शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
2
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
3
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
4
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
5
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
6
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
7
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
8
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
9
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
10
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
11
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
12
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
13
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
14
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
15
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
16
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
17
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
18
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
19
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
20
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक

राज यांचा पुन्हा मराठी ‘राग’

By admin | Updated: August 18, 2016 06:17 IST

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन पुन्हा मराठीचा ‘राग’ आळविला. राज्य शासनाच्या योजनांचा लाभ मराठी माणसांनाच मिळाला पाहिजे

मुंबई : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन पुन्हा मराठीचा ‘राग’ आळविला. राज्य शासनाच्या योजनांचा लाभ मराठी माणसांनाच मिळाला पाहिजे, उद्योगांमध्ये मराठी मुलांना नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत. यासाठी अधिवास धोरण जाहीर करण्याची मागणी त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली. राज आज सकाळी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या भेटीसाठी वर्षा निवासस्थानी गेले. ही भेट पूर्वनियोजित होती. ‘वर्षा’वरून कालच त्यांना भेटीची वेळ देण्यात आली होती. मुख्यमंत्र्यांसमोर मांडलेल्या मराठी बाण्याची माहिती राज यांनी नंतर पत्र परिषदेत दिली. ते म्हणाले की, महाराष्ट्रातील गोष्टींचा फायदा येथीलब लोकांना झाला पाहिजे. मोफत घरांच्या योजनेचा लाभ परप्रांतियांनीच घेतला. इथे महाविद्यालये निघतात आणि त्यात भलतेच शिकतात. प्रत्येक बाबतीत डोमिसाईल सर्टिफिकेट सक्तीचे केले पाहिजे. झारखंड सरकारप्रमाणे आपणही डोमिसाईलचे धोरण आणले पाहिजे. रिक्षा, टॅक्सी परवाने मराठी तरुणांनाच दिले पाहिजेत. मराठीला राजभाषेचा दर्जा देण्याची घोषणा मागे याच सरकारने केली होती. शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी केवळ गाजावाजा केला. त्याचे काय झाले हेही आपण मुख्यमंत्र्यांना विचारले. लवकर निर्णय झाला नाही तर आंदोलन करू. मग कोर्टाच्या अवमानाची वगैरे चिंता करणार नाही, असा इशारा राज यांनी दिला. मुंबईचे टोलनाके बंद झाले पाहिजेत, असे मतही त्यांनी व्यक्त केले. नाशिक महापालिकेला राज्य शासनाकडून येणे असलेले १९० कोटी रुपये तातडीने द्यावेत, अशी मागणी राज यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली. हा निधी देण्याचे मुख्यमंत्र्यांनी मान्य केले आहे, असे राज यांनी पत्रकारांना सांगितले. (विशेष प्रतिनिधी)लोक यांनाच मते का देतात? - मुंबई महापालिकेत अनेक वर्षे त्यांची सत्ता आहे. रोड टॅक्स घेऊनही ते चांगले रस्ते, मोकळे फुटपाथ देऊ शकत नाहीत. तरीही दरवेळी लोक त्यांनाच मतदान करणार असतील तर सगळा आनंदीआनंद आहे ,अशा शब्दात राज ठाकरे यांनी शिवसेनेबद्दलची नाराजी व्यक्त केली.मुंबईत खराब रस्ते बांधणाऱ्या दोन काँट्रॅक्टरना बोलवा आणि कानफाडून काढा. नाहीतर आमच्याकडे सोपवा. इतकी वर्षे काय होतं ते बरोबर सांगतील,असे ते म्हणाले.