शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
2
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
3
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
4
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
5
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
6
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
7
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
8
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
9
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
10
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
11
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
12
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
13
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
14
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
15
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
16
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ
17
"सत्याचा मोर्चा नाही तर ढोंग्यांचा मोर्चा..."; मनसे-मविआच्या मोर्चाला गुणरत्न सदावर्तेंचा विरोध
18
१ नोव्हेंबरपासून 'हे' महत्वाचे नियम बदलणार; बँक खातेधारकांपासून ते सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत, सर्वांवरच परिणाम होणार!
19
मित्राने 'नाईस डीपी' म्हणून मेसेज पाठवला, संतप्त पतीने महिला डॉक्टरच्या डोक्यात खलबत्ता मारला, बदलापूरमधील घटना
20
Bacchu Kadu Morcha: रस्त्यावर उतरत सरकारची कोंडी; बच्चू कडू यांच्या प्रमुख मागण्या कोणत्या?

Maharashtra Politics: “महाविकास आघाडीत जाणं म्हणजे असंगाशी संग करणं”; राजू शेट्टींनी स्पष्टच सांगितलं कुणासोबत जाणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2022 10:28 IST

Maharashtra News: लोकोपयोगी सरकार असल्याची साधी चुणूकही या शंभर दिवसात दाखवलेली नाही, असे सांगत राजू शेट्टी यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

Maharashtra Politics: एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर महाविकास आघाडीचे ठाकरे सरकार कोसळले आणि भाजप-शिंदे गटाच्या युतीचे नवे सरकार स्थापन झाले. महाविकास आघाडी सरकार कोसळण्यापूर्वी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी उघडपणे नाराजी व्यक्त करत टीका केली होती. आता भाजप-शिंदे गट युतीचे नवे सरकार आल्यावर कोणासोबत जाणार, हे राजू शेट्टी यांनी स्पष्टपणे सांगितले. तसेच महाविकास आघाडीत जाणे म्हणजे असंगाशी संग करणे होय, अशी घणाघाती टीकाही राजू शेट्टी यांनी केली. 

राजू शेट्टी नक्की महाविकास आघाडी की युतीचा (Yuti) भाग असणार याची चर्चा सुरु होती. त्यावर राजू शेट्टी यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. राजू शेट्टी यांनी कुणाशीही युती किंवा आघाडी न करता ‘एकला चलो रे’ची भूमिका त्यांनी घेतली आहे. महाविकास आघाडीत जाणे म्हणजे असंगाशी संग करणे होय, अशी टीका राजू शेट्टी यांनी केली आहे. 

आम्ही स्वतंत्रपणे दोन्ही आघड्यापासून दूर राहणार

निवडणुका लढवणे किंवा राजकारण करणे हा आमचा धंदा नाही. शेतकरी चळवळ मजबूत करण्यासाठी, वेगवेगळ्या सभागृहात प्रतिनिधी पाठवण्यासाठी आम्ही असंगाशी संग करण्याचा आम्ही प्रयत्न केला. मात्र त्यात आम्हाला चांगले अनुभव आला नाही. त्यामुळे यापुढे आम्ही महाविकास आघाडी किंवा भाजप यांच्यापासून लांब राहण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही स्वतंत्रपणे दोन्ही आघड्यापासून दूर राहत कार्य करणार, असे राजू शेट्टी यांनी स्पष्ट केले. 

कृषी मंत्री शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखे बोलतात

कोणत्याही सरकारचे १०० दिवसात परीक्षण करता येत नाही. या सरकारने आपण लोकोपयोगी सरकार असल्याची साधी चुणूकही या शंभर दिवसात दाखवलेली नाही. सरकार दहीहंडीत गोविंदा, गणपतीमध्ये डॉल्बीबाबत जी तत्परता दाखवली ती शेतकऱ्यांबाबत का दाखवत नाही, असा सवाल करत महाराष्ट्रात ऊस वगळता एकही पीक अतिवृष्टीमुळे शिल्लक राहिले नाही. मात्र कृषी मंत्री शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखे बोलतात, अशी टीका राजू शेट्टी यांनी केली. तसेच सध्याची परिस्थिती ओल्या दुष्काळाच्या निकषात बसत नसेल तर निकष बदला. वैश्विक तापमान वाढीमुळे सगळे ऋतू बदललेले आहेत. त्यामुळे बदलत्या काळाप्रमाणे तुम्ही तुमची धोरण बदलली नाहीत तर उपयोग काय? मात्र हे सर्व निकष, धोरण हे मदत देण्यासाठी आहे की टाळण्यासाठी हे सरकारने सांगावे, अशी विचारणा राजू शेट्टी यांनी केली आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

 

टॅग्स :Raju Shettyराजू शेट्टीMahavikas Aghadiमहाविकास आघाडी