शहरं
Join us  
Trending Stories
1
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
2
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
3
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
4
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
5
क्रिकेटच्या देवाकडून जेमी-हरमनप्रीतला शाब्बासकी! ऐतिहासिक विजय युवी, एबी आणि गंभीरलाही भावला
6
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
7
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
8
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
9
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
10
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
11
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
12
Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा
13
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
14
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
15
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
16
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
17
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
18
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
19
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
20
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा

बहीण-भावाच्या नात्यांमधील दृढ ‘विश्वासा’ची राखी

By admin | Updated: August 3, 2016 03:16 IST

रक्षाबंधनानिमित्त विविध प्रकारच्या राख्या बाजारात येत असताना विशेष मुलांनी तयार केलेल्या क्वीलिंगच्या राख्यांना यंदा जबरदस्त मागणी आहे.

ठाणे : रक्षाबंधनानिमित्त विविध प्रकारच्या राख्या बाजारात येत असताना विशेष मुलांनी तयार केलेल्या क्वीलिंगच्या राख्यांना यंदा जबरदस्त मागणी आहे. जिद्द, अंगी असलेले कलागुण, नवनिर्मितीची आवड या गुणांच्या जोरावर ही मुले आकर्षक राख्या बनवित असून यंदाही त्यांच्या राख्यांना तुफान प्रतिसादाची अपेक्षा आहे. यंदा क्वीलिंगच्या राख्या बनवतांना आम्हाला जास्त मज्जा वाटते आहे, असे मुलांनी सांगितले. गेल्या २० वर्षांपासून ‘विश्वास’ संस्थेतील विशेष मुले रक्षाबंधनाकरिता राख्या बनवत आहेत. आजतागायत ही कला या संस्थेने जोपासली आहे. राख्या वेळेत पूर्ण व्हाव्यात यासाठी एक महिन्याआधीच त्या बनवण्यास सुरूवात केली. अगोदर या विशेष मुलांना राखी कशी बनवायची याचे प्रशिक्षण दिले गेले. एकदा त्यांना समजले की, मग ते स्वत:हून उत्तमोत्तम राख्या बनवतात. मुख्याधापिका मीना क्षीरसागर या नेहमीच राख्यांमध्ये नवनवीन प्रयोग करुन त्यांच्याकडून वेगवेगळ्या आकारांच्या, प्रकारांच्या राख्या बनवून घेत असतात. यंदा त्यांनी या मुलांना क्वीलिंगच्या आगळ््या राख्या बनवण्यास शिकवल्या आहेत. गोंडा राखी, मण्यांची राखी याप्रमाणेच क्वीलिंगच्या राख्या बनवण्यात मुले गुंतली आहेत. क्वीलिंगच्या राख्या बनवण्यात ही मुले इतकी मग्न झाली आहेत की, राखी बनवून पूर्ण होईपर्यंत त्यांचे चित्त विचलित होत नाही. राखी बनवल्यावर ती न्याहाळताना आपल्या हातून इतकी सुंदर कलाकृती घडली, याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर पहायला मिळतो. (प्रतिनिधी)>दीड हजार राख्या तयारक्वीलिंगच्या राख्यांमध्ये फुलांच्या डिझाईन्स तयार करुन त्या आकर्षक दिसाव्यात म्हणून मणी, मोतींचा वापर सजावटीकरिता केला जातो. आतापर्यंत दीड हजार राख्या बनवून तयार झाल्या असून त्यापैकी एक हजार राख्यांची विक्री देखील झाली असल्याचे मुख्याध्यापिका क्षीरसागर यांनी सांगितले. क्वीलिंग राख्यांमध्ये कलर कॉम्बिनेशनला खूप महत्त्व असल्याने या राख्या बनवण्यात मुले रमतात, असेही त्या म्हणाल्या. पेपरच्या पट्टया, क्वीलिंगची सुई याचा वापर करुन ही राखी तयार केली जाते. मुलांना सहज, सोप्या पद्धतीने काय वेगळे शिकविता येईल याचा विचार आम्ही सतत करीत असतो आणि नवनवीन प्रयोग अमलात आणतो, असेही क्षीरसागर यांनी सांगितले. या मुलांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी संस्था विविध उपक्रम राबवते. त्यापैकी दरवर्षी राख्या बनविण्याचा कार्यक्रम हा आहे. मुलांच्या कलागुणांना वाव देणे हा हेतू यातून साध्य होतो. यावर्षी तीन हजार राख्या बनविण्याचे लक्ष्य आहे. - अरविंद सुळे, संस्थापक, विश्वास गतिमंद मुलांचे केंद्र