शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
2
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
3
"वडिलांच्या नवीन मर्सिडीजवर विपिनची नजर, ६० लाखांची मागणी", निक्कीच्या भावाने मांडली व्यथा
4
बायकोला जिवंत जाळल्याचा आरोप असलेल्या पतीची पहिली प्रतिक्रिया, पत्नीच्या हत्येमागील कारण काय सांगितले?
5
पहिल्यांदाच मिझोरममध्ये पोहोचली रेल्वे; १४२ पूल अन् ४८ बोगद्यांद्वारे तयार झाला मार्ग...
6
निवृत्तीनंतर चेतेश्वर पुजाराला BCCI किती पेन्शन देणार? निवृत्त वेतनासाठी कोणतं सूत्र वापरतात?
7
खुशखबर...! पुढच्याच महिन्यात मारुती नवी धाकड SUV आणणार; क्रेटा, सेल्टोसला थेट टक्कर देणार, किंमतही असणार या सर्वांपेक्षा कमी!
8
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही रशियाचे युक्रेनवरील हल्ले सुरूच, दोन गावांवरही कब्जा!
9
नेतन्याहू यांचा 'कंट्रोल गाझा' प्लॅन सुरू! इस्रायली हल्ल्यात ६३ जणांचा मृत्यू; पुढे काय होणार?
10
गर्भवती पत्नीची निर्घृण हत्या, मृतदेहाचे तुकडे करून पतीने लपवले; धक्कादायक घटनेने परिसर हादरला!
11
"रोज म्हणतात व्होट चोरी... व्होट चोरी..., यांचं डोकं चोरी झालंय!" देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांवर हल्लाबोल; स्पष्टच बोलले
12
३० वर्षीय पत्नीने प्रियकरासोबत रचला कट, ६० वर्षीय पतीला जंगलात नेऊन आवळला गळा
13
घसा खूपच खवखवतोय अन् खोकलाही जाता जाईना... 'या' ६ गोष्टी आहेत रामबाण उपाय
14
'कर्नाटक-महाराष्ट्रात मतचोरी; बिहारमध्ये होऊ देणार नाही', राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर निशाणा
15
५,००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल लखपती? जाणून घ्या १५ वर्षांत किती परतावा मिळेल
16
"मर्यादेत राहा...!"; आशिया कपमध्ये भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी वसीम अक्रमचा इशारा, नेमकं काय म्हणाला?
17
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी ६८ अर्ज; अनेक खासदारांच्या बनावट स्वाक्षरी केल्याचे उघड
18
सोहम बांदेकरसोबत लग्नाच्या चर्चांनंतर अभिनेत्री पूजाने पहिल्यांदाच शेअर केली स्टोरी, म्हणाली...
19
८व्या वेतन आयोगात बँक कर्मचाऱ्यांचे पगारही वाढतील का? कधी होणार लागू? मोठी अपडेट समोर
20
Sara Ali Khan : जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन! सारा अली खानने फक्त 'या' २ गोष्टी सोडून कमी केलं ४५ किलो वजन

राजुरी स्टीलला २५ वर्षे पूर्ण

By admin | Updated: April 27, 2016 05:10 IST

स्टील उत्पादन करणाऱ्या कंपन्या पिळदार सळईचे उत्पादन करीत असत.

जालना : स्टील उत्पादन करणाऱ्या कंपन्या पिळदार सळईचे उत्पादन करीत असत. मात्र, त्याचा दर्जा चांगला नसल्याने त्याचे आयुष्य जास्त नव्हते. काही कंपन्यांनी टीएमटी सळई उत्पादनासाठी अद्ययावत तंत्रज्ञान आणले. मात्र, त्याचे दर सामान्यांच्या आवाक्याबाहेर होते. या कंपन्यांची मक्तेदारी मोडीत काढत १९९१ मध्ये स्थापन झालेल्या राजुरी स्टीलने २००३ मध्ये जर्मन तंत्रज्ञानावर आधारित दर्जेदार व गुणवत्तापूर्ण टीएमटी सळईचे उत्पादन करुन बांधकाम क्षेत्रात क्रांती घडवून आणली आहे.राजुरी स्टीलने रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण केले असून, स्टील बाजारात गुणात्मक आणि दर्जात्मक उत्पादनामुळे आपला वेगळा ठसा उमटवला आहे. २००३ पर्यंत टीएमटी प्रकारच्या सळई उत्पादनात काही विशिष्ट कंपन्यांची मक्तेदारी होती. तसेच या उत्पादनांचे भाव सामान्यांच्या आवाक्याबाहेर होते. नेमकी हीच बाब हेरुन राजुरी स्टीलने अद्ययावत जर्मन तंत्रज्ञानावर आधारित ५०० टीएमटी सळईचे उत्पादन सुरू केले आणि हीच स्टील बाजारात ‘राजुरी’ने घडवून आणलेली क्रांती होय. यानंतर राज्यासह देशातील अनेक भागात टीएमटी सळईचे दर सामान्यांच्या आवाक्यात आले आहेत. या उत्पादनामुळे बांधकाम क्षेत्राला भरारी येऊन सर्वसामान्यांचे घराचे स्वप्न आकार घेऊ शकले. हेच राजुरीच्या यशाचे गमक आहे. ‘राजुरी’ सळई उत्पादनासह स्पांज आर्यन निर्मिती करीत आहे. त्याचबरोबर कंपनीने अद्ययावत प्रयोगशाळा उभारून नवनवीन तंत्रज्ञानाच्या आधारे अधिकाधिक दर्जेदार सळईचे उत्पादन सुरू केले आहे. ज्यामुळे बांधकाम क्षेत्रात राजुरीने आपल्या गुणवत्तेचा ठसा उमटविला आहे. प्रयोगशाळेमुळे उत्पादनाचे बारकाईने संशोधन करून ते अधिकाधिक चांगले कसे होईल, यासाठी कंपनी व्यवस्थापन कसोशीने प्रयत्न करत आहे. कंपनीने चंद्रपूरमध्येही उत्पादन सुरू केले आहे. याशिवाय उत्पादनाचे प्रात्यक्षिक दाखविण्यासाठी राज्यभर मोबाईल व्हॅनद्वारे जनजागृती व माहिती दिली जात आहे. यात आतापर्यंत जवळपास १५०० मिस्त्री मेळावे, सुमारे २०० अभियंत्यांचे मेळावे घेऊन उत्कृष्ट स्टीलबाबत जनजागृती करण्यात आली. अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरामुळे या उद्योगाला नवी दिशा दिली. प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष असे ५ ते ७ हजार लोकांना रोजगार दिला. सुरुवातीच्या काळात पिळदार सळई केली जात असे. पण राजुरीने जर्मन तंत्रज्ञानाचा वापर करुन ५०० टीएमटीची क्षमता असलेल्या सळईची निर्मिती सुरू केल्याने लोखंडाची बचत होऊन बांधकामाचा दर्जा सुधारला आहे. >सामाजिक कार्यातही अग्रेसर४केवळ व्यवसाय वा उद्योगच न करता सामाजिक बांधिलकीही जपली जावी, या भावनेतून राजुरी स्टीलच्या वतीने सात वर्षापूर्वी स्त्री भ्रूण हत्या विरोधात राज्यभरात पथनाट्य, भित्तीपत्रके, समुदेशन याद्वारे जनजागृती करण्यात आली.या परिणामस्वरूपी आज राज्यातील विविध जिल्ह्यात स्त्री दर जन्मदाराचा वाढल्याचे शासकीय आकडेवारीवरून दिसून येते.