शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 : गुजरात टायटन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अन् पंजाब किंग्जला मिळालं प्लेऑफ्सचं तिकीट
2
ज्योती मल्होत्रा बनली होती पाकिस्तानसाठी 'अ‍ॅसेट', 'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात होती शत्रूच्या संपर्कात
3
RSS मुख्यालयावरील हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्लाचा १९ वर्षांनंतर खात्मा, संघ वर्तुळातून ‘अज्ञात’ व्यक्तीच्या कृतीचे स्वागत
4
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
5
'गौरव गोगोई ट्रेनिंगसाठी पाकिस्तानला गेले होते', काँग्रेसच्या खासदारावर भाजपच्या मुख्यमंत्र्याचा गंभीर आरोप
6
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
7
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
8
किंग कोहलीपेक्षा फास्टर निघाला KL राहुल! टी-२० त जलदगतीने गाठला ८००० धावांचा पल्ला
9
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
10
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
11
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
12
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
13
शिक्षण घोटाळ्यात नागपूर पोलिसांची एसआयटी स्थापन, अनेक मोठ्या अधिकाऱ्यांचा भांडाफोड होण्याची शक्यता
14
या महिलेवर लक्ष ठेवा, त्याने वर्षभरापूर्वीच दिला होता इशारा, आता त्या ट्विटची होतेय चर्चा
15
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
16
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
17
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...
18
भोकरदन तालुक्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी वीज कोसळून दोघांचा दुर्दैवी मृत्यू
19
समुद्रात तैनात केला जाणार मेड इन इंडिया 'रक्षक', गौतम अदानी यांच्या कंपनीने केली मोठी डील
20
IPL 2025: मोठी बातमी! SRHचा स्टार क्रिकेटर कोरोना पॉझिटिव्ह; काव्या मारनची डोकेदुखी वाढली!

राज यांचा पुन्हा मराठी ‘राग’

By admin | Updated: August 18, 2016 06:17 IST

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन पुन्हा मराठीचा ‘राग’ आळविला. राज्य शासनाच्या योजनांचा लाभ मराठी माणसांनाच मिळाला पाहिजे

मुंबई : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन पुन्हा मराठीचा ‘राग’ आळविला. राज्य शासनाच्या योजनांचा लाभ मराठी माणसांनाच मिळाला पाहिजे, उद्योगांमध्ये मराठी मुलांना नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत. यासाठी अधिवास धोरण जाहीर करण्याची मागणी त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली. राज आज सकाळी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या भेटीसाठी वर्षा निवासस्थानी गेले. ही भेट पूर्वनियोजित होती. ‘वर्षा’वरून कालच त्यांना भेटीची वेळ देण्यात आली होती. मुख्यमंत्र्यांसमोर मांडलेल्या मराठी बाण्याची माहिती राज यांनी नंतर पत्र परिषदेत दिली. ते म्हणाले की, महाराष्ट्रातील गोष्टींचा फायदा येथीलब लोकांना झाला पाहिजे. मोफत घरांच्या योजनेचा लाभ परप्रांतियांनीच घेतला. इथे महाविद्यालये निघतात आणि त्यात भलतेच शिकतात. प्रत्येक बाबतीत डोमिसाईल सर्टिफिकेट सक्तीचे केले पाहिजे. झारखंड सरकारप्रमाणे आपणही डोमिसाईलचे धोरण आणले पाहिजे. रिक्षा, टॅक्सी परवाने मराठी तरुणांनाच दिले पाहिजेत. मराठीला राजभाषेचा दर्जा देण्याची घोषणा मागे याच सरकारने केली होती. शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी केवळ गाजावाजा केला. त्याचे काय झाले हेही आपण मुख्यमंत्र्यांना विचारले. लवकर निर्णय झाला नाही तर आंदोलन करू. मग कोर्टाच्या अवमानाची वगैरे चिंता करणार नाही, असा इशारा राज यांनी दिला. मुंबईचे टोलनाके बंद झाले पाहिजेत, असे मतही त्यांनी व्यक्त केले. नाशिक महापालिकेला राज्य शासनाकडून येणे असलेले १९० कोटी रुपये तातडीने द्यावेत, अशी मागणी राज यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली. हा निधी देण्याचे मुख्यमंत्र्यांनी मान्य केले आहे, असे राज यांनी पत्रकारांना सांगितले. (विशेष प्रतिनिधी)लोक यांनाच मते का देतात? - मुंबई महापालिकेत अनेक वर्षे त्यांची सत्ता आहे. रोड टॅक्स घेऊनही ते चांगले रस्ते, मोकळे फुटपाथ देऊ शकत नाहीत. तरीही दरवेळी लोक त्यांनाच मतदान करणार असतील तर सगळा आनंदीआनंद आहे ,अशा शब्दात राज ठाकरे यांनी शिवसेनेबद्दलची नाराजी व्यक्त केली.मुंबईत खराब रस्ते बांधणाऱ्या दोन काँट्रॅक्टरना बोलवा आणि कानफाडून काढा. नाहीतर आमच्याकडे सोपवा. इतकी वर्षे काय होतं ते बरोबर सांगतील,असे ते म्हणाले.