादनांवर लावलं अँटी डम्पिंग शुल्क, का घेतला निर्णय?
20
अभिनंदन यांना पकडणारा पाकिस्तानी ऑफिसर ठार; कोणी केली पाक जवानाची हत्या?

कृषी विभागाचा कारभार ‘राम भरोसे’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2016 06:06 IST

शेतकऱ्यांसाठी कार्यरत असणाऱ्या कृषी विभागात मात्र अधिकारी आणि कर्मचारीची वाणवा आहे.

अतुल कुलकर्णी,

मुंबई- कधी कोरडा तर कधी ओला दुष्काळ, गारपीट, अतिवृष्टी अशा नैसर्गिक दृष्टचक्रात अडकलेले शेतकरी, आत्महत्यांचे न संपणारे सत्र असे चित्र एकीकडे असताना , दुसरीकडे शेतकऱ्यांसाठी कार्यरत असणाऱ्या कृषी विभागात मात्र अधिकारी आणि कर्मचारीची वाणवा आहे. आजमितीला अ, ब, क आणि ड या चार संवर्गातील मिळून तब्बल ७४११ जागा रिक्त आहेत. यातील तब्बल १५०८ जागा पदोन्नती अभावी रिक्त आहेत, तर निवृत झालेले आणि आजारी रजेवर असलेल्या कर्मचाऱ्यांच्या ८ हजाराहून अधिक जागा भरल्या गेलेल्या नाहीत.राज्यात कृषीसंचालकांच्या ५ जागा आहेत, त्यापैकी ४ जागा रिक्त आहेत. कृषी सहसंचालकांच्या १४ पैकी ५ जागा रिक्त आहेत. वरिष्ठ पदावरील खुर्च्या रिकाम्या असल्याने खालून वरपर्यंत येणाऱ्या फाईल किती गतीने हलत असतील, असा प्रश्न उपस्थित होत आहे.गट अ संवर्गातील २८, ब संवर्गातील ७९२ तर गट क संवर्गातील ४९९५ आणि ड संवर्गातील १५९६ जागा रिकाम्या आहेत. या ७४११ पैकी ५९०३ जागा सरळसेवेने भरवयाच्या आहेत. मात्र, त्यासाठी अद्याप भरती प्रक्रियाच सुरू झालेली नाही.शेतीच्या कामासाठी महत्वाची असणारी अधिक्षक, कृषी पर्यवेक्षक, कृषी सहाय्यक, आरेखक, अनुरेखक, माळी अशी महत्वाची पदे देखील शेकडोंनी रिक्त आहेत. सरकारने एखाद्या कृषी योजनेचा आढावा घ्यायचे ठरवले किंवा शेतकऱ्यांपर्यंत नवीन योजना पोहोचविण्याचे ठरवले तरी देखील आज मितीला सरकारकडे पुरेसे कर्मचारी नाहीत. आधूनिक तंत्रज्ञानाचा वापर करुनशेतकऱ्यांना ज्ञान देण्याची कोणतीही योजना आज सरकारजवळ नाही. परिणामी यावर्षी चांगला पाऊस होऊनही शेतकऱ्यांना ‘राम भरोसे’ सोडण्याचा हा प्रकार अत्यंत गंभीर आहे.