शहरं
Join us  
Trending Stories
1
जळगाव जिल्ह्यात ढगफुटी? गावांमध्ये शिरले पुराचे पाणी; लोकांनी रात्र काढली जागून, शाळांना सुट्टी
2
गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी! सेन्सेक्सला मागे टाकत सोन्याने दिला तब्बल ५०.१ टक्के परतावा
3
"आम्ही इन्कम टॅक्सकडून आलोय…’’, सांगलीत वॉरंट दाखवत डॉक्टरच्या घरातील कोट्यवधीचा ऐवज लुटला 
4
Post Office च्या ५ जबरदस्त स्कीम्स; छोट्या बचतीत मोठा फायदा, यापैकी दोन महिलांसाठी खास
5
Nashik: नाशिकमधील एका खाजगी शाळेला बॉम्बने उडवण्याची धमकी!
6
पश्चात्ताप! निळ्या रंगाच्या 'ड्रम'कांडमुळे जेलमध्ये गेलेल्या आरोपी साहिलच्या आयुष्याला नवी कलाटणी
7
सर्वोच्च न्यायालयातील वकील सिद्धार्थ शिंदे यांचे ह्रदयविकाराने निधन, दिल्लीत घेतला अखेरचा श्वास
8
अल्पवयीन मुलीसोबत भाजपा नेत्याचा अश्लील व्हिडिओ व्हायरल; टीका होताच पक्षानं केली हकालपट्टी
9
Uttarakhand Cloudburst: डेहराडूनमध्ये ढगफुटी! दुकाने वाहून गेली, अनेक लोक बेपत्ता, बचावकार्य सुरू
10
महात्मा फुले योजनेत अवयव प्रत्यारोपणासह आता २,३९९ व्याधींवर होणार उपचार
11
"...त्यांची जीभ इतरांना जाब विचारताना अडखळत कशी नाही?"; भाजपाची शरद पवारांवर बोचरी टीका
12
ITR: इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची आज अखेरची संधी! आयकर विभागाने एका दिवसाने मुदत वाढवली
13
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
14
आजचे राशीभविष्य- १६ सप्टेंबर २०२५: मित्रांचा सहवास लाभेल, पण घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
15
पोलिस ठाण्यांत सीसीटीव्ही का नाहीत?, ही बेफिकिरीच; सर्वोच्च न्यायालय २६ सप्टेंबर रोजी आदेश देणार
16
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
17
'पूरग्रस्तांना प्रत्येकाने शक्य ती सर्व मदत करावी', राहुल गांधींच्या सूचना, प्रत्यक्ष गेले बांधावर
18
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
19
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
20
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला

राजवर्धन यांच्या राजकीय प्रवेशाला तूर्त ‘रेड सिग्नल’

By admin | Updated: August 3, 2015 00:08 IST

जयंतरावांचे संकेत : शिक्षण अगोदर, नंतर राजकारण..! शैक्षणिक गुणवत्तेवर प्रशंसेची मोहोर

अशोक पाटील -इस्लामपूर राजकारण म्हणजे समाजसेवा, हे समीकरण राहिलेले नाही. राजकारण हा व्यवसाय झाला आहे. राजकारणाला गुणवत्ता लागत नाही. सध्या राजकारणाला चांगले दिवस नाहीत. राजवर्धनची शैक्षणिक गुणवत्ता चांगली आहे. तो लंडनमधील एका नामांकित संस्थेत शिक्षण घेणार आहे. त्याला राजकारणात आणण्याचा सध्या तरी विचार नाही, असे मत माजी मंत्री, आमदार जयंत पाटील यांनी इस्लामपूर शहरातील एका कार्यक्रमात व्यक्त केले.लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या निधनानंतर त्यांचा राजकीय वारसा चालविण्यासाठी उरुण परिसरातील काही ज्येष्ठ नेत्यांनी पुढाकार घेऊन शिक्षणासाठी परदेशात निघालेल्या जयंत पाटील यांना राजकारणात आणले. त्यावेळी त्यांना तालुक्यातील काही नेत्यांनी विरोधही केला होता. वाळवा तालुक्यातील काही ज्येष्ठ नेत्यांनी आमदार जयंत पाटील यांचे चिरंजीव राजवर्धन पाटील यांना राजकीय वारसदार म्हणून पुढे आणण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. परंतु याला स्वत: जयंत पाटील यांच्याकडूनच नकार आहे. परंतु जयंत पाटील यांच्या नकारात होकार असतो, हे त्यांच्या समर्थकांना चांगलेच माहीत आहे. त्यामुळे आगामी काळात काय घडामोडी होतात, याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे.सध्या सांगली जिल्ह्यात जयंत पाटील यांची राजकीय ताकद वाढत आहे. त्यांचे थोरले बंधू भगतसिंह पाटील मुंबई येथे उद्योग क्षेत्रात आहेत. जयंतरावांचे राजकीय वारसदार म्हणून सध्या तरी कोणी नाही. त्यांच्याच घरातील जि. प.चे माजी अध्यक्ष देवराज पाटील यांना जयंतरावांनी राजकारणात विविध पदांवर संधी दिली आहे. परंतु देवराज यांचा जिल्हा पातळीवर पाहिजे तेवढा प्रभाव दिसला नाही, तर कासेगाव जि. प. मतदारसंघात काही गावातून त्यांना विरोध होत असल्याचे दिसते.जयंतरावांंनी राजारामबापू उद्योग समूहासह काही क्षेत्रात पै-पाहुण्यांना संधी देण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचबरोबर जिल्हा बँकेचे अध्यक्षपद दिलीपतात्या पाटील यांना दिले. राज्य सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष माणिकराव पाटील यांना राज्य पातळीवरील संस्थेवर वर्णी लावण्यासाठी जयंत पाटील यांचेच मोठे योगदान आहे. हे दोन्ही नेते ज्येष्ठ असल्याने ते जयंतरावांचे राजकीय वारसदार होऊ शकले नाहीत.वसंतदादा पाटील, राजारामबापू पाटील, आर. आर. पाटील, माजी मंत्री पतंगराव कदम, माजी मंत्री मदन पाटील आणि जयंत पाटील यांच्यामध्ये राजकीय वर्चस्वासाठी यापूर्वी झालेले अंतर्गत मतभेद राज्यातील राजकारणात नेहमीच चर्चेचा विषय ठरत आले आहेत. त्याचबरोबर या नेत्यांच्या राजकीय वारसदारांचीही चर्चा राजकीय वर्तुळात नेहमीच रंगत असते. वसंतदादा पाटील यांच्या राजकीय वारसांमध्ये मतभेद आहेत. आर. आर. पाटीलही आपला राजकीय वारस तयार करण्यात अयशस्वी ठरले. पतंगराव कदम यांनी विश्वजित कदम यांना आपला राजकीय वारस म्हणून पुढे आणले आहे. आता जयंतरावांच्या वारसदाराची चर्चा सुरू झाली आहे. कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकतेचा विषय...जयंत पाटील यांचा राजकीय प्रवेश म्हणजे अचानक घडलेली घटना म्हणावी लागेल. अद्याप त्यांचे पुत्र राजकारणात सक्रिय झाले नसले तरी, त्यांच्या राजकीय प्रवेशाचा विषय कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकतेचा बनला आहे.