शहरं
Join us  
Trending Stories
1
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली
2
अदानींचा मोठा निर्णय; एका आठवड्यापूर्वी केलेला ड्रॅगनपास करार केला रद्द, चिनी कंपनीला दणका
3
अफगाणिस्तानने नोंदवला पहलगाम हल्ल्याचा निषेध; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा
4
IPL 2025: लखनौच्या अडचणीत वाढ, दुखापतीमुळं मयांक यादव आयपीएलमधून बाहेर!
5
Shiv Sena: पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील संशयितांची माहिती देणाऱ्याला १० लाख रुपयांचे बक्षीस
6
भारताचा तुर्कीला दणका, विमानतळांवर सेवा देणाऱ्या सेलेबी कंपनीची सुरक्षा मंजुरी केली रद्द!
7
बिहार दौऱ्यात राहुल गांधी यांच्याविरोधात दोन गुन्हे दाखल, पोलिसांनी शंभराहून अधिक जणांना केलं आरोपी
8
India Pakistan Ceasefire: "भारत-पाकिस्तान यांच्यात १८ मेपर्यंत शस्त्रसंधी"; पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री डार यांचे विधान
9
आधी ट्रम्प यांच्यावर भडकली, नंतर पोस्ट डिलीट; कंगना म्हणाली, "जेपी नड्डांनी डिलीट करायला सांगितली"
10
ED Raid: 23 कोटींचं सोनं, 8 कोटी रोख; वसई विरार मनपाचे नगररचना उपसंचालक रेड्डीकडे सापडली कोट्यवधींची माया
11
Donald Trump : "मी असं म्हणत नाही की..."; भारत-पाकिस्तान युद्धविरामावर मोठे दावे करणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांची पलटी
12
सुटी रद्द झाल्याने कामावर परतणाऱ्या मेजरवर काळाचा घाला; डोळ्यादेखत पत्नीचा मृत्यू, लेक गंभीर जखमी
13
'पाकिस्तानशी फक्त दहशतवाद अन् PoK वर चर्चा होईल; तिसऱ्याचा हस्तक्षेप खपवून घेणार नाही'
14
'गदर'मधला दरम्यान सिंग आठवतोय का? एका आजारामुळे झालं होत्याचं नव्हतं, अभिनेत्याचा झाला दुर्देवी शेवट
15
व्यापाऱ्यांनी कोणाच्या धमकीला भीक घालू नये; आम्ही तुमच्या पाठीशी आहोत - देवेंद्र फडणवीस
16
इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; 'लेडी सेहवाग'ला मिळाली कमबॅकची संधी
17
अटक करण्याची धमकी देत मागितली खंडणी: उल्हासनगर पोलीस ठाण्यातील दोन पोलीस निलंबित
18
Crime: निवृत्त न्यायाधीशाच्या दोन मुले आणि सुनेला जन्मठेपेची शिक्षा; 2007 मधील प्रकरण काय?
19
Motivational Story: वडिलांचं सायकल दुरूस्तीचं दुकान, कष्टाची जाणीव ठेवून मुलानं दहावीत मिळवले घवघवीत यश
20
आश्चर्यकारक! आरोपीने बलात्कार पिडितेला भरकोर्टात केलं 'प्रपोज'; सर्वोच्च न्यायालयातील प्रसंग

राजवर्धन यांच्या राजकीय प्रवेशाला तूर्त ‘रेड सिग्नल’

By admin | Updated: August 3, 2015 00:08 IST

जयंतरावांचे संकेत : शिक्षण अगोदर, नंतर राजकारण..! शैक्षणिक गुणवत्तेवर प्रशंसेची मोहोर

अशोक पाटील -इस्लामपूर राजकारण म्हणजे समाजसेवा, हे समीकरण राहिलेले नाही. राजकारण हा व्यवसाय झाला आहे. राजकारणाला गुणवत्ता लागत नाही. सध्या राजकारणाला चांगले दिवस नाहीत. राजवर्धनची शैक्षणिक गुणवत्ता चांगली आहे. तो लंडनमधील एका नामांकित संस्थेत शिक्षण घेणार आहे. त्याला राजकारणात आणण्याचा सध्या तरी विचार नाही, असे मत माजी मंत्री, आमदार जयंत पाटील यांनी इस्लामपूर शहरातील एका कार्यक्रमात व्यक्त केले.लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या निधनानंतर त्यांचा राजकीय वारसा चालविण्यासाठी उरुण परिसरातील काही ज्येष्ठ नेत्यांनी पुढाकार घेऊन शिक्षणासाठी परदेशात निघालेल्या जयंत पाटील यांना राजकारणात आणले. त्यावेळी त्यांना तालुक्यातील काही नेत्यांनी विरोधही केला होता. वाळवा तालुक्यातील काही ज्येष्ठ नेत्यांनी आमदार जयंत पाटील यांचे चिरंजीव राजवर्धन पाटील यांना राजकीय वारसदार म्हणून पुढे आणण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. परंतु याला स्वत: जयंत पाटील यांच्याकडूनच नकार आहे. परंतु जयंत पाटील यांच्या नकारात होकार असतो, हे त्यांच्या समर्थकांना चांगलेच माहीत आहे. त्यामुळे आगामी काळात काय घडामोडी होतात, याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे.सध्या सांगली जिल्ह्यात जयंत पाटील यांची राजकीय ताकद वाढत आहे. त्यांचे थोरले बंधू भगतसिंह पाटील मुंबई येथे उद्योग क्षेत्रात आहेत. जयंतरावांचे राजकीय वारसदार म्हणून सध्या तरी कोणी नाही. त्यांच्याच घरातील जि. प.चे माजी अध्यक्ष देवराज पाटील यांना जयंतरावांनी राजकारणात विविध पदांवर संधी दिली आहे. परंतु देवराज यांचा जिल्हा पातळीवर पाहिजे तेवढा प्रभाव दिसला नाही, तर कासेगाव जि. प. मतदारसंघात काही गावातून त्यांना विरोध होत असल्याचे दिसते.जयंतरावांंनी राजारामबापू उद्योग समूहासह काही क्षेत्रात पै-पाहुण्यांना संधी देण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचबरोबर जिल्हा बँकेचे अध्यक्षपद दिलीपतात्या पाटील यांना दिले. राज्य सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष माणिकराव पाटील यांना राज्य पातळीवरील संस्थेवर वर्णी लावण्यासाठी जयंत पाटील यांचेच मोठे योगदान आहे. हे दोन्ही नेते ज्येष्ठ असल्याने ते जयंतरावांचे राजकीय वारसदार होऊ शकले नाहीत.वसंतदादा पाटील, राजारामबापू पाटील, आर. आर. पाटील, माजी मंत्री पतंगराव कदम, माजी मंत्री मदन पाटील आणि जयंत पाटील यांच्यामध्ये राजकीय वर्चस्वासाठी यापूर्वी झालेले अंतर्गत मतभेद राज्यातील राजकारणात नेहमीच चर्चेचा विषय ठरत आले आहेत. त्याचबरोबर या नेत्यांच्या राजकीय वारसदारांचीही चर्चा राजकीय वर्तुळात नेहमीच रंगत असते. वसंतदादा पाटील यांच्या राजकीय वारसांमध्ये मतभेद आहेत. आर. आर. पाटीलही आपला राजकीय वारस तयार करण्यात अयशस्वी ठरले. पतंगराव कदम यांनी विश्वजित कदम यांना आपला राजकीय वारस म्हणून पुढे आणले आहे. आता जयंतरावांच्या वारसदाराची चर्चा सुरू झाली आहे. कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकतेचा विषय...जयंत पाटील यांचा राजकीय प्रवेश म्हणजे अचानक घडलेली घटना म्हणावी लागेल. अद्याप त्यांचे पुत्र राजकारणात सक्रिय झाले नसले तरी, त्यांच्या राजकीय प्रवेशाचा विषय कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकतेचा बनला आहे.