शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! ऑपरेशन सिंदूरला सुरुवात; भारताचा पाकिस्तान, पीओकेवर हवाई हल्ला 
2
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
3
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
4
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
5
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
6
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
7
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
8
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
9
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
10
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
11
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
12
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
13
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
14
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
15
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
16
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
17
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
18
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
19
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
20
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”

राज यांच्या कृष्णकुंजवर खडाजंगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2017 03:50 IST

एकीकडे लागोपाठचे पराभव आणि दुसरीकडे जुनीच दुखणी अशा कात्रीत सापडलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण

मुंबई : एकीकडे लागोपाठचे पराभव आणि दुसरीकडे जुनीच दुखणी अशा कात्रीत सापडलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची गुरुवारी ‘कृष्णकुंज’वर झालेली बैठक भलतीच वादळी ठरली. पक्षप्रमुख राज ठाकरे यांना प्रथमच पदाधिकाऱ्यांच्या परखड मतांचा आणिं रोषाचा सामना करावा लागला. लोकसभा, विधानसभा आणि महापालिका निवडणुकांमध्ये मनसेला मानहानीकारक पराभवाचा सामना करावा लागला. मुंबईसह अन्य महापालिका निवडणुकीतील पक्षाच्या खराब कामगिरीने मनसेच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. या पार्श्वभूमीवर गुरुवारी राज यांनी ‘कृष्णकुंज’वर पक्षाचे अन्य नेते आणि सरचिटणिसांची बैठक बोलावली. या बैठकीपूर्वी नेते-सरचिटणिसांनी मुंबईत विभागवार बैठका घेतल्या होत्या. त्यात पदाधिकाऱ्यांनी तीव्र भावना व्यक्त केल्या होत्या. पक्ष नेतृत्वाच्या शैलीवरूनही प्रश्न उपस्थित करण्यात आले. या सर्वाचे पडसाद कृष्णकुंजमधील बैठकीतही उमटले.पक्षातील नाराजी परखडपणे मांडताना, तुमच्याकडून विविध विषयांवर पक्षाची भूमिकाच समोर येत नाही, असा थेट हल्ला मनसे पदाधिकाऱ्यांनी राज ठाकरे यांच्यावर चढविला. यावर, मी भूमिका मांडतो. पण तुम्हीच माझी भूमिका लोकांपर्यंत पोहोचवायला कमी पडता, असा पलटवार राज यांनी केला. निवडणुकीत उमेदवार ठरविण्याच्या प्रक्रियेवरही काही नेत्यांनी आपली नाराजी व्यक्त केली. शिवाय, पक्षाच्या विरोधात काम करणाऱ्यांवरील कारवाईचा मुद्दाही चर्चेला आला. मुंबईतील बदलती समीकरणे पाहता मराठीप्रमाणेच अन्य भाषिकांनाही जवळ करण्याची आवश्यकता असल्याची भावना काही नेत्यांनी व्यक्त केली. यावर, मराठीचा मुद्दा अजिबात सोडणार नाही. उलट तो अधिक आक्रमक करणार असल्याचा इरादा राज यांनी व्यक्त केला. मी मराठीचा मुद्दा सोडू शकत नाही, भले मला लोकांनी मते देऊ देत किंवा नाही, असा पवित्रा राज यांनी घेतला. तसेच पदाधिकाऱ्यांना त्यांच्या मानमर्यादा आणि कर्तव्यांचीही जाणीव करून दिली. (प्रतिनिधी)