शहरं
Join us  
Trending Stories
1
ब्लॅकमेल करणाऱ्या प्रेयसीचा खून, मृतदेह दौलताबाद घाटात फेकून प्रियकर पोलिस ठाण्यात हजर
2
"आम्ही ओबीसींच्या हिताचं रक्षण करू शकलो नाही", राहुल गांधींनी चूक मान्य केली; आता दिलं मोठं आश्वासन
3
चालत गेली अन् शाळेच्या चौथ्या मजल्यावरून मारली उडी; दहावीतील विद्यार्थिनीचा व्हिडीओ आला समोर
4
गिलनं ज्याला वेटिंगवर ठेवलं तोच कामी आला! ओली पोप पाठोपाठ ब्रूकही वॉशिंग्टनच्या 'सुंदर' चेंडूवर फसला
5
दोन रुग्णवाहिका घेऊन सासरी पोहोचला जावई, २०-२५ जण उतरले, मारहाण, तुफान राडा, कारण काय?
6
Mhada Lottery 2025: म्हाडाच्या लॉटरीत लागलेले घर भाड्याने देऊ शकतो का? जाणून घ्या नियम!
7
Sarzameen Movie Review: देशभक्तीच्या पार्श्वभूमीवरील पिता-पुत्राची भावनिक कथा 'सरजमीं'
8
"नरेंद्र मोदी मोठी समस्या नाहीत, त्यांच्यात ..."; विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांचा मोठा हल्ला!
9
मुंबई लोकलमध्ये ६२ कोटी रुपयांचे मोबाईल चोरीला; किती लोकांना परत मिळाले? 
10
चीनचा Bajaj ला मोठा धक्का; ऑगस्टपासून बंद होऊ शकते EV चे उत्पादन, कारण काय..?
11
‘५६ लाख घुसखोर आले कसे? तुम्ही राजीनामाच द्या’, महुआ मोईत्रांनी अमित शाहांना सुनावले  
12
Bank Job 2025: बँक ऑफ बडोदामध्ये मॅनेजर, सिनियर मॅनेजर पदांसाठी भरती; संधी सोडू नका!
13
'एक नंबर'! 'लोकमत डॉट कॉम'सोबत वाचकांची 'महायुती'; ६,२१,५३,००० 'लोकमतां'सह घेतली 'महाआघाडी'
14
फहाद फासिलनं सांगितले त्याचे आवडते '५' चित्रपट, तुम्ही पाहिलेत का?
15
पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारायला तयार; मंत्रि‍पदाच्या चर्चांवर राहुल नार्वेकरांचे सूचक विधान
16
एक दोन नाही तर २५००० कर्मचाऱ्यांची कपात होणार, एप्रिलनंतर आता पुन्हा एकदा Intel च्या कर्मचाऱ्यांवर संकट
17
"...हे विरोधी पक्ष ठरवू शकत नाही"; लोकसभेत प्रचंड गोंधळ, कोणत्या मुद्द्यावर केंद्रीय मंत्री भडकले?
18
'माझ्या मनावर ओझं पण...' ९००० कर्मचाऱ्यांना काढल्यानंतर सत्या नाडेला यांनी अखेर मौन सोडले; म्हणाले...
19
सरकार आता आमची गेलेली मुलं परत आणून देऊ शकतं का? शाळा दुर्घटनेनंतर पालकांचा आक्रोश
20
31 जुलैपासून सुरू होणार 'या' कंपनीचा कार प्लांट, दर वर्षी बाहेर पडणार 1.50 लाख इलेक्ट्रिक कार!

राज यांच्या कृष्णकुंजवर खडाजंगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2017 03:50 IST

एकीकडे लागोपाठचे पराभव आणि दुसरीकडे जुनीच दुखणी अशा कात्रीत सापडलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण

मुंबई : एकीकडे लागोपाठचे पराभव आणि दुसरीकडे जुनीच दुखणी अशा कात्रीत सापडलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची गुरुवारी ‘कृष्णकुंज’वर झालेली बैठक भलतीच वादळी ठरली. पक्षप्रमुख राज ठाकरे यांना प्रथमच पदाधिकाऱ्यांच्या परखड मतांचा आणिं रोषाचा सामना करावा लागला. लोकसभा, विधानसभा आणि महापालिका निवडणुकांमध्ये मनसेला मानहानीकारक पराभवाचा सामना करावा लागला. मुंबईसह अन्य महापालिका निवडणुकीतील पक्षाच्या खराब कामगिरीने मनसेच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. या पार्श्वभूमीवर गुरुवारी राज यांनी ‘कृष्णकुंज’वर पक्षाचे अन्य नेते आणि सरचिटणिसांची बैठक बोलावली. या बैठकीपूर्वी नेते-सरचिटणिसांनी मुंबईत विभागवार बैठका घेतल्या होत्या. त्यात पदाधिकाऱ्यांनी तीव्र भावना व्यक्त केल्या होत्या. पक्ष नेतृत्वाच्या शैलीवरूनही प्रश्न उपस्थित करण्यात आले. या सर्वाचे पडसाद कृष्णकुंजमधील बैठकीतही उमटले.पक्षातील नाराजी परखडपणे मांडताना, तुमच्याकडून विविध विषयांवर पक्षाची भूमिकाच समोर येत नाही, असा थेट हल्ला मनसे पदाधिकाऱ्यांनी राज ठाकरे यांच्यावर चढविला. यावर, मी भूमिका मांडतो. पण तुम्हीच माझी भूमिका लोकांपर्यंत पोहोचवायला कमी पडता, असा पलटवार राज यांनी केला. निवडणुकीत उमेदवार ठरविण्याच्या प्रक्रियेवरही काही नेत्यांनी आपली नाराजी व्यक्त केली. शिवाय, पक्षाच्या विरोधात काम करणाऱ्यांवरील कारवाईचा मुद्दाही चर्चेला आला. मुंबईतील बदलती समीकरणे पाहता मराठीप्रमाणेच अन्य भाषिकांनाही जवळ करण्याची आवश्यकता असल्याची भावना काही नेत्यांनी व्यक्त केली. यावर, मराठीचा मुद्दा अजिबात सोडणार नाही. उलट तो अधिक आक्रमक करणार असल्याचा इरादा राज यांनी व्यक्त केला. मी मराठीचा मुद्दा सोडू शकत नाही, भले मला लोकांनी मते देऊ देत किंवा नाही, असा पवित्रा राज यांनी घेतला. तसेच पदाधिकाऱ्यांना त्यांच्या मानमर्यादा आणि कर्तव्यांचीही जाणीव करून दिली. (प्रतिनिधी)