शहरं
Join us  
Trending Stories
1
BEST Election Results 2025: उद्धवसेना-मनसे युतीचा २१-० ने पराभव; राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया आली
2
राज ठाकरे शिवतीर्थावर परतताच CM देवेंद्र फडणवीसांनी केला उद्धव ठाकरेंना फोन; नेमके कारण काय?
3
रामललांच्या भक्तांना दिवाळीपूर्वीच मिळणार खास गिफ्ट! राम मंदिर ट्रस्ट देणार विशेष भेट, जाणून घ्या सविस्तर
4
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! १ ऑक्टोबरपासून 'हे' महत्त्वाचे फीचर कायमस्वरूपी बंद होणार
5
हा पी अर्जुन तेंडुलकर कोण? तुफानी खेळीत १२ चेंडूत ३ चौकार, ३ षटकार ठोकले; मुंबई इंडियन्सच्या नजरेत भरला?...
6
रोज इथे माणसं आदळत आहेत, झोपड्या वाढताहेत, 'अर्बन नक्षल'पेक्षा...; राज ठाकरेंचं 'मिशन मुंबई'
7
विद्यार्थ्याच्या हत्येवरून अहमदाबाद तापले, रस्त्यावर उतरले हजारो लोक, पोलीस आणि NSUI मध्ये वादावादी
8
छत गळतेय, उंदीर फिरतात आणि वीज नसते; इमरान खान यांच्या पत्नी बुशरा बीबींची तुरुंगात दयनीय अवस्था
9
Viral Video: लोणावळ्यात मद्यधुंद महिलांमध्ये फ्री-स्टाईलमध्ये हाणामारी; पोलीस आल्यानंतरही थांबल्या नाहीत!
10
Ajinkya Rahane : हीच ती वेळ! सोशल मीडियावरुन पोस्ट शेअर करत अजिंक्य रहाणेनं खांद्यावरील ओझे केले हलके; म्हणाला...
11
इस्रायल-हमास युद्धावरून मायक्रोसॉफ्टच्या मुख्यालयात जोरदार राडा; कंपनीवर गंभीर आरोप
12
आशिया कपसाठी श्रेयस अय्यर संघात का नाही? या चर्चेत BCCI नं पुडी सोडली, की खरंच तो कॅप्टन होणार?
13
"राष्ट्रीय पुरस्कार उचलण्यासाठी माझा एकच हात...", शाहरुख खानचा अफलातून सेन्स ऑफ ह्युमर
14
बेस्ट निवडणूक २०२५: पहिल्यांदाच युती अन् ठाकरे बंधूंचा दारुण पराभव; ‘ही’ आहेत ५ मोठी कारणे
15
शाळेच्या गेटजवळ स्फोटके आढळली; १० वर्षाच्या विद्यार्थ्याने उचलून फेकलं आणि...
16
'हे अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात मूर्खपणाचं पाऊल..,' ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ म्हणाले, "ट्रम्प टॅरिफनेच ब्रिक्सला विजय मिळवून दिला.."
17
"आम्हाला त्रास झालाय का? आम्हाला माहीत आहे, काय आहे ते?"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय राऊत स्पष्टच बोलले
18
पाकिस्तान अनेक हवाई मार्ग करत आहे बंद! नेमकं कारण तरी काय?मोठे नियोजन सुरू असल्याची शक्यता
19
“ठाकरे ब्रँड कोमात, स्वदेशी देवाभाऊ जोमात”; बेस्ट निवडणूक निकालावर शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
20
बांगलादेशला पुन्हा पूर्व पाकिस्तान करण्याचा मुनीरचा डाव, ट्रम्प यांना दाखवली अशी लालूच, भारतासाठी धोका वाढला

बहीण-भावाच्या नात्यांमधील दृढ ‘विश्वासा’ची राखी

By admin | Updated: August 3, 2016 03:16 IST

रक्षाबंधनानिमित्त विविध प्रकारच्या राख्या बाजारात येत असताना विशेष मुलांनी तयार केलेल्या क्वीलिंगच्या राख्यांना यंदा जबरदस्त मागणी आहे.

ठाणे : रक्षाबंधनानिमित्त विविध प्रकारच्या राख्या बाजारात येत असताना विशेष मुलांनी तयार केलेल्या क्वीलिंगच्या राख्यांना यंदा जबरदस्त मागणी आहे. जिद्द, अंगी असलेले कलागुण, नवनिर्मितीची आवड या गुणांच्या जोरावर ही मुले आकर्षक राख्या बनवित असून यंदाही त्यांच्या राख्यांना तुफान प्रतिसादाची अपेक्षा आहे. यंदा क्वीलिंगच्या राख्या बनवतांना आम्हाला जास्त मज्जा वाटते आहे, असे मुलांनी सांगितले. गेल्या २० वर्षांपासून ‘विश्वास’ संस्थेतील विशेष मुले रक्षाबंधनाकरिता राख्या बनवत आहेत. आजतागायत ही कला या संस्थेने जोपासली आहे. राख्या वेळेत पूर्ण व्हाव्यात यासाठी एक महिन्याआधीच त्या बनवण्यास सुरूवात केली. अगोदर या विशेष मुलांना राखी कशी बनवायची याचे प्रशिक्षण दिले गेले. एकदा त्यांना समजले की, मग ते स्वत:हून उत्तमोत्तम राख्या बनवतात. मुख्याधापिका मीना क्षीरसागर या नेहमीच राख्यांमध्ये नवनवीन प्रयोग करुन त्यांच्याकडून वेगवेगळ्या आकारांच्या, प्रकारांच्या राख्या बनवून घेत असतात. यंदा त्यांनी या मुलांना क्वीलिंगच्या आगळ््या राख्या बनवण्यास शिकवल्या आहेत. गोंडा राखी, मण्यांची राखी याप्रमाणेच क्वीलिंगच्या राख्या बनवण्यात मुले गुंतली आहेत. क्वीलिंगच्या राख्या बनवण्यात ही मुले इतकी मग्न झाली आहेत की, राखी बनवून पूर्ण होईपर्यंत त्यांचे चित्त विचलित होत नाही. राखी बनवल्यावर ती न्याहाळताना आपल्या हातून इतकी सुंदर कलाकृती घडली, याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर पहायला मिळतो. (प्रतिनिधी)>दीड हजार राख्या तयारक्वीलिंगच्या राख्यांमध्ये फुलांच्या डिझाईन्स तयार करुन त्या आकर्षक दिसाव्यात म्हणून मणी, मोतींचा वापर सजावटीकरिता केला जातो. आतापर्यंत दीड हजार राख्या बनवून तयार झाल्या असून त्यापैकी एक हजार राख्यांची विक्री देखील झाली असल्याचे मुख्याध्यापिका क्षीरसागर यांनी सांगितले. क्वीलिंग राख्यांमध्ये कलर कॉम्बिनेशनला खूप महत्त्व असल्याने या राख्या बनवण्यात मुले रमतात, असेही त्या म्हणाल्या. पेपरच्या पट्टया, क्वीलिंगची सुई याचा वापर करुन ही राखी तयार केली जाते. मुलांना सहज, सोप्या पद्धतीने काय वेगळे शिकविता येईल याचा विचार आम्ही सतत करीत असतो आणि नवनवीन प्रयोग अमलात आणतो, असेही क्षीरसागर यांनी सांगितले. या मुलांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी संस्था विविध उपक्रम राबवते. त्यापैकी दरवर्षी राख्या बनविण्याचा कार्यक्रम हा आहे. मुलांच्या कलागुणांना वाव देणे हा हेतू यातून साध्य होतो. यावर्षी तीन हजार राख्या बनविण्याचे लक्ष्य आहे. - अरविंद सुळे, संस्थापक, विश्वास गतिमंद मुलांचे केंद्र