शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
2
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
3
"सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
4
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
5
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
6
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
7
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
8
Mumbai: संपत्तीसाठी मुलाची वृद्ध आईला मारहाण!
9
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
10
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
11
परेश रावल यांच्यासोबतच्या वादावर अक्षय कुमारची प्रतिक्रिया, म्हणाला, "मला खात्री आहे की..."
12
Mumbai: भर पावसात रेनकोटसह कुणी रडत तर कुणी हसत पोहोचले शाळेत!
13
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
14
इस्रायलने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यात किती लोकांचा मृत्यू झाला? दूतावासाने जारी केली धक्कादायक आकडेवारी
15
रिक्षा, दुचाकी कचऱ्यासारख्या वाहून गेल्या; गुजरातमध्ये तुफान पाऊस, व्हिडीओ व्हायरल
16
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
17
चार दिवस कसोटीचे! रुपडं बदलणार; पण टीम इंडियासह हे २ संघ जुनी परंपरा जपणार?
18
Ashadhi Ekadashi 2025: यंदा आषाढी एकादशी आणि चतुर्मासाची सुरुवात कधी ते जाणून घ्या!
19
Mumbai: मुंबईतील दोन आंतरराष्ट्रीय शाळांना बॉम्बची धमकी, तपासात असं समजलं की...
20
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव

राजू शेट्टी यांचा नागपुरात हल्लाबोल

By admin | Updated: March 21, 2017 04:23 IST

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत केलेल्या वक्तव्यावरून स्टेट बँक आॅफ इंडियाच्या चेअरमन अरुंधती भट्टाचार्य यांच्यावर चहूबाजूंनी टीका

नागपूर : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत केलेल्या वक्तव्यावरून स्टेट बँक आॅफ इंडियाच्या चेअरमन अरुंधती भट्टाचार्य यांच्यावर चहूबाजूंनी टीका करण्यात येत आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष व खासदार राजू शेट्टी यांनी भट्टाचार्य यांच्या वक्तव्याचा निषेध करीत नागपुरात त्यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन केले. भट्टाचार्य यांनी शेतकऱ्यांचा अपमान केल्याची भावना त्यांनी या वेळी व्यक्त केली.शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ नये, असे वक्तव्य भट्टाचार्य यांनी केले होते. याच्या निषेधार्थ राजू शेट्टी हे कार्यकर्त्यांसह सकाळी ९च्या सुमारास स्टेट बँकेच्या रेल्वे स्थानकाजवळील मुख्य शाखेसमोर पोहोचले. सुरुवातीला भट्टाचार्य यांच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. त्यानंतर त्यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. या वेळी वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष रविकांत तूपकर उपस्थित होते.आम्ही सरकारमध्ये असलो तरी बाहेरून आंदोलने करून शेतकऱ्यांसाठी कर्जमुक्ती घेतल्याशिवाय राहणार नाही, असे शेट्टी यांनी सांगितले. अनेक बँकांनी कॉर्पोरेट कंपन्यांसोबत डील केले आहे. उद्योजकांच्या कर्जाला माफी मिळते मात्र शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा विषय आला की त्यांचा अपमान करण्यात येतो. हे चालणार नाही. शेतकरी गप्प राहणार नाही. आम्ही कर्जमाफी मिळवूनच राहू व यासाठी पुढील काळात आंदोलन अधिक तीव्र करू, असा इशारा शेट्टी यांनी दिला. (प्रतिनिधी)