शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

राज्यराणीला ठाण्यात थांबा

By admin | Updated: February 17, 2016 03:01 IST

कामानिमित्त मुंबईत येणाऱ्या आणि पुन्हा परतणाऱ्या नाशिककरांची गैरसोय टाळण्यासाठी एलटीटी-मनमाड राज्यराणी एक्स्प्रेस सीएसटीपर्यंत चालविण्यात आली.

मुंबई : कामानिमित्त मुंबईत येणाऱ्या आणि पुन्हा परतणाऱ्या नाशिककरांची गैरसोय टाळण्यासाठी एलटीटी-मनमाड राज्यराणी एक्स्प्रेस सीएसटीपर्यंत चालविण्यात आली. मात्र, ही ट्रेन सीएसटीपर्यंत सुरू करतानाच, ठाणे स्थानकातील थांबा काढण्यात आला होता. त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत असल्याने, ठाणे स्थानकात थांबा देण्याची मागणी केली जात होती. या मागणीनुसार, १७ फेब्रुवारीपासून ठाणे स्थानकात राज्यराणीला थांबा देण्याचा निर्णय घेतल्याचे मध्य रेल्वेकडून सांगण्यात आले. मुंबईत येणाऱ्या नाशिककरांसाठी मनमाड-राज्यराणी एक्स्प्रेस सुरू करण्यात आली. मात्र, एलटीटीपर्यंत धावत असलेल्या या ट्रेनमुळे प्रवाशांना सीएसटीपर्यंत येण्यासाठी कुर्ला स्थानकातून लोकल पकडावी लागत होती. गैरसोय होत असल्याने, राज्यराणी एक्स्प्रेस सीएसटीपर्यंत चालविण्याची मागणी नाशिककरांकडून होऊ लागली आणि त्याची दखल घेत, १२ आॅक्टोबर २0१५ पासून त्याची अंमलबजावणी मध्य रेल्वेकडून करण्यात आली. मात्र, सीएसटीपर्यंत एक्स्प्रेस चालविताना या पूर्वी असलेला ठाणे स्थानकातील थांबा काढून टाकण्यात आला आणि सीएसटीपासून ते कल्याणपर्यंत एक्स्प्रेस चालविण्यात आली. राज्यराणी एक्स्प्रेस पकडणाऱ्यांना कल्याणपर्यंत जावे लागत असल्याने, पुन्हा ठाणे स्थानकात थांबा देण्याची मागणी होऊ लागली आणि ही मागणी लक्षात घेऊन, त्याबाबतचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला. अखेर त्याला मंजुरी मिळाल्यानंतर, १७ फेब्रुवारीपासून ठाणे स्थानकात राज्यराणीला एक मिनिटासाठी थांबा देण्यात येत असल्याचे, मध्य रेल्वेकडून स्पष्ट करण्यात आले. हा थांबा ३१ मार्चपर्यंत देण्यात येईल. (प्रतिनिधी)